शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची ताकद निम्म्यावर

By admin | Updated: February 28, 2017 01:02 IST

जनाधार घटला : नेत्यांतील कुरघोडी पक्षाच्या मुळावर; ‘माझ्यामुळे काँग्रेस’ ही भावना

विश्वास पाटील --कोल्हापूर जिल्हा परिषदेतील काँग्रेसच्या वर्चस्वाला या निवडणुकीत सुरुंग लागला. मावळत्या सभागृहातील संख्याबळ निम्म्यापेक्षा खाली घसरले. पाच तालुक्यांत काँग्रेसला एकही जागा मिळवता आलेली नाही. नेत्यांतील दुफळी, आत्मविश्वास गमावलेले कार्यकर्ते आणि एकजूट हरविलेली संघटना यामुळे पक्षाला गळती लागल्याचे चित्र या निकालानंतर पुढे आले आहे. त्यात सुधारणा होण्याचीही शक्यता नाही. माझ्यापेक्षा कुणी मोठा होऊ नये या नेत्यांच्या राजकारणात पक्षाची वाताहात होत आहे. ‘मी काँग्रेसचा’ यापेक्षा ‘माझ्यामुळे काँग्रेस’ ही भावना बळावल्याने ही स्थिती निर्माण झाली. जिल्हा परिषदेत अपवाद वगळता स्थापनेपासून काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. या पक्षाची पाळेमुळे ग्रामीण भागात रुजल्यामुळे या महत्त्वाच्या सत्तेवर कायमच पकड राहिली. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला राष्ट्रवादीने आव्हान दिले होते. या निवडणुकीत या पक्षाच्या वर्चस्वाला भाजपने विविध पक्षांची व आयात नेत्यांची मोट बांधून आव्हान दिले. त्यामध्ये ते काँग्रेसचे वर्चस्व मोडून काढण्यात बऱ्याच प्रमाणात यशस्वी झाले. ‘काँग्रेसचा पराभव काँग्रेसच करू शकते’ हा अनुभवही या निवडणुकीत खरा ठरला. गत निवडणुकीत कागलमध्ये दिवंगत नेते खासदार मंडलिक यांच्यामुळे सर्व पाच जागा जिंकता आल्या होत्या. त्यामुळे तिथेच सत्तेची पायाभरणी झाली होती. या निवडणुकीत मोठ्या तालुक्यातच काँग्रेस पिछाडीवर गेली. करवीर तालुक्यात आमदार सतेज पाटील यांचा तीन मतदारसंघात पराभव झाला. माजी आमदार पी. एन. पाटील यांनी सहापैकी तीन जागा जिंकल्या. शिंगणापूरच्या जागेवर विजयी झालेल्या रसिका पाटील यांचे पती अमर पाटील ‘गोकुळ’च्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्यामागे होते या रागातून त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारली. असेच राजकारण रेंदाळमध्ये घडले. तिथे माजी मंत्री जयवंतराव आवळे यांनी सगळी ताकद लावून तानाजी घोडेस्वार या आपल्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली. त्यांना कशीबशी ३०८ मते मिळाली व माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचा मुलगा राहुल हा तब्बल १३ हजार ८५१ मते घेऊन विजयी झाला.गेल्या विधानसभेला पक्षाचा एकही आमदार निवडून आलेला नाही. आता जिल्हा परिषदेत सत्ता टिकवतानाही राष्ट्रवादीसह अन्य पक्षांच्या नाकदुऱ्या काढण्याची वेळ पक्षांवर येणार आहे. देश व राज्य पातळीवर पक्षाची वाटचाल बिकट होत आहे. एकूणच जनाधार कमी होत आहे. कागल, गडहिंग्लज, शाहूवाडी, पन्हाळा या तालुक्यांत पक्षाकडे नेतृत्वच नाही. तिथे संघटना उभी करणे हेच मोठे आव्हान आहे; परंतु हे आव्हान पेलायचे कुणी, हाच मूळ चिंतेचा प्रश्न आहे. करवीर व चंदगड तालुक्यांत हा पक्ष पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर राहिला. कोतोली, कळे, शिरोली पुलाची, रूकडी, शिंगणापूर, कसबा सांगाव, गिजवणे आणि कोळिंद्रे या मतदारसंघात काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली आहे. यवलूज, कुंभोज, पट्टणकोडोली, रेंदाळ, हुपरी, बड्याचीवाडी आणि पिंपळगांव मतदारसंघात तर चौथ्या क्रमांकावर फेकली आहे. ‘करवीर’ लिमिटेड पक्षकाँग्रेसचे नेते ‘राष्ट्रवादी’ची ही तर ‘कागल लिमिटेड पार्टी’ अशी हेटाळणी करतात; परंतु काँग्रेसची वाटचालही त्याच दिशेने सुरू आहे. हा पक्ष ही ‘करवीर लिमिटेड पार्टी’ होऊ लागला आहे.गगनबावड्यात १00 टक्के यशगगनबावडा तालुक्यात काँग्रेसने दोन्हीही जागा जिंकल्या. तिथे माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी एम. जी. पाटील यांना ताराराणी आघाडीतून मैदानात उतरविले होते. महाडिक तिथे गेल्यामुळे काँग्रेस जास्त संघटित झाली व ‘बाहेरचे नेतृत्व झुगारायचे’, या भावनेतून मतदान झाल्याने दोन्ही जागा जिंकल्या. पी. जी. शिंदे यांचा गट प्रबळ असतानाही तिसंगी मतदारसंघात त्यांचा पराभव झाला. त्यास त्यांचा पक्षबदलूपणा कारणीभूत होता. शिंदे हे भाजपचे अध्यक्षपदाचे दावेदार होते, परंतु त्यांना मतदारांनी कोल्हापूरलाच पाठविले नाही. पाच तालुक्यांत शून्यावरहातकणंगले,शाहूवाडी, पन्हाळा, कागल आणि गडहिंग्लज या तालुक्यांत निम्म्या म्हणजे ३१ जागा होत्या, तिथे काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. हातकणंगले तालुक्यात आवाडे गटाने स्वबळावर स्थानिक आघाडी करून दोन जागा निवडून आणल्या.पिछाडी अशीहीगेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत काँग्रेसला तब्बल २ लाख (१५.३७ टक्के) मते कमी पडली. शिवाय या पक्षाच्या १७ जागा कमी झाल्या म्हणजे निम्म्याहून जास्त जागा या पक्षाने गमावल्या.गतनिवडणुकीतील मतांची टक्केवारीएकूण मतदान : १४ लाख ७७ हजार ४७५काँग्रेसला मिळालेली मते : ५ लाख ४३ हजार २९२एकूण मतदानाच्या प्रमाणात टक्केवारी : ३६.७७काँग्रेसचे तालुकानिहाय सदस्यकरवीर ०५राधानगरी०२गगनबावडा०२चंदगड०२ शिरोळ०१ भुदरगड०१ आजरा०१