शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
4
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
5
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
6
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
7
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
8
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
9
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
10
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
11
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
12
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
13
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
14
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
15
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
16
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
17
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
18
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
19
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!

वसुली, मूल्यमापन, हिशेब... येथे सारंच चालतं आलबेल

By admin | Updated: April 16, 2015 00:23 IST

नागरिकांच्या नशिबी हेलपाटे : कर्मचाऱ्यांची अवघ्या दोन तासांची सेवा; घरफाळा कार्यालय म्हणजे ‘आओ- जाओ घर तुम्हारा’

संतोष पाटील - कोल्हापूर-शहरातील घरफाळा विभागाची ए, बी, सी, डी वॉर्डसाठी एक व ई वॉर्डशी एक अशी दोन कार्र्यालयांत विभागणी आहे. येथील मूल्यमापन लिपिकासह इतर बहुतांश कर्मचारी सकाळी नऊ ते दहा व त्यानंतर दुपारी चार ते सहा या वेळेत कार्यालयात भेटतात. इतरवेळी ते काय करतात, कुठे जातात, दिवसभर नेमके किती मिळकती व घरफाळ्याची वसुली तसेच मूल्यमापन कशाचे व किती केले, याचा हिशेब होत नाही. ‘आओ-जाओ, घर तुम्हारा’ अशीच येथील कार्यालयाची गत आहे. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी गुणात्मक व संख्यात्मक किती काम केले याचा आढावा घेतल्यास येथील यंत्रणेवर आपोआपच चाप बसणार आहे. ई-आॅफिस प्रणालीबरोबरच कर्मचाऱ्यांच्या कामाच्या पद्धतीकडेही आयुक्तांनी लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.घरफाळ्याबाबत एखादी तक्रार किंवा शंका असल्यास त्याचे निवारण त्या विभागातील मूल्यमापन लिपिकच करू शकतो. वरिष्ठ हात वर करून मोकळे होतात, संबंधित लिपिकांपर्यंत पोहोचण्यास किमान सहा ते सात फेऱ्या नागरिकांना माराव्या लागत असल्याचे चित्र आहे. बिलातील फरक किंवा तक्रारींबाबत संबंधित लिपिकाकडे बोट दाखवून वरिष्ठ नामानिराळे होतात, तर नागरी सुविधा केंद्राची चूक, संगणकीय यंत्रणेत असलेला दोष अशी जुजबी कारणे देत कर्मचाऱ्यांकडून हात वर करण्याचे प्रकार येथे सुरू आहेत. आयुक्तांनी पकडलेला १० लाख रुपयांच्या दंडात दिलेली सूट हा प्रकारही ‘संगणकीय चूक’ म्हणत वरिष्ठ अगदी किरकोळ समजत आहेत. प्रत्यक्षात ही चूक नसून ‘सायबर क्राईम’ असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अशा प्रकारच्या चुकांसाठीही यापूर्वी परस्पर फौजदारी करण्याचे प्रकार घडले आहेत. ‘सापडला तो चोर; त्यात तो आपला असेल तर बाळ्या; दुसऱ्याचा असेल तर भामटा’ अशा पद्धतीने तक्रारीकडे पाहण्याचा घरफाळा विभागात पायंडा आहे. हाच पायंडा मोडण्याचे आव्हान आयुक्तांसमोर आहे. (समाप्त)मात्र, चार वर्षांपूर्वी शहरातील एका मोठ्या औद्योगिक समूहाला लाखो रुपयांचा घरफाळा न भरताच त्याची बाकी शून्य दाखविण्याची किमया येथील महाभागांनी केली आहे. या प्रकरणाची पोलीस चौकशीनंतर याचे पाळेमुळे थेट आयुक्त कार्यालयापर्यंत पोहोचल्याचे सिद्ध झाले होते. मात्र, काही महिन्यांनंतर सर्व काही आलबेल झाले. घरफाळ्याची झाडाझडती करण्याचे काम आयुक्तांना हाती घ्यावे लागणार आहे.कच्च्या पावतीद्वारे भरलेला घरफाळा प्रत्यक्षात मनपाच्या तिजोरीत गेला किंवा नाही याची माहिती पुढील वर्षीच्या घरफाळ्याची पावती आल्यानंतर समजते. यामध्ये काही गफलत केल्यास याची माहिती फक्त मनपातील संबंधित यंत्रणा व मालकांनाच समजते. या प्रक्रियेत नसलेल्या त्रयस्थाला यातील घोळ सहजासहजी समजत नाही. हीच घरफाळा विभागातील खरी मेख आहे. अशाप्रकारे कच्च्या पावत्या देऊन केलेला आणखी एक घोटाळा मिटविण्याचा प्रकार सुरू आहे. मात्र, याच्या खोलापर्यंत जाण्याचे धाडस वरिष्ठांनी दाखविलेले नाही. येथील घोटाळ्याचे चक्रव्यूह आयुक्त पी. शिवशंकर भेदणार की मागील अनेक प्रकरणांप्रमाणे खमंग चर्चेअंती विषय बासनात गुंडाळून पडणार हाच खरा औत्सुक्याचा विषय आहे.