शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषणावर उपाय मूर्ती परत घेण्याचा!

By admin | Updated: August 25, 2016 00:50 IST

मूर्तिकार संघाचा पुढाकार : मंडळांच्या मूर्तिदानला पर्याय; विसर्जनानंतर योग्य पावित्र्यही राखण्यात हातभार

कोल्हापूर : वाढत्या प्रदूषणामुळे पंचगंगा नदी, इराणी खण असे गणेशमूर्ती विसर्जनाचे पर्याय कमी पडू लागले आहेत. सामाजिक संघटनांच्या मूर्तिदानाच्या हाकेला सार्वजनिक मंडळेही प्रतिसाद देऊ लागली आहेत. मात्र, यात मूर्ती विसर्जनानंतर काही वेळेस तीची योग्य ती विल्हेवाट लागत नसल्याचे काही ज्येष्ठ मूर्तिकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे याला पर्याय म्हणून कोल्हापुरातील गणेश मूर्तिकारांनी विसर्जन मिरवणुकीनंतर मूर्ती परत घेण्याची तयारी दर्शविली आहे. काही मंडळांनी असा उपक्रम राबविलाही आहे. गणेशोत्सव म्हटले की, हजारो गणेशमूर्तींचे आगमन आणि अकरा दिवसांचा मोठा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होतो. मात्र, विसर्जनानंतर प्लास्टरच्या मूर्ती व त्यावरील रासायनिक रंग यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते. या सर्वांचा विचार करून गेल्या काही वर्षात सामाजिक संघटनांच्या मदतीने मूर्तिदानचा स्तुत्य उपक्रम वाढत आहे. हा पर्याय आता सर्वमान्यही होऊ लागला आहे; पण या पर्यायात मूर्तिदान केल्यानंतर तिची योग्य ती विल्हेवाट लावली जात नसल्याची खंत कांही मूर्तिकारांची आहे. विशेष करून सार्वजनिक गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकीनंतर मूर्ती दान केली की, तिची विल्हेवाट महापालिका किंवा तत्सम यंत्रणा व्यवस्थित पार पाडत नाहीत, ही बाब या मूर्तिकारांच्या पाहणीत आढळून आली. एक मूर्ती संपूर्ण रंगकामासहित तयार करण्यासाठी किमान पंधरा दिवस ते महिनाभराचा कालावधी लागतो. यात नक्षीकामावर मूर्तिकार अफाट कष्ट घेतो. यासह मूर्ती दान केल्यानंतर काही व्यावसायिक त्या मूर्तीचे पॅटर्न तयार करतात. त्यामुळे पॅटर्नची चोरीही होते. त्यामुळे मूर्ती परत केल्यास त्यांची डागडुजी व रंगरंगोटी केल्यानंतर अन्य मंडळांना ही मूर्ती देताही येते. या सर्व बाबींचा फायदा या उपक्रमात होणार आहे. या मंडळांचा आदर्शकोल्हापुरातील राजारामपुरी येथील जिद्द युवक संघटना हे मंडळ गेल्या २० वर्षांपासून आपली गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक झाल्यानंतर विधीवत पूजा करून पुन्हा मूर्तिकारांकडे आणून देत आहे. याशिवाय जोतिबा डोंगर (वाडी रत्नागिरी) येथील नो मर्सी गु्रपने गेल्या वर्षी ११ फुटी गणेशमूर्ती मूर्तिकार श्रीकांत माजगावकर यांच्याकडे परत दिली आहे. या मूर्तीची रंगरंगोटी व डागडुजी करून ही मूर्ती यंदा अन्य मंडळास देण्यात आली आहे.विसर्जन कुंड हवेतमूर्तीचे योग्य विसर्जन होेण्यासाठी बेळगाव, बंगलोर, आदी ठिकाणी मोठ्या मूर्तींसाठी पाण्याचे कुंड बनविले जातात. कोल्हापुरातही अशी व्यवस्था होणे गरजेचे असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. विसर्जनानंतर मूर्तींची विल्हेवाट योग्यरीत्या होत नसल्याने काही वेळा भक्तांच्या भावना दुखावल्या जातात. याकरिता गणेशोत्सवाच्या किमान सहा महिने अगोदर सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्र येऊन कशा प्रकारे योग्य विसर्जन करावे, यावर चर्चा करणे गरजेचे आहे. - सर्जेराव निगवेकर, ज्येष्ठ मूर्तिकारमूर्ती विसर्जनामुळे प्रदूषण होते. त्यासाठी मूर्तिदान करा म्हणून काही मंडळे, संस्था पुढे येतात; पण त्यांच्याकडून योग्यरीत्या विसर्जन होत नाही. त्यामुळे आमच्याकडे या मूर्ती विसर्जनानंतर सोपविल्यास आम्ही त्यांची योग्य ती सोय करू. - संभाजी माजगावकर, अध्यक्ष, मूर्तिकार संघटना मूर्तिदाननंतर जमलेल्या मूर्तींचे विसर्जन योग्यरीत्या होत नाही. त्यामुळे मंडळांनी विसर्जनानंतर मूर्ती ज्या त्या मूर्तिकारांकडे सोपवाव्यात. त्या मूर्ती अन्य मंडळांना पुढील वर्षी हव्या असतील तर आम्ही देऊ. मूर्ती जास्त भग्न असेल तर योग्य त्या पद्धतीने विसर्जनही आम्हीच करू. यातून प्रदूषणाचा मोठा प्रश्नही सुटेल. - श्रीकांत माजगावकर, ज्येष्ठ मूर्तिकार जोतिबा (वाडी रत्नागिरी) येथील नो मर्सी गु्रपने कोल्हापुरातील ज्येष्ठ मूर्तिकार श्रीकांत माजगावकर यांच्याकडे विसर्जनानंतर परत केलेली ११ फुटी गणेशमूर्ती डागडुजीनंतर दुसऱ्या मंडळात विराजमान होण्यास सज्ज झाली आहे.