शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

शिवरायांचे राज्य सर्वधर्मसमभावाच

By admin | Updated: December 9, 2014 00:31 IST

अमर आडके : शत्रूच्या मृतदेहांचेही इतमामात दफने

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य हे न्यायाचे, नीतीचे आणि सर्वधर्मसमभावाचे होते. शत्रूंच्या मृतदेहाची विटंबना न करता इतमामात दफन करायला लावून त्यांचाही सन्मान करणाऱ्या शिवरायांचे चरित्र अथांग समुद्रासारखे आहे, असे प्रतिपादन दुर्ग अभ्यासक डॉ. अमर आडके यांनी आज, सोमवारी येथे केले.महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टतर्फे अंबाबाई मंदिरात आयोजित युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी ते ‘पन्हाळगड ते विशाळगड’ या विषयावर बोलत होते. डॉ. आडके म्हणाले, छत्रपती शिवरायांना संपविण्याचा विडा विजापूरच्या आदिलशहाचा सरदार अफझलखानाने उचलला. या अभिनिवेषातच तो आपले गुरू अमिन यांना भेटायला अफजलपूर येथे गेला. निद्रिस्त गुरुच्या पायाशी तो बसला होता. काही क्षणातच निद्रेतून गुरू जागे झाले. घामाघूम झालेले गुरू म्हणाले, तू शिवाजी महाराजांच्या मोहिमेवर जाऊ नकोस. अफझलने कारण विचारल्यावर, अरे तुझे शीर धडावेगळे झाल्याचे स्वप्न मला पडल्याचे त्यांनी उत्तर दिले. त्यामुळे अफझल बिथरला. तो विवेकशून्य झाला. मरण समोर आहे, पण विडा उचलल्याने प्रतिष्ठेचा प्रश्न होता. आपला मृत्यू गृहीत धरूनच तो तेथून बाहेर पडला. त्याला ६५ पत्नी होत्या. पहिली पत्नी वगळता अन्य ६३ जणींना ठार मारुन त्याने त्यांच्या कबरी बांधल्या हे पाहून त्याची एक पत्नी पळून गेली. परंतु तिला पुन्हा शोधून काढत तिला झाडाला उलटे टांगून तिला कोल्ह्या-कुत्र्यांना खायला घातले. त्यामुळे तिची कबर बांधली नाही. या घटनांचा साक्षीदार इटलीचा निकोलस मोरोची होता. मानवतेशी द्रोह करणाऱ्या अफझलखानाला शिवरायांनी ठार केले, ते बरं झाले, अशा शब्दांत त्याने लिहून ठेवले आहे.शत्रूच्या देहाची विटंबना करायची नाही, ही शिकवण शिवरायांनी आपल्या ‘मातोश्री’कडूनच घेतली होती. तीच परंपरा मराठ्यांनी जपली आहे. अफझल खानाच्या वधानंतर महाराजांनी काही दिवसांतच पन्हाळागड आपल्या ताब्यात घेतला. यावेळी लेखक शामकांत जाधव, माजी महापौर शिरिष कणेरकर, राजू मेवेकरी, नंदकुमार मराठे उपस्थित होते. (प्रतिनिधी)सुधा मूर्ती यांनीहीसमजून घेतली पावनखिंड ‘इन्फोसिस’च्या सुधा मूर्ती यांनी आपल्याकडून पावनखिंडीचा इतिहास प्रत्यक्ष चालून पाहिला व आपल्याकडून तो ऐकल्यानंतर त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या.