शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
4
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
5
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
6
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
7
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
8
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
9
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
10
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
11
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
12
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
13
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
14
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
15
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
16
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
17
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
18
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
19
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
20
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी

आधारकार्डची जबाबदारी आता शाळांवर...

By admin | Updated: April 23, 2015 00:35 IST

अभियान राबवणार : शिक्षक, मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीने व्यवस्था करावी

शृंगारतळी : शालेय विद्यार्थ्यांना आधारकार्ड देण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग २७ एप्रिल ते २६ जून या कालावधीत अभियान राबवित आहे. विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढण्याची जबाबदारी शासनाने आता शिक्षक, मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती व अधिकाऱ्यांच्या खांद्यावर टाकली आहे. यासाठी २७ एप्रिल ते २६ जून या तारखेपर्यंत आधारकार्ड अभियान राबविण्यात येणार असल्याचे शासनाच्या आदेशात म्हटले आहे. राज्यातील शाळामध्ये प्रवेशित प्रत्येक बालकाचे आधारकार्ड काढून ते प्रवेश क्रमांकाशी जोडण्यात यावे असा आदेश शिक्षण विभागाने परिपत्रकाने काढला आहे. त्यामुळे आता शिक्षक, पालक व अधिकारी या सर्वांनाच शासनाचे आधारकार्डाच्या कामाला जुंपले आहे. शाळांनी प्रवेश दिलेल्या प्रत्येक बालकाचे आधारकार्ड तयार करण्यासाठी दि. २७ एप्रिल ते २६ जून हा कालावधी निश्चित केला आहे. प्रवेशित प्रत्येक बालकाच्या प्रवेश नोंदणी पंजिकेतील क्रमांक आता आधारकार्डाशी जोडण्यात यावा. त्यामुळे भविष्यातील एकही बालक शाळाबाह्य होणार नाही व झालेच तर कुठे व कोणत्या ठिकाणी आहे, याबाबत शोध घेणे सुलभ होईल.जिल्हास्तरावरून जिल्हाधिकारी यांनी आधारकार्ड निमिर्तीसाठी जी यंत्रे उपलब्ध आहेत, त्याचा पर्याप्त उपयोग करून या ६० दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील आधारकार्ड तयार करण्यात न आलेल्या शालेय विद्यार्थ्यांचे तालुका, गावनिहाय नियोजन करण्यात आदेश देण्यात आले आहेत. उपलब्ध संसाधनचा पर्याप्त वापर करून २६ जूनपर्यंत १०० टक्के बालकांचे आधारकार्ड तयार करून ते प्रवेशाशी संलग्न करावेत. कोणत्या गावात किती बालकाचे आधारकार्ड तयार केलेले नाहीत, याबाबतची माहिती शाळांकडून गटशिक्षणाधिकारी यांनी संकलित करून शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात सुपूर्द करावी. २७ एप्रिल ते २ मे या कालावधीत गटशिक्षणाधिकारी यांनी आपल्या गटातील ज्या शाळातील विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अद्याप तयार करण्यात आलेले नाहीत, अशा विद्यार्थ्यांची माहिती शिक्षणाधिकारी यांना उपलब्ध करून देणे आहे.दि. ३ मे ते ४ मे रोजी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून आलेली माहिती एकत्रित करून शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक यांनी आधारकार्ड न काढलेल्या बालकांची गावनिहाय यादी जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करावयाची आहे. ५ मे जिल्हाधिकारी कक्षातील संबंधित अधिकाऱ्याशी गटशिक्षणाधिकारी यांच्यासह गावनिहाय नियोजनासाठी संसाधनानुसार तालुक्यातील कोणत्या शाळेतील किती विद्यार्थ्यांचे आधारकार्ड कोणत्या दिनांकास तयार करावयाचे ते बैठक घेऊन नियोजन करावयाचे आहे. ६ मे रोजी गटशिक्षणाधिकारी यांनी शिक्षण विस्तार अधिकारी, केंदप्रमुख आणि मुख्याध्यापक यांच्याशी केलेल्या नियोजनाबरहुकूम कार्याची दिशा निश्चित करणे आहे. ७ मे रोजी मुख्याध्यापकांनी शाळा स्तरावर शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, पालक यांनी आधारकार्डासाठी जनजागरण व नियोजन करावयाचे आहे. ८ मे रोजी गावातून प्रभात फेरी काढून आधारकार्डबाबत प्रचार व प्रसार करायचा असल्याचा आदेश देण्यात आले आहेत. (वार्ताहर)नवे वेळापत्रक संभाळाविद्यार्थ्यांच्या आधारकार्डची जबाबदारी आता शिक्षकांवर येऊन पडल्याने शिक्षकांना मे महिन्यातच काम लागले आहे. या आधारकार्ड अभियानाचा कार्यक्रमच शासनाने जाहीर केला असून त्यामुळे परीक्षेनंतर नवे वेळापत्रक शिक्षकांना सांभाळावे लागणार आहे.