शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
3
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
4
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
5
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
6
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
7
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
8
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
9
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
10
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
11
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत आवळळ्या मुसक्या   
12
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
13
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
14
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
16
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
17
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
18
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
19
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
20
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल

रानमेवाच ठरतोय ‘त्यांच्या’ जगण्याचा आधार...

By admin | Updated: May 8, 2015 00:19 IST

जंगलातून भटकंती : रानमेवा विक्रीतून मिळणाऱ्या पैशांतून वर्षभरासाठी संसारोपयोगी वस्तूंची साठवणूक

राजाराम कांबळे - मलकापूरवर्षातून दोन महिन्यांसाठी येणाऱ्या रानमेव्यांची डोळ्यात आसवं आणून वाट बघायची आणि त्या दोन महिन्यांत जेवढा जंगलातील रानमेवा पदरात पाडून घेता येईल तेवढा घ्यायचा, त्याची विक्री करून मिळणाऱ्या चार पैशांतून वर्षभरासाठी संसाराला लागणाऱ्या वस्तूंची साठवणूक करायची. रानमेवा धनगर बांधवांच्या जगण्याचा आधार ठरत आहे.चालूवर्षी अवकाळी पाऊस, वादळी वारा, आभाळ येणे, असे चमत्कारिक प्रकार घडल्याने त्याचा रानमेव्यांवर परिणाम झाला आहे. परिणामी करवंद, आळू, जांभूळ, काजू, आंबा या फळांचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे जंगलात राहणाऱ्या धनगर बांधवांचे अर्थकारण कोलमडून पडले आहे. शाहूवाडी तालुक्यात ३०१६५.८१.२० हेक्टर एवढी वनखात्याची जमीन आहे. या जमिनीवर विशाळगड, चांदोली, अणुस्कुरा, आंबा, कांडवण, गिरगाव, आदी ठिकाणी मोठी जंगले वसली आहेत. या जंगलाशेजारी तालुक्यातील शंभर धनगरवाडे वसले आहेत. हे जंगल वेगवेगळ््या वृक्षांनी व्यापले आहे.करवंदे, जांभळे, काजू, नेर्ली, आळू, रतांबे, तोंदली, शेबत्याळ, तमालपत्री, औषधी वनस्पती, आदी रानमेव्यांची विपुल प्रमाणात भर पडत आहे. मोठ्या जंगलांमुळे जंगलातील गवे, डुकरे यांच्या अतिक्रमणामुळे ऊसपीक, भात, नाचना, मका, वरणा, सोयबीन या पिकांची नासाडी केली जात आहे. त्यामुळे जंगलव्याप्त भागात राहणारा शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे ऊन, वारा यांची तमा न बाळगता त्यांच्याशी दोन हात करताना त्यांच्या नाकीनऊ येते. रानमेवाच त्यांच्यासाठी मोठा आधार ठरत आहे. दोन महिन्यांत जेवढा रानमेवा विक्री करून पैसे मिळविता येतील, तेवढे मिळवून वर्षाची पोटगी केली जाते. त्याचबरोबर आर्थिक गणिते मांडली जातात. संपूर्ण कुटुंब पहाटे पाच वाजल्यांपासून सायंकाळी पाचवाजेपर्यंत रानमेवा गोळा करीत असते. शाहूवाडी तालुक्यात उदगिरी, शित्तूरवारूण, आळतूर, येळवण जुगाई, करंजफेण, आंबा परिसरात मोठ्या प्रमाणात धनगर बांधव वसले आहेत. जंगलातून मिळणाऱ्या वनौषधी वनस्पतींपासून ते जंगली रानमेवा विक्री करणे हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. धनगर बांधव आपला जीव धोक्यात घालून आंबा, फणस, काजू, आदी माडावर चढायचे, काही मिळेल ते झोपडीत घेऊन यायचे आणि ५० ते ६० कि. मी. अंतरापर्यंत पायी चालत जाऊन बाजारपेठेत रानमेवा विक्री केला जातो. त्यातून मिळणाऱ्या चार पैशांतून संसाराला लागणाऱ्या वस्तूंची खरेदी केली जाते.