शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अंशदान निवृत्ती वेतन योजनेत सावळागोंधळ

By admin | Updated: November 27, 2014 00:18 IST

एकतर्फीच अंमल : शासनाची रक्कम खात्यावर नाहीच

लिंगनूर : राज्य शासनाची अंशदान निवृत्ती वेतन योजना सुरू आहे. या योजनेनुसार शिक्षकांच्या पगारातील १० टक्के रक्कम त्यांच्या या योजनेच्या खात्यावर कपात करून वर्ग होत आहे. मात्र शासनाने भरावयाचा वाटा म्हणजेच १० टक्के - तितकीच रक्कम मात्र त्या खात्यात जमा होताना दिसत नाही. त्यामुळे अद्याप तरी शासनाने आपले ‘अंश’ ‘दान’ न केल्याने या योजनेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, योजनेचा एकतर्फीच अंमल सुरू आहे की काय? असा सवाल अंशदानमधील शिक्षकांतून होत आहे.अंशदान योजनेनुसार शिक्षकांची १० टक्के रक्कम व तितकाच वाटा शासन उचलत असून ती रक्कम स्वतंत्र खात्यात ठेवून त्यावरील व्याज व सर्व रक्कम निवृत्तीनंतर पेन्शन किंवा ऐच्छिक पद्धतीने मिळणार आहे. त्यानुसार या योजनेची कार्यवाही सुरू आहे. शासनाच्या १ नोव्हेंबर २००५ नंतर रुजू झालेल्या सर्व खात्यातील कर्मचाऱ्यांना ही योजना लागू आहे. जिल्हा परिषदेकडे खात्यावर शिक्षकांच्या पगारातील कपातीचा केवळ १० टक्के वाटाच जमा आहे. मात्र शासनाचा वाटा जमा होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. काही शिक्षकांनी प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. मात्र याबाबत अंशदानसाठी अर्थ विभागाकडून तरतूद नाही. शिवाय शासन आदेशामध्ये शिक्षक वगळून असा उल्लेख असल्याने अन्य खात्याकडील कर्मचाऱ्यांच्या खात्यावर मात्र शासनाचा अंशदानाचा वाटा जमा होताना दिसत आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून शिक्षकांना सापत्न वागणूक का? असा सवाल शिक्षकांतून उपस्थित होत आहे. शिवाय आता शिक्षक संघटनांकडूनही या समस्येची दखल घेतली जात असून, शासनाच्या अर्थ विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे. शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष काळुजी बोरसे-पाटील यांनीही एका कार्यक्रमात याबाबत माहिती दिली आहे. राज्य शासनाने अंशदान योजनेतील आपला वाटा तात्काळ जमा करून योजनेच्या विश्वासार्हतेवरील प्रश्नचिन्ह दूर करावे, अशी मागणी त्या शिक्षकांतून व्यक्त होत आहे. अंशदान ही योजनाच आम्हाला मान्य नसल्याचे कारण पुढे करीत, अद्याप या योजनेविरोधात काहींनी (विशेषत: खासगी निमशासकीय शाळांतील शिक्षक) न्यायालयीन लढाई सुरू ठेवली आहे. (वार्ताहर) योजनेत समाविष्ट नसणाऱ्यांच्या ‘त्या’ रकमांचे काय?अंशदान योजना नव्याने लागू करताना १ नोव्हेंबर २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना ही योजना लागू करण्याचे आदेश होते. त्यानुसार १ नोव्हेंबर २००५ नंतर नव्याने रुजू क र्मचाऱ्यांना ही योजना लागू करणे आवश्यक होते. मात्र जिल्हा परिषदेने विशेषत: शिक्षण सेवक पदावर रुजू शिक्षकांची तारीख नोव्हेंबर २००५ पूर्वीची असूनही कायम तारीख जर २००५ नंतरची असेल, तर त्यांना योजना लागू - असा निष्कर्ष काढून त्यांच्या अंशदानाच्या कपाती केल्या. काही जिल्हा परिषदांनी मात्र या कपाती केल्या नाहीत. दरम्यान, याबाबत न्यायालयात दाद मागून संबंधित कर्मचाऱ्यांची ‘अंशदान’ची कपात थांबवून शिक्षण सेवकांची नेमणूक तारीख ग्राह्य धरण्यात आली. मात्र सांगली जिल्ह्यात या शिक्षकांच्या अंशदानच्या यापूर्वी झालेल्या कपातीची रक्कम अनामत म्हणून जमा आहे. या रकमा त्या शिक्षकांना केव्हा मिळणार? त्या रकमा फंडाच्या खात्यावर जमा होतील का? त्या रकमेवर त्या कालावधीतील व्याज मिळणार काय? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.