शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

रानमेवाच ठरतोय ‘त्यांच्या’ जगण्याचा आधार...

By admin | Updated: May 8, 2015 00:19 IST

जंगलातून भटकंती : रानमेवा विक्रीतून मिळणाऱ्या पैशांतून वर्षभरासाठी संसारोपयोगी वस्तूंची साठवणूक

राजाराम कांबळे - मलकापूरवर्षातून दोन महिन्यांसाठी येणाऱ्या रानमेव्यांची डोळ्यात आसवं आणून वाट बघायची आणि त्या दोन महिन्यांत जेवढा जंगलातील रानमेवा पदरात पाडून घेता येईल तेवढा घ्यायचा, त्याची विक्री करून मिळणाऱ्या चार पैशांतून वर्षभरासाठी संसाराला लागणाऱ्या वस्तूंची साठवणूक करायची. रानमेवा धनगर बांधवांच्या जगण्याचा आधार ठरत आहे.चालूवर्षी अवकाळी पाऊस, वादळी वारा, आभाळ येणे, असे चमत्कारिक प्रकार घडल्याने त्याचा रानमेव्यांवर परिणाम झाला आहे. परिणामी करवंद, आळू, जांभूळ, काजू, आंबा या फळांचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे जंगलात राहणाऱ्या धनगर बांधवांचे अर्थकारण कोलमडून पडले आहे. शाहूवाडी तालुक