शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

राज्य बँकेकडून साखर मूल्यांकन घटीचा विक्रम

By admin | Updated: July 7, 2015 23:59 IST

सलग आठव्यांदा घट : साखर कारखान्यांच्या कोट्यवधींच्या शेअर्स रकमेला राज्य बँकेकडून छदामही नाही

कोपार्डे : जसजसे साखरेचे दर घसरू लागले तसे राज्य बँकेने आपले पतधोरणही बदलले असून, साखर मूल्यांकन दर तीन महिन्यांनी जाहीर करण्याचा पायंडाच मोडल्याचे पहायला मिळत आहे. एक महिन्यात बाजारातील साखरेच्या दराचे भांडवल करत तीनवेळा साखर मूल्यांकन घटवून साखर कारखान्यांसमोरील आर्थिक अडचणीत भर टाकली असल्याचे मत साखर उद्योगातून व्यक्त होत आहे. सध्या साखरेच्या दराने गेल्या दोन वर्षांतील निच्चांक गाठला आहे. १९०० ते २००० रुपये एक्स फॅक्टरी दर प्रति क्विंटलवर आल्याने मोठी आर्थिक चणचण कारखानदारींसमोर निर्माण झाली आहे. बाजारात साखर उत्पादन खर्चाच्या किमान ६०० ते ७०० रुपये कमी दर मिळत असल्याने एफ.आर.पी. द्यायची कोठून हा प्रश्न कारखानदारांसमोर उभा ठाकला आहे.त्यातच राज्य बँकेकडून प्रतिक्विंटल साखर उत्पादनावर देण्यात येणाऱ्या कर्जाच्या उचलीत कमालीची घट करत आर्थिक हातोडा उगारला आहे. हंगाम २०१४-१५ मध्ये आॅक्टोबर २०१४ मध्ये राज्य बँक प्रतिक्विंटल देत असलेली उचल २६३० रुपये होती. यावेळी साखरेची बाजारातील दराची घसरण सुरू झाली आहे. ती २००० रुपये प्रतिक्विंटल आल्याने २९ जून २०१५ मध्ये राज्य बँकेने प्रतिक्विंटल देत असलेल्या २१०० रुपये उचलीमध्ये १५० रुपये घट केली असून, ती १९५० वर आणली आहे. ही घट या हंगामातील आठव्यांदा असून, तो विक्रमच म्हणावा लागेल. दरम्यान, अडचणीच्या काळात राज्य बँकेकडून मदतीची अपेक्षा साखर उद्योगाला होती. पूर्वहंगामी कर्ज देताना एकूण कर्जाच्या एक ते दीड टक्का रक्कम शेअर्स भांडवल म्हणून कपात करते. या शेअर्स भांडवलावर राज्य बँकेकडून २००४ पासून एक रुपयाही रिबेट अथवा व्याज दिलेले नाही. राज्यातील साखर कारखान्यांची ही शेअर्स ठेव राज्य बँकेकडे कोट्यवधीच्या घरात आहे. ही रक्कम राज्य बँक बिनव्याजी वापरत आहे. आमच्या शेअर्स भांडवलावर व्याज देत नसाल ती साखर उद्योग अडचणीत असताना परत करा, अशी मागणी साखर कारखानदारांकडून होत आहे.तीन महिन्यांनी बाजारातील सरासरी साखरेचा दर पाहून साखर मूल्यांकन जाहीर करण्याचा नियम आजपर्यंत होता, पण या हंगामात (२०१४-१५) तो धाब्यावर बसवून राज्य बँकेने दीड महिन्यात तीनवेळा साखर मूल्यांकनात घट केल्याने साखर उद्योगातून असंतोष व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)१९५०च्या ८५ टक्के मिळणार उचल राज्य बँकेने १९५० रुपये प्रतिक्विंटल उचल जाहीर केली असली तरी त्यांच्या ८५ टक्के म्हणजे १६५७ रुपये ५० पैसेच उपलब्ध होणार आहेत. यातील बँकेचे पूर्वीचे कर्जाचे व्याज, उत्पादन खर्च यापोटी ७५० रुपये वजा करता म्हणजे ऊस दर देण्यासाठी केवळ ९७५ रुपये २५ पैसेच साखर कारखानदारांच्या हातात पडणार आहेत. जिल्ह्यातील साखर कारखान्यांची सरासरी एफआरपी २४०० ते २६०० रुपये असल्याने उर्वरित १७०० रुपये प्रतिटन कोठून उपलब्ध करायचे हा प्रश्न असताना कारखाने शॉर्टमार्जिनमध्ये आले आहेत. साखर उद्योगाच्या इतिहासातील प्रथमच प्रसंगराज्य बँकेकडून साखर मूल्यांकनामध्ये सातवेळा घट करण्यात आली. एकाच हंगामात एवढ्यावेळा घट करण्याचा साखर उद्योगाच्या इतिहासातील प्रथमच प्रसंग असल्याचे साखर उद्योगातील तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.