शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
9
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
10
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
11
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
12
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
13
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
14
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
15
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
16
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
17
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
18
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
19
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
20
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले

साखर कारखानदारीविरोधात राज्य, केंद्र सरकारचा सापळा

By admin | Updated: August 5, 2015 00:26 IST

जयंत पाटील : साखर उद्योगाला अनुदानाची गरज

सांगली : राज्यातील सहकारी साखर कारखानदारी अडचणीत आणण्याच्या दृष्टीने केंद्र व राज्य शासनाने एक सापळा रचला आहे. भविष्यात याचा मोठा फटका राज्यातील कारखानदारीला बसणार आहे, असे मत आ. जयंत पाटील यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. ते म्हणाले की, सध्या शासनाने जाहीर केलेले पॅकेज हे कर्जस्वरुपात आहे. आज ना उद्या या कर्जाची परतफेड कारखान्यांना करावी लागणार आहे. कारखाने याबाबतीत असमर्थ ठरले तर, त्यांचे नेटवर्थ उणे होणार आहे. असे झाले तर कारखान्यांसमोरील अडचणीत वाढ होणार आहे. कारखाने अडचणीत आले तर भविष्यात संचालकांना कर्जापोटी व्यक्तिगत हमी द्यावी लागेल. अनेक धोके या धोरणांमुळे दिसत आहे. साखर कारखानदारी अडचणीत आणण्यासाठीच हा ‘ट्रॅप’ सरकारने लावला आहे. केवळ कारखानदारीच नव्हे, तर पर्यायाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही अडचणीत आणले जात आहे. सरकारला खरोखर मदत करायची असेल तर, त्यांनी अनुदान द्यावे. साखर कारखान्यांच्या या विषयावर तज्ज्ञ लोकांकडून आम्ही आभ्यास करीत आहोत. त्यानंतर आम्ही पुढील भूमिका जाहीर करू. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांचा अपेक्षाभंगराज्यातील सरकार सध्या कोणत्याच विभागाच्या बाजूने दिसत नाही. विदर्भाच्या आशा उंचावल्या होत्या, पण त्याठिकाणीही शेतकऱ्यांचे भले होऊ शकले नाही. विदर्भाप्रमाणेच खानदेश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील परिस्थितीही वाईट आहे. कोणत्याच विभागाला न्याय देण्यात सरकार यशस्वी होऊ शकलेले नाही. केवळ घोषणाबाजीत ते समाधान मानत आहेत. विजेचा दर कमी करणे, कर्जमाफी देणे या गोष्टीही सरकारकडून झाल्या नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झालेला आहे.