शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

समाजमनांवर गारूड घालणारा शाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:26 IST

तशी ‘ट’ ला ‘ट’ आणि ‘म’ ला ‘म’ लावून अल्पायुषी गीते लिहिणारे शेकडो शाहीर महाराष्ट्रात पाहायला मिळतात; पण ‘परिपूर्ण’ ...

तशी ‘ट’ ला ‘ट’ आणि ‘म’ ला ‘म’ लावून अल्पायुषी गीते लिहिणारे शेकडो शाहीर महाराष्ट्रात पाहायला मिळतात; पण ‘परिपूर्ण’ एवढ्यासाठीच म्हटलं की, लोकसाहित्याला आवश्यक असे ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक, आध्यात्मिक, संत वाङ्मयी, तत्त्वज्ञान आणि त्याशिवाय समाजशास्त्र, काव्यशास्त्र, व्याकरणशास्त्र, गायन, वादन, कायिक वाचिक साभिनयाच्यासहित प्रभावशाली सादरीकरणातून समाजमनावर जबरदस्त ‘गारूड’ घालणारा एक प्रतिभावंत कवी, शाहीर म्हणजे डॉ. शाहीर कुंतीनाथ करके.

काव्यशास्त्रातील गण, मात्रा, वृत्त, छंद, प्रास, अनुप्रास असे अनेक प्रकारांत त्यांनी विपुल लेखन लिहिले, म्हणूनच कवी यशवंत यांसारखे महान कवीदेखील ‘‘कुंतीनाथांची लेखणी ही बहुप्रसव आहे’’ असे म्हणायचे. पोवाडे, लावण्या, भारूड, सवाल जबाब, छेकानुपल्ली, कविता, मुक्तछंद, अभंग, आरत्या, पोथ्या, नाटक आणि कथाकथनसारखे अनेक प्रकार त्यांनी हाताळले.

प्रचंड वाचन, चिंतन, मनन, प्रज्ञावंतांचा सदैव सहवास, चर्चा, वाद, विवाद, विचारकलह यातून निर्माण झालेले साहित्य हे अगदी ग्रामीण शब्दापासून ते संस्कृतप्रचूर शब्दांच्या माध्यमातून कागदावर जणू दूध उतू गेल्यासारखे जाऊन शब्दांच्या माध्यमातून एका नव्या कलाकृतीचे रूप घेऊन उतरायचे. त्यांच्या शाहिरीबद्दल थोडक्यात बोलायचे म्हटले तर चौदा वर्षांपूर्वी मी आकाशवाणीवरून त्यांची मुलाखत घेतली तेव्हा मी उत्स्फूर्तपणे बोलून गेलो होतो. ‘‘शाहिरी ही ढाण्यावाघाची डरकाळी आहे, तर कधी कामधेनूची किंकाळी आहे, तर कधी शेतकऱ्यांच्या बांधावरनं सहकाऱ्याला दिलेली हाळी आहे, तर कधी जखमी हरिणीची किंकाळी आहे, तर कधी काळ्याकुट्ट मेघासारखी काळी आहे, तर कधी शब्दार्थानं भरलेली गोड गर्भित शहाळी आहे. कधी गरिबाची सुख-दु:खं टांगायची ती किंकाळी आहे, तर कधी रसरशीत रानमेव्याची रसानं भरलेली गोड करवंदाची जाळी आहे,’’ असं बरंच लिहिता येईल...पण शाहिरी ही मराठी रसिकाच्या कानात डुलणारी सुंदर अशी भिकबाळी आहे.. आणि अशा या शाहिरीला शब्द, सूर आणि ताल यांच्यासहित आपल्या पंखात ताकदीने पेलत या लोककलेच्या सरोवरात गेल्या पाच दशकांहून अधिक काळ दिमाखात डौलदारपणे विहार करणारा एक मनस्वी राजहंस आज अचानक कलासरोवर सोडून गेला...त्यांना विनम्र अभिवादन..

तीन भाषेवर प्रभुत्व

तीव्र स्मरणशक्ती, प्रचंड शब्दसंग्रह व सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मराठी, संस्कृत आणि इंग्रजी भाषेवर त्यांचे कमालीचे प्रभुत्व होते. मिश्कील विनोदी तसेच काहीसे फटकळ व तापट असले तरी ते कुटुंबवत्सल होते. सदैव उत्साहाचा झरा असाच त्यांचा स्वभाव होता.

प्रतिभेची उंची..

बहुतेक शाहिरांनी गण भरपूर लिहिले आहेत; परंतु कुंतीनाथांच्या शारदेची तुलना होईल असे शारदास्तवन मराठी साहित्यात आढळत नाही यावरून त्यांच्या प्रतिभेची उंची लक्षात येते.

विवेकानंद शिक्षण संस्थेत त्यांनी आयुष्यभर अध्यापनाचे काम केले. त्यानंतर ते याच संस्थेच्या नियामक मंडळाचे आजीव सदस्य होते. बापूजी साळुंखे यांना ते गुरुस्थानी मानत असत. त्यांच्याबद्दल कमालीची कृतज्ञतेची भावना त्यांच्या मनात होती. प्राचार्य पी. बी. पाटील व डॉ. डी. वाय. पाटील यांच्याशीही त्यांचा शालेय जीवनापासून गाढा स्नेह होता.

शिवशाहीर डॉ. राजू राऊत

शिवाजी पेठ, कोल्हापूर