शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
2
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
3
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
4
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले
5
ENG vs IND : भारतीय क्रिकेटमध्ये दुखवटा! मैदानात दोन्ही संघांतील खेळाडूंनी दिग्गज फिरकीपटूला वाहिली श्रद्धांजली
6
Gold Silver Price 24 June: एका झटक्यात सोनं झालं ₹२ हजारांपेक्षाही स्वस्त; Iran-Israel युद्ध थांबलं तर चांदीचीही चमक झाली कमी
7
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
8
गब्बर सिंगला डायलॉग शिकवल्यावरुन ट्रोल होतायेत महागुरु, नक्की काय म्हणाले होते?; पाहा Video
9
Jyeshtha Amavasya 2025: घरातले आजारपण, भांडणतंटा काढता पाय घेत नसेल तर ज्येष्ठ अमावास्येला करा 'हे' उपाय!
10
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
11
'या' केसांच्या तेलामुळे गुंतवणूकदार झाले मालामाल! एका दिवसात २०% नफा, स्टॉक झाला रॉकेट!
12
"एक, दोन नव्हे, पत्नीने केली पाच लग्नं, आता दिरासोबत करतेय प्रेमाचे चाळे’’, त्रस्त पतीची पोलिसांत धाव 
13
Crime: शिक्षिकाचे शाळेतच नको ते उद्योग; २४ विद्यार्थिनींसोबत...; नराधमाला अटक!
14
IND vs ENG: ऋषभ पंत-केएल राहुलच्या शतकानंतर इंग्लंडच्या माजी गोलंदाजाचा आरोप, अंपायरनाही सुनावलं...
15
५ वर्षात चौपट झाला गुंतवणूकदारांचा पैसा, आता प्रत्येक शेअरवर मिळणार डिविडेंड; तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
17
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
18
इराणच्या बाजुलाच आहे अमेरिकन लष्कराचा ताफा, कशासाठी झाला आहे वापर?
19
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
20
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!

