शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांचे राज्य सर्वधर्मसमभावाच

By admin | Updated: December 9, 2014 00:31 IST

अमर आडके : शत्रूच्या मृतदेहांचेही इतमामात दफने

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य हे न्यायाचे, नीतीचे आणि सर्वधर्मसमभावाचे होते. शत्रूंच्या मृतदेहाची विटंबना न करता इतमामात दफन करायला लावून त्यांचाही सन्मान करणाऱ्या शिवरायांचे चरित्र अथांग समुद्रासारखे आहे, असे प्रतिपादन दुर्ग अभ्यासक डॉ. अमर आडके यांनी आज, सोमवारी येथे केले.महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टतर्फे अंबाबाई मंदिरात आयोजित युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी ते ‘पन्हाळगड ते विशाळगड’ या विषयावर बोलत होते. डॉ. आडके म्हणाले, छत्रपती शिवरायांना संपविण्याचा विडा विजापूरच्या आदिलशहाचा सरदार अफझलखानाने उचलला. या अभिनिवेषातच तो आपले गुरू अमिन यांना भेटायला अफजलपूर येथे गेला. निद्रिस्त गुरुच्या पायाशी तो बसला होता. काही क्षणातच निद्रेतून गुरू जागे झाले. घामाघूम झालेले गुरू म्हणाले, तू शिवाजी महाराजांच्या मोहिमेवर जाऊ नकोस. अफझलने कारण विचारल्यावर, अरे तुझे शीर धडावेगळे झाल्याचे स्वप्न मला पडल्याचे त्यांनी उत्तर दिले. त्यामुळे अफझल बिथरला. तो विवेकशून्य झाला. मरण समोर आहे, पण विडा उचलल्याने प्रतिष्ठेचा प्रश्न होता. आपला मृत्यू गृहीत धरूनच तो तेथून बाहेर पडला. त्याला ६५ पत्नी होत्या. पहिली पत्नी वगळता अन्य ६३ जणींना ठार मारुन त्याने त्यांच्या कबरी बांधल्या हे पाहून त्याची एक पत्नी पळून गेली. परंतु तिला पुन्हा शोधून काढत तिला झाडाला उलटे टांगून तिला कोल्ह्या-कुत्र्यांना खायला घातले. त्यामुळे तिची कबर बांधली नाही. या घटनांचा साक्षीदार इटलीचा निकोलस मोरोची होता. मानवतेशी द्रोह करणाऱ्या अफझलखानाला शिवरायांनी ठार केले, ते बरं झाले, अशा शब्दांत त्याने लिहून ठेवले आहे.शत्रूच्या देहाची विटंबना करायची नाही, ही शिकवण शिवरायांनी आपल्या ‘मातोश्री’कडूनच घेतली होती. तीच परंपरा मराठ्यांनी जपली आहे. अफझल खानाच्या वधानंतर महाराजांनी काही दिवसांतच पन्हाळागड आपल्या ताब्यात घेतला. यावेळी लेखक शामकांत जाधव, माजी महापौर शिरिष कणेरकर, राजू मेवेकरी, नंदकुमार मराठे उपस्थित होते. (प्रतिनिधी)सुधा मूर्ती यांनीहीसमजून घेतली पावनखिंड ‘इन्फोसिस’च्या सुधा मूर्ती यांनी आपल्याकडून पावनखिंडीचा इतिहास प्रत्यक्ष चालून पाहिला व आपल्याकडून तो ऐकल्यानंतर त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या.