शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

देवस्थानच्या दहा हजार हेक्टर जमिनींच्या नोंदी सापडल्या

By admin | Updated: July 15, 2017 00:50 IST

देवस्थानच्या दहा हजार हेक्टर जमिनींच्या नोंदी सापडल्या

इंदुमती गणेश । लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमधील तीन हजार ६४ मंदिरांचे व्यवस्थापन करणाऱ्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने गेल्या तीन वर्षांपासून समितीच्या जमिनींचे सात-बारा उतारे काढण्याचे काम सुरू आहे. या अंतर्गत आजतागायत दहा हजार ४९२ हेक्टर जमिनींच्या नोंदी सापडल्या असून, आणखी काही जमिनींच्या नोंदी सापडण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्या काळात देवस्थान जमिनींचे सात-बारा उतारे काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. संस्थानकाळात अंबाबाई मंदिरासह पश्चिम महाराष्ट्रातील देवस्थाने छत्रपतींच्या मालकीची होती. संस्थान खालसा झाल्यानंतर १९५१ सालापासून या सर्व देवस्थानांचा कारभार जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली चालविला जात होता. जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र देवस्थान मंडळ कार्यरत होते. १९७८-७९ मध्ये ‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती’ अस्तित्वात आली आणि देवस्थानांचा कारभार देवस्थान समितीच्या अखत्यारीत गेला.मात्र, समितीवर आलेल्या पदाधिकारी, वहिवाटदार व लागवडदारांकडून देवस्थानांच्या जमिनी बेकायदेशीररीत्या हडप करण्यात आल्या आहेत. मात्र, देवस्थानाला कूळकायदा लागू नसल्याने जमिनी परस्पर कितीही हस्तांतरित झाल्या तरी त्यांवर देवस्थानची मालकी कायम राहतेच. त्यावर तोडगा म्हणून काही राजकीय व्यक्ती व शिक्षणसम्राटांकडून देवच अस्तित्वात नसल्याचे दाखवून जमिनींचे कायदेशीररीत्या हस्तांतरण करण्यात आले आहे. काही ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. मुळात देवस्थान समितीचेच आपल्याकडील जमिनींबाबत अज्ञान होते. मात्र, तीन वर्षांपूर्वी समितीचे अध्यक्ष म्हणून आलेले तत्कालीन जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी आपला महसूल विभागाचा अनुभव कामी आणत समितीच्या कामाला शिस्त लावली. त्याच दरम्यान त्यांनी देवस्थान समितीच्या अखत्यारीत असलेल्या जमिनींच्या नोंदी आणि सात-बारा उतारे काढण्याच्या निर्णय घेतला आणितातडीने कामाला सुरुवातही करण्यात आली. यामुळे देवस्थानच्या मालकीच्या नक्की किती जमिनी आहेत, याची एकत्रित माहिती समितीकडे असणार आहे. माने यांच्या बदलीनंतरही आजतागायत या नोंदी काढण्याचे काम सुरूच आहे. गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या कामांतर्गत समितीकडे आज तब्बल दहा हजार ४९२ हेक्टर जमिनींच्या नोंदी व सातबारा उतारे सापडले आहेत. त्यांतील काही कागदपत्रे हस्ताक्षरातील आहेत, तर काही आॅनलाईन आहेत. अजूनदेखील या सात-बारा नोंदी काढण्याचे काम सुरू असून, त्याअंतर्गत आणखी काही जमिनींच्या नोंदी सापडण्याची शक्यता आहे, अशी माहिती सहसचिव एस. एस. साळवी यांनी दिली. दुर्मीळ कागदपत्रांचे होणार डिजिटायझेशनपुढील काही दिवसांत समितीकडे उपलब्ध असलेल्या देवस्थानांसंबंधीच्या पुरातन, दुर्मीळ व अतिमहत्त्वाच्या कागदपत्रांचे डिजिटायझेशन करण्यात येणार आहे. देवस्थान समितीकडे देवस्थानांसंबंधी असलेली जुनी कागदपत्रे, मोडी लिपीतील हस्तलिखिते, मंदिरांची माहिती, १९५१ पूर्वीचे कारभार, सनदा, छत्रपतींशी संबंधित कागदपत्रे, देवीला दान म्हणून आलेल्या साहित्याच्या नोंदी, रजिस्टर असे जुने दस्तऐवज आहेत. त्या सर्व दस्तऐवजांचे डिजिटायझेशन करण्यात येणार असून, काही दिवसांतच त्याचे टेंडर प्रसिद्ध होणार आहे. १ महाराष्ट्रात ‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’ ही एकमेव समिती आहे, जिच्याअंतर्गत तीन हजार ६४ मंदिरे आणि २७ हजार एकर जमीन आहे. समितीचा कारभार ‘मुंबई विश्वस्त कायदा १९५०-५१’ नुसार सुरू असून, त्यातील प्रकरण ‘५ अ’ हे खास देवस्थानांच्या कारभाराविषयी आहे. २ शिर्डी, पंढरपूर, सिद्धिविनायक या ठिकाणी केवळ एकच देवालय आहे. याव्यतिरिक्त अन्य लहान-मोठी देवस्थाने आहेत. त्यांचे एकत्रीकरण करून स्वतंत्र कायदा राबविता येतो का, यावर गुरुवारच्या बैठकीत विचार झाला. नव्याने येणाऱ्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची निवड करण्यात आली.