रेशनची माहिती एका ‘क्लिक’वर : आगवण

By admin | Updated: November 27, 2014 00:12 IST

रेशन, गॅस वितरणात काळाबाजार करणाऱ्यांवर फौजदारी--थेट संवाद

प्रश्न : अन्नसुरक्षा योजनेची अंमलबजावणी कशा पद्धतीने सुरू आहे?उत्तर : अन्नसुरक्षा योजनेची अंमलबजावणी फेब्रुवारी २०१४ नंतर सुरू झाली. याचा जिल्ह्यातील सुमारे दोन तृतीयांश नागरिकांना या योजनेंतर्गत तीन रुपये किलो दराने गहू व दोन रुपये किलो दराने तांदूळ असा धान्याचा लाभ मिळत आहे. योजनेच्या अंमलबजावणीचे महत्त्व आणि व्याप्ती विचारात घेता संपूर्ण सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामध्ये केंद्र सरकारच्या अन्नधान्य महामंडळ (एफसीआय) या गोदामामध्ये राज्य शासनाकडून मंजूर होणाऱ्या अन्नधान्याच्या नियतनाची उचल करून तालुक्यांना वाटप करणे व तालुक्यांकडून सर्व रेशन दुकानांना त्वरित वितरण करणे, ही संपूर्ण प्रक्रिया वेळेवर होऊन लाभार्थ्यांपर्यंत हक्काचे धान्य पोहोचावे, यासाठी संपूर्ण दक्षता घेण्यात येत आहे. सद्य:स्थितीला ‘एनआयसी’च्या वेबसाईटवर सर्व तालुक्यांची प्रत्येक महिन्याची अन्नधान्य, साखर व रॉकेल वाटपाची माहिती ही नियमितपणे दोन महिन्यांपासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोणालाही या वेबसाईटवर ही माहिती एका क्लिकवर मिळू शकते.प्रश्न : रेशनसह गॅस वितरण व्यवस्थेतील गैरप्रकारांवर कसे नियंत्रण ठेवाल?उत्तर : शिधावस्तू, घरगुती गॅस, रॉकेल यांच्या काळाबाजारावर आळा घालण्यासाठी ज्या ठिकाणी असे गैरप्रकार होत आहेत, त्या ठिकाणी धाडी टाकून तपासणी करण्याबरोबरच यासाठी खास मोहिमा आखून यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. काळाबाजार करणाऱ्या लोकांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियमातील तरतुदीनुसार फौजदारी कारवाई केली जाईल. याखेरीज गॅस ग्राहकांच्या बॅँक खात्यावर थेट अनुदान जमा करण्याच्या योजनेला शासनाकडून १ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या प्रक्रियेवर बारीक लक्ष ठेवले जाणार आहे. त्याचबरोबर ग्राहकांना वेळेवर गॅस सिलिंडर मिळावे, यासाठी ज्या-त्या गावातील जे ठिकाण निश्चित केले आहे, त्या ठिकाणी गॅसवाटपाचे वेळापत्रक लावण्यात येईल. यामध्ये ठिकाण, वार, वेळ अशी माहिती असेल. ग्रामपंचायत व तलाठी कार्यालय, आदी ठिकाणी हे वेळापत्रक लावण्यात येईल. त्याच्या संकलनाचे काम सुरू आहे. ते लवकरच पूर्ण होणार असून, त्यानंतर नक्कीच ग्राहकांचा त्रास आणि वेळ वाचेल.प्रश्न : मिळणाऱ्या धान्याच्या तुलनेत गोदामांची क्षमता कमी आहे?उत्तर : जिल्ह्याला मिळणाऱ्या धान्याची साठवणूक करण्यात येत असलेली गोदामांची क्षमता ५०० ते १००० मेट्रिक टनांच्या दरम्यान आहे. गोदामांच्या क्षमतेअभावी धान्यांच्या आवक-जावकेचे गणित बिघडते. सध्या बारा तालुक्यांना बारा अशी गोदामे आहेत. त्याशिवाय कोल्हापूर व इचलकरंजी शहरांसाठी दोन अशी एकूण चौदा गोदामे आहेत. त्यांची क्षमता ९ हजार ७०० मेट्रिक टन इतकी आहे. गोदामांची ही स्थिती लक्षात घेता नवीन १३ गोदामांचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. १००० ते ३००० मेट्रिक टन क्षमतेच्या घरातील या सर्व गोदामांची संख्या २६ हजार ६६० मेट्रिक टन इतकी आहे. यासाठी सुमारे ३० कोटी रुपये इतका अंदाजपत्रकीय खर्च आहे. सद्य:स्थितीला १३ पैकी केर्ले (ता. करवीर), कागल, पन्हाळा व शाहूवाडी या ठिकाणी गोदामे मंजूर झाली असून, त्यांचे कामही सुरू झाले आहे.प्रश्न : शिधापत्रिकांच्या संगणकीकरणाचे काम कोणत्या टप्प्यावर आहे?उत्तर : २०१२ पासून शिधापत्रिकांच्या संगणकीकरणाचे काम सुरू आहे. सद्य:स्थितीत शिधापत्रिकांच्या डाटा एंट्रीचे ९० टक्क्यांहून अधिक काम झाले आहे. त्यांच्या प्रमाणीकरणाचे (व्हेरिफिकेशन) काम ३२ टक्के इतके झाले आहे. या कामाला गती दिली जात आहे.प्रश्न : रेशन दुकानांच्या जाहीरनाम्यांना प्रतिसाद का नाही?उत्तर : शासनाचे मूळ धोरण हे महिला बचत गटांना रेशन दुकान देण्याचे आहे. जर त्यांना प्रतिसाद मिळाला नाही तर अन्य प्रवर्गांचा विचार केला जातो. सध्या जिल्ह्यात १५६९ इतकी रेशन दुकाने कार्यरत आहेत. त्यापैकी महिला बचत गटांची संख्या २१७ इतकी आहे. या व्यतिरिक्त ‘गाव तिथे दुकान’ या धोरणानुसार नव्याने द्यावयाच्या दुकानांसाठी गतवर्षी ३०२ जाहीरनामे काढण्यात आले होते. त्यापैकी १५३ दुकाने मंजूर केली आहेत. एकंदरीत महिला बचत गटांचा याला कमी प्रतिसाद आहे. यासाठी पुढील जाहीरनामा काढताना संबंधित तहसीलदारांना संबंधित गावातील महिला बचत गटांच्या बैठका घेण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. यावेळी दुकान मंजुरीच्या निकषांबाबत व पात्रतेसंबंधी मार्गदर्शन करण्याचे नियोजन आहे.- प्रवीण देसाईरेशन, गॅस वितरणात काळाबाजार करणाऱ्यांवर फौजदारी--थेटसंवाद