शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

मातीला ‘देव’पण देणारा समाज

By admin | Updated: July 27, 2015 00:28 IST

बलुतेदारीची जपणूक : कलानगरीच्या चित्र-शिल्प परंपरेत अनेक समाजबांधवांचा वाटा--लोकमतसंगे जाणून घेऊ

इंदुमती गणेश - कोल्हापूर -बारा बलुतेदारांपैकी महत्त्वाचा घटक असणाऱ्या कुंभार समाजाला देव घडविण्याचा मान आहे. प्रथमपूज्य देव श्री गणेशाच्या विविध मूर्तींपासून ते दुर्गामाता, नागोबा, बेंदराचे बैल, नवरात्रात लागणारी लोटकी, पाण्याचे माठ, मडकी असे मातीपासून बनविले जाणारे अनेक साहित्य हे या समाजाचे उत्पन्नाचे मुख्य साधन आहे. आजही आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक राहत कुंभार समाजाने ही बलुतेदारी जपली आहे. पूर्वीच्या काळी वस्तूची देवाणघेवाण हेच चलनाचे माध्यम होते. समाजव्यवस्थेत प्रत्येक कुटुंबात लागणारी मातीची भांडी कुंभारबांधव तयार करत. त्या बदल्यात त्यांना अन्य बलुतेदारांकडून अन्न-धान्य अशा विविध प्रकारच्या साहित्यांची देवघेव केली जात असे. पूर्वी फक्त गाडगी, डेरे, खापऱ्या, कुंड्या बनविण्याचे काम केले जाई. पुढे त्यात सुधारणा होत वीट बनविण्यास सुरुवात झाली. स्वातंत्र्योत्तर कालखंडात लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केल्यानंतर घरोघरी आणि मंडळामध्ये गणेशमूर्तीचे पूजन मोठ्या प्रमाणात सुरू झाले, तेव्हापासून कुंभारबांधवांनी देव घडवण्याचा कार्याला सुरुवात केली, ही परंपरा आजतागायत सुरू आहे. या समाजाचे आराध्य दैवत म्हणजे जोतिबा आणि तुळजाभवानी. कोल्हापूर जिल्ह्यात ८० हजार आणि शहरात १५ ते २० हजार अशी लोकसंख्या आहे. शहरातील उद्योग बाहेर हलविण्यासाठी शासनाने समाजाला बापट कॅम्प येथील २५ एकर जागा दिली. समाजाने ती खरेदी करून येथे संत गोरा कुंभार वसाहत वसवली. याशिवाय शाहूपुरी, दत्त गल्ली, लक्ष्मी गल्ली, बजापराव माजगावकर तालीम, जोशी गल्ली, ऋणमुक्तेश्वर, धोत्री गल्ली, पापाची तिकटी या परिसरात कुंभारबांधव मोठ्या संख्येने राहतात. समाजाची कुमावत को- आॅपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी पतसंस्था असून, त्याद्वारे समाजबांधवांना आर्थिक मदत केली जाते. अष्टकुंभार दैव मंडळाच्यावतीने बाराव्या दिवसांचे विधी केले जातात. कोल्हापूर शहर कुंभार माल उत्पादक सहकारी संस्थेच्यावतीने कुंभारांना शाडू-मातीसह मूर्ती तयार करण्यासाठी कच्चा माल पुरविला जातो. समाजाने आजही काही ठिकाणी बलुतेदारी जपली आहे. आपला पिढीजात व्यवसाय सांभाळत समाजातील तरुणाईने शिक्षणाद्वारे प्रगतीच्या वाटा धुंडाळल्या आहेत. अनेकजणांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळविले आहे. डॉक्टर, इंजिनिअर, वकील आहेत. समाजात मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण जास्त असून, ही कौतुकास्पद बाब आहे. शालिवाहन राजाचे वंशजकुंभार समाजाच्या स्थापनेचा इतिहास उपलब्ध नसला तरी तो प्राचीन काळापासून असल्याचे अनेक दाखले मिळतात. याबाबत मिळालेली माहिती अशी : दोन हजार वर्षांपूर्वी पैठणमध्ये कर्णिक सोमदत्त राजाचे, तर उज्जैनमध्ये विक्रमादित्य राजाचे राज्य होते. विक्रमादित्याने सोमदत्ताचा पराभव करून पैठण काबीज केले. त्यावेळी एक ब्राह्मण कुटुंब उदरनिर्वाहासाठी पैठणमध्ये आले. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर दोन मुले आणि गौतमी नावाची मुलगी या भावंडांनी कुंभार कुटुंबात वास्तव्य केले. गौतमीने कुंभाराच्या मुलाशी विवाह केल्यानंतर त्यांना झालेले अपत्य म्हणजे शालिवाहन राजा आणि त्यांचे वंशज म्हणजे कुंभार समाज. विठ्ठलभक्त संत गोरा कुंभार तर अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहेत.कार्यकारिणी अशीकुंभार समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी १९७९ मध्ये कोल्हापूर जिल्हा कुंभार समाज कृती समितीची स्थापना करण्यात आली. या समितीची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे- जिल्हाध्यक्ष : माजी महापौर मारुतराव कातवरे, उपाध्यक्ष : प्रकाश कुंभार, कार्याध्यक्ष : बबनराव वडणगेकर, सचिव : डी. डी. कुंभार, सदस्य : आर. जी. कुंभार, अशोकराव कुंभार, निवास कुंभार, दिनकर कुंभार, चंद्रकांत कुंभार, अर्जुन सरवडेकर, रावसाहेब कुंभार, आनंदराव कुंभार.चित्र-शिल्प कलावंतांची पिढी....पिढीजातच कलाकुसरीची देणगी मिळालेल्या या समाजाने कलानगरी कोल्हापुरात चित्रकार, शिल्पकारांच्या अनेक पिढ्या घडविल्या. मातीपासून देव आणि सुरेख वस्तू घडविणाऱ्या या समाजातील कलावंतांनी कॅनव्हासवर आपल्या कुंचल्याची जादू रेखाटली. शिल्प निर्माण करत अटकेपार झेंडा लावला. कुंभार मंडप येथे समाजाचे विठ्ठल-रुक्मिणी आणि संत गोरा कुंभार यांचे मंदिर आहे. येथेच गणपतराव वडणगेकर यांनी कलामंदिर कलामहाविद्यालयाची स्थापना केली. मध्यंतरी बंद पडलेले हे महाविद्यालय १९९४ सालापासून पुन्हा सुरू झाले. येथे आजही विद्यार्थ्यांना चित्र-शिल्पकलेचे धडे दिले जातात.