शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रेशनची माहिती एका ‘क्लिक’वर : आगवण

By admin | Updated: November 27, 2014 00:12 IST

रेशन, गॅस वितरणात काळाबाजार करणाऱ्यांवर फौजदारी--थेट संवाद

प्रश्न : अन्नसुरक्षा योजनेची अंमलबजावणी कशा पद्धतीने सुरू आहे?उत्तर : अन्नसुरक्षा योजनेची अंमलबजावणी फेब्रुवारी २०१४ नंतर सुरू झाली. याचा जिल्ह्यातील सुमारे दोन तृतीयांश नागरिकांना या योजनेंतर्गत तीन रुपये किलो दराने गहू व दोन रुपये किलो दराने तांदूळ असा धान्याचा लाभ मिळत आहे. योजनेच्या अंमलबजावणीचे महत्त्व आणि व्याप्ती विचारात घेता संपूर्ण सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामध्ये केंद्र सरकारच्या अन्नधान्य महामंडळ (एफसीआय) या गोदामामध्ये राज्य शासनाकडून मंजूर होणाऱ्या अन्नधान्याच्या नियतनाची उचल करून तालुक्यांना वाटप करणे व तालुक्यांकडून सर्व रेशन दुकानांना त्वरित वितरण करणे, ही संपूर्ण प्रक्रिया वेळेवर होऊन लाभार्थ्यांपर्यंत हक्काचे धान्य पोहोचावे, यासाठी संपूर्ण दक्षता घेण्यात येत आहे. सद्य:स्थितीला ‘एनआयसी’च्या वेबसाईटवर सर्व तालुक्यांची प्रत्येक महिन्याची अन्नधान्य, साखर व रॉकेल वाटपाची माहिती ही नियमितपणे दोन महिन्यांपासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोणालाही या वेबसाईटवर ही माहिती एका क्लिकवर मिळू शकते.प्रश्न : रेशनसह गॅस वितरण व्यवस्थेतील गैरप्रकारांवर कसे नियंत्रण ठेवाल?उत्तर : शिधावस्तू, घरगुती गॅस, रॉकेल यांच्या काळाबाजारावर आळा घालण्यासाठी ज्या ठिकाणी असे गैरप्रकार होत आहेत, त्या ठिकाणी धाडी टाकून तपासणी करण्याबरोबरच यासाठी खास मोहिमा आखून यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. काळाबाजार करणाऱ्या लोकांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियमातील तरतुदीनुसार फौजदारी कारवाई केली जाईल. याखेरीज गॅस ग्राहकांच्या बॅँक खात्यावर थेट अनुदान जमा करण्याच्या योजनेला शासनाकडून १ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या प्रक्रियेवर बारीक लक्ष ठेवले जाणार आहे. त्याचबरोबर ग्राहकांना वेळेवर गॅस सिलिंडर मिळावे, यासाठी ज्या-त्या गावातील जे ठिकाण निश्चित केले आहे, त्या ठिकाणी गॅसवाटपाचे वेळापत्रक लावण्यात येईल. यामध्ये ठिकाण, वार, वेळ अशी माहिती असेल. ग्रामपंचायत व तलाठी कार्यालय, आदी ठिकाणी हे वेळापत्रक लावण्यात येईल. त्याच्या संकलनाचे काम सुरू आहे. ते लवकरच पूर्ण होणार असून, त्यानंतर नक्कीच ग्राहकांचा त्रास आणि वेळ वाचेल.प्रश्न : मिळणाऱ्या धान्याच्या तुलनेत गोदामांची क्षमता कमी आहे?उत्तर : जिल्ह्याला मिळणाऱ्या धान्याची साठवणूक करण्यात येत असलेली गोदामांची क्षमता ५०० ते १००० मेट्रिक टनांच्या दरम्यान आहे. गोदामांच्या क्षमतेअभावी धान्यांच्या आवक-जावकेचे गणित बिघडते. सध्या बारा तालुक्यांना बारा अशी गोदामे आहेत. त्याशिवाय कोल्हापूर व इचलकरंजी शहरांसाठी दोन अशी एकूण चौदा गोदामे आहेत. त्यांची क्षमता ९ हजार ७०० मेट्रिक टन इतकी आहे. गोदामांची ही स्थिती लक्षात घेता नवीन १३ गोदामांचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. १००० ते ३००० मेट्रिक टन क्षमतेच्या घरातील या सर्व गोदामांची संख्या २६ हजार ६६० मेट्रिक टन इतकी आहे. यासाठी सुमारे ३० कोटी रुपये इतका अंदाजपत्रकीय खर्च आहे. सद्य:स्थितीला १३ पैकी केर्ले (ता. करवीर), कागल, पन्हाळा व शाहूवाडी या ठिकाणी गोदामे मंजूर झाली असून, त्यांचे कामही सुरू झाले आहे.प्रश्न : शिधापत्रिकांच्या संगणकीकरणाचे काम कोणत्या टप्प्यावर आहे?उत्तर : २०१२ पासून शिधापत्रिकांच्या संगणकीकरणाचे काम सुरू आहे. सद्य:स्थितीत शिधापत्रिकांच्या डाटा एंट्रीचे ९० टक्क्यांहून अधिक काम झाले आहे. त्यांच्या प्रमाणीकरणाचे (व्हेरिफिकेशन) काम ३२ टक्के इतके झाले आहे. या कामाला गती दिली जात आहे.प्रश्न : रेशन दुकानांच्या जाहीरनाम्यांना प्रतिसाद का नाही?उत्तर : शासनाचे मूळ धोरण हे महिला बचत गटांना रेशन दुकान देण्याचे आहे. जर त्यांना प्रतिसाद मिळाला नाही तर अन्य प्रवर्गांचा विचार केला जातो. सध्या जिल्ह्यात १५६९ इतकी रेशन दुकाने कार्यरत आहेत. त्यापैकी महिला बचत गटांची संख्या २१७ इतकी आहे. या व्यतिरिक्त ‘गाव तिथे दुकान’ या धोरणानुसार नव्याने द्यावयाच्या दुकानांसाठी गतवर्षी ३०२ जाहीरनामे काढण्यात आले होते. त्यापैकी १५३ दुकाने मंजूर केली आहेत. एकंदरीत महिला बचत गटांचा याला कमी प्रतिसाद आहे. यासाठी पुढील जाहीरनामा काढताना संबंधित तहसीलदारांना संबंधित गावातील महिला बचत गटांच्या बैठका घेण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. यावेळी दुकान मंजुरीच्या निकषांबाबत व पात्रतेसंबंधी मार्गदर्शन करण्याचे नियोजन आहे.- प्रवीण देसाईरेशन, गॅस वितरणात काळाबाजार करणाऱ्यांवर फौजदारी--थेटसंवाद