शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

‘गोधन’ जपणारी रामणवाडी

By admin | Updated: September 30, 2015 01:14 IST

गोमूत्र डेअरीचा उपक्रम : ‘वेणुमाधुरी’ने दिला स्वावलंबनाचा मंत्र

संतोष मिठारी - कोल्हापूर  -दगड-धोंड्यांची वाट, पाणीटंचाई आणि अन्य पायाभूत सुविधांची वानवा असलेल्या रामणवाडी (ता. राधानगरी) गोसंवर्धनाच्या माध्यमातून सक्षमीकरण व विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. वेणुमाधुरी ट्रस्टच्या माध्यमातून गो-संवर्धन, गोमूत्र डेअरी सुरू करून स्वावलंबनाचा मंत्र जोपासला आहे.गो-संवर्धन आणि त्याद्वारे स्वावलंबी शेती, सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने २००२ मध्ये वेणुमाधुरी ट्रस्टने आपल्या कामाची रामणवाडीतून सुरुवात केली. दगड-धोंड्यांची वाट आणि पायाभूत सुविधांची वानवा असलेल्या गावाची गरज ओळखून ट्रस्टने या गावाची निवड केली. तेरा वर्षांपूर्वी असलेल्या गावठी गायी परवडत नसल्याने लोकांनी त्या जंगलात सोडल्या होत्या. त्यामुळे गावात अवघ्या दहाच्या आसपास गायी होत्या. गायींचे पालन करावे यासाठी ट्रस्टतर्फे त्यांचे प्रबोधन करण्यात आले. त्याला ग्रामस्थ दत्ता पाटील, मारुती पाटील, युवराज पाटील यांनी पुढाकार घेऊन बळ दिले. ट्रस्टतर्फे व्हेटर्नरी दवाखाना सुरू करण्यासह गोबरगॅस प्लॅँट बांधण्यात आले. परिणामी गायींची संख्या वाढली.त्यातून शेतीला मदत होण्यासह संबंधितांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा म्हणून शेणापासून धूप बनविणे, गोमूत्राचा अर्क काढणे, शेणींपासून दंतमंजन निर्मिती ट्रस्ट सुरू केला. रामणवाडीसह जिल्ह्यातील लक्षतीर्थ वसाहत, घोसरवाड, उत्तरे, खोतवाडी व सोनतळीमधील महिलांना धूपनिर्मितीचे प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे धूप बनविणे, गोवऱ्या लावणे, गोमूत्राची विक्री यांतून रोजगार मिळाला आहे. अनेकजण गायीचा निव्वळ दुधासाठी वापर करतात. गायीने दूध देणे बंद केल्यास काहीजण तिला कत्तलखान्याची वाट दाखवितात; पण, रामणवाडी गावकऱ्यांनी गो-संवर्धनाचे पाऊल टाकून स्वावलंबनाचा मंत्र खऱ्या अर्थाने जोपासला आहे.आठ रुपये लिटर गोमूत्रआयुर्वेदिक, औषधीदृष्ट्या गोमूत्राचे पूर्वीपासून महत्त्व आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधन आणि ‘सोशल मीडिया’मुळे ते पुन्हा चर्चेत आले आहे; शिवाय, गोमूत्राचा औषधी अर्क व आयुर्वेद साबणांसाठी वापर होत आहे. त्यामुळे गोमूत्र, शेण, अर्काची मागणी वाढत आहे. रामणवाडीत सध्या ७० गायी आहेत. सकाळी पहिल्या धारेचे गोमूत्र गावकरी धरतात. एका घरात असलेल्या डेअरीत ते संकलित केले जाते. रोज एक गाय साधारण गोमूत्राच्या माध्यमातून चाळीस रुपये मिळवून देते. गोवऱ्या सहा रुपये किलो दराने विकत घेतल्या जातात. ‘ग्रामीण विकास’ हा एक मोघम शब्द झाला आहे. शेतीकेंद्रित, गो-संवर्धन व स्वावलंबी शेती होणे हे खऱ्या अर्थाने अपेक्षित आहे. त्यादृष्टीने ‘वेणुमाधुरी ट्रस्ट’ने रामणवाडीतील या नव्या प्रयोगाची सुरुवात केली आहे. त्याचा सुपरिणाम दिसून आला आहे. गायीच्या शेणापासून बनविलेल्या धुपाची गेल्या दोन वर्षांत ७० हजार पाकिटांची विक्री झाली आहे. अर्काची मागणी वाढत आहे. गोमूत्राचा अर्क, दंतमंजन, धूप, आदींची बागल चौक (कोल्हापूर) मधील गोधन भांडारात विक्री केली जाते. टप्प्याटप्प्याने उपक्रमाची व्याप्ती वाढविली जाईल.- राहुल देशपांडे, प्रकल्प समन्वयक, वेणुमाधुरी ट्रस्टआमच्या ३५० लोकसंख्येच्या रामणवाडीला स्वावलंबनाचा मंत्र ‘वेणुमाधुरी ट्रस्ट’ने दिला आहे. ट्रस्टने राबविलेल्या गो-संवर्धनाच्या प्रकल्पामुळे जंगलतोड कमी झाली असून रोजगारही उपलब्ध झाला आहे. ट्रस्टतर्फे गावाच्या सक्षमीकरणासह विकासासाठी पाणलोट योजना, विद्यार्थ्यांना समतोल आहार देणारी ‘अन्नामृत’, कुटीरोद्योग तसेच अन्य योजना राबविण्यात येत आहेत.- युवराज पाटीलग्रामस्थ, रामणवाडी