शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

‘जोतिबा’साठी दमडीचाही निधी नाही

By admin | Updated: March 31, 2015 00:14 IST

सुविधांची वानवा : इतर देवस्थानांच्या तुलनेत विकासाकडे दुर्लक्ष; शासकीय अनास्थेमुळे देवस्थानची ओंजळ रितीच

इंदुमती गणेश - कोल्हापूर करवीरनिवासिनी अंबाबाईचा सरसेनापती, कोल्हापूरचा रक्षणकर्ता, महाराष्ट्र, कर्नाटकसह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि त्यांचा पालनकर्ता असलेल्या दख्खनचा राजा श्री जोतिबा देवस्थानची ओंजळ मात्र शासकीय अनास्थेमुळे रितीच राहिली आहे. मंदिरासह परिसराच्या विकासासाठी आजवर शासनाकडून एक रुपयाचाही निधी या देवस्थानला मिळालेला नाही. किमान यात्रा निधीची तरतूद व्हावी, अशी ग्रामपंचायतीची अपेक्षा आहे. कोल्हापूरपासून अवघ्या २२ किलोमीटर अंतरावर असलेला जोतिबा म्हणजे सर्वसामान्य आणि कष्टकरी जनतेचे आराध्य आणि कुलदैवत. चैत्र पौर्णिमा ही देवाची सर्वांत मोठी यात्रा. रविवार, पौर्णिमा अशाप्रकारे अंबाबाईप्रमाणेच देवाच्या दर्शनासाठी येथे वर्षभर भाविकांची गर्दी असते. भाविकांची संख्या आता ४० लाखांहून अधिक आहे; पण तुलनेने येथे सुविधांचा अभाव आहे. पिण्याच्या पाण्यापासून ते यात्री निवास, अन्नछत्र, पार्किंगपर्यंतच्या मूलभूत सोयीदेखील नाहीत. लोकवर्गणी आणि स्थानिक आमदार, खासदार फंडातून थोडीफार विकासकामे सोडली, तर या परिसराची स्थिती बदलली नाही. इतक्या वर्षांत स्थानिक व राज्य शासन पातळीवर या देवस्थानासाठी निधी द्यावा, यासाठी कधी पुढाकार घेतला गेला नाही. त्यामुळेच हे देवस्थान दुलर्क्षित राहिले. आता मात्र परिसराचा विकास ही काळाची गरज आहे. गेल्या तीन वर्षांपासून मंदिराच्या विकास आराखड्याची केवळ चर्चा होते. किमान यात्रा निधी मिळाला तरी येथे दर्शन मंडप, स्वच्छतागृह, ड्रेनेज अशी विकासकामे होणार आहेत. ग्रामपंचायतीचे उत्पन्न व खर्चाचे व्यस्त प्रमाण जोतिबा डोंगरावर साडेसहा हजारांच्या आसपास लोकसंख्या आहे. शिवाय यात्रा व वर्षभर येणाऱ्या भाविकांचा ताण, ग्रामपंचायतीला उपकर, पाणीपट्टी, यात्रा कर, अशी सर्व मिळून जवळपास ४० लाखांची जोडणी होते; पण येथे जोतिबा डोंगरावर पाण्याची सर्वांत मोठी समस्या आहे. त्यामुळे कासारी नदीतून पाणी उपसा करावा लागतो. ग्रामपंचायतीला वर्षाकाठी फक्त पाण्याचेच जवळपास २८ लाख रुपये बिल भरावे लागते. उरलेली रक्कम कर्मचाऱ्यांचे पगार, आरोग्य सुविधा, दिवाबत्ती, स्वच्छता यावर खर्च होते. उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ बसवितानाच कसरत होते, तिथे विकासकामे राबविणे ग्रामपंचायतीला अशक्य आहे. अर्थसंकल्पातही निराशा अंबाबाईप्रमाणे जोतिबा देवस्थानच्या विकासासाठी १५२ कोटींचा विकास आराखडा बनविण्यात आला आहे. डोंगरावरील तलावांचे पुनरुज्जीवन, बगीचा, यात्रीनिवास, अन्नछत्र, अशा तरतुदी करण्यात आल्या आहेत; पण सर्वांत जास्त ज्याची गरज आहे तो दर्शनमंडप यात नाही. पालकमंत्र्यांनी या अर्थसंकल्पात देवस्थानच्या विकासासाठी २५ कोटींची तरतूद करण्याचे आश्वासन दिले होते; मात्र त्यातही निराशा झाली. विकासकामे आणि उत्पन्नाचे गणित जोतिबा डोंगराचा परिसर खूप मर्यादित क्षेत्र असल्याने वाढत्या भाविक संख्येच्या मानाने तो आता कमी पडत आहे. येथील विकास आराखडा करताना स्थानिक गरजांना विचारात घेतले नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. हे मंदिर ग्रामपंचायत, जिल्हा प्रशासन आणि देवस्थान समिती या तीन यंत्रणांकडे असल्यानेही जबाबदाऱ्यांचा गोंधळ उडतो. या मंदिराचे सगळे उत्पन्न गुरवांना जाते. समितीला त्यातून काहीच मिळत नसल्याने त्यांनाही हात आखडता घ्यावा लागतो. मंदिराच्या विकासासाठी १९९० ला सुंदर जोतिबा समितीची स्थापना करण्यात आली होती. त्याअंतर्गत जमलेल्या निधीतून मंदिराच्या आत पायरी टप्पे, आवारात फरशी, सेंट्रल प्लाझा, रस्ते रुंदीकरण ही विकासकामे करण्यात आली. नंतर हा प्रकल्प अर्धवटच राहिला. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीनेही ग्रामपंचायतीला यात्रेसाठी दोन लाख रुपये देण्याचा निर्णय झाला होता. मात्र, २००३ नंतर तो बंदच करण्यात आला. जोतिबा देवस्थानला वर्षभर यात्रा असते; मात्र शासनाकडून निधीच मिळत नसल्याने लाखो भाविकांची गैरसोय होते. ग्रामपंचायतीचे उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने विकासकामे करता येत नाहीत. त्यामुळे शासनाने या देवस्थानसाठी यात्रा निधीची तरतूद करावी. - रिया सांगळे, सरपंच, जोतिबा