शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

काळासोबत समाजातील गरजा ओळखा : मंत्री पाटील

By admin | Updated: July 16, 2017 18:42 IST

सावली केअर सेंटरचा वर्धापनदिन

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. १६ : काळासोबतच समाजाची गरज लक्षात घेऊन आता प्रकल्प उभे राहिले पाहिजेत. फक्त आर्थिक मदत करूनच सामाजिक उपक्रम उभे राहू शकत नाहीत, तर त्यांना वेळही देणे तितकेच महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. केशवराव भोसले नाट्यगृहात रविवारी सावली केअर सेंटरच्या तेराव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नाशिक येथील ‘नॅब’ संस्थेच्या अंध मुलांनी रोप, मल्लखांब प्रात्यक्षिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले.

मंत्री पाटील म्हणाले, ‘सावली’सारख्या संस्था या काळाची गरज बनल्या आहेत. यासारख्या संस्थांना सुरुवातीच्या काळात आर्थिक मदत केल्यास, त्या नक्कीच बहरतात. या संस्था समाजाला प्रेरणा देणारे काम करीत असल्याने त्या अनेकांशी जोडल्या जातात. मात्र या संस्थांना आर्थिक मदतीसह प्रत्येकाने वेळ देणे आता गरजेचे झाले आहे. सावली संस्थेची भव्य व सुसज्ज इमारत उभी राहत आहे. या इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येईल अशी ग्वाही पाटील यांनी यावेळी दिली.

सावली केअर सेंटरचे प्रकल्प संचालक किशोर देशपांडे यांनी प्रास्ताविक केले; तर सुहास बांदल यांनी ‘ग्रीन’ संकल्पनेविषयी सविस्तर माहिती दिली. सोनाली नवांगुळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. याप्रसंगी इंडियन डेअरी असोसिएशनचे अध्यक्ष अरुण नरके, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक, शिवपाल बनसोडे, मनोहर शर्मा, प्रकाश मेहता यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

 

डोळसांना विचार करायला भाग पाडले....

 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला नाशिकमधील रोप मल्लखांब खेळणारा नॅबच्या अंध विद्यार्थ्याने डोळसांना विचार करायला भाग पाडले. उंच अशा दोरीवर प्रात्यक्षिक करून त्याने सर्वांनाच थक्क केले. मानवी मनोरा करून त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या कल्पनेतून या संघाचा जन्म झाल्याचे संघाचे प्रशिक्षक यशवंत जाधव यांनी यावेळी सांगितले. खेळाडूंना टिचकी आणि टाळ्यांच्या माध्यमातून त्यांनी प्रशिक्षण दिले आहे. संस्थेच्या सुगंधा शुक्ल यांनी प्रत्येक प्रात्यक्षिकाची सविस्तर माहिती देत होत्या. सर्व मुलीं अंध असल्याने समोर कोण पाहते, व्यासपीठ कसे आहे याचा विचार न करता फक्त स्पर्शाच्या माध्यमातून त्यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले. त्यांच्या प्रत्येक प्रात्यक्षिकाला सर्वांनी जोरदार टाळ््या वाजवून प्रतिसाद दिला. या विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. यासह ‘कोहाम’ संस्थेमधील मुला-मुलींनी व कर्मचाऱ्यांनी गाण्यांचे सादरीकरण केले. सांस्कृतिक कार्यक्रमातून स्त्रीभ्रूणहत्या व पर्यावरण जनजागृतीचा संदेश दिला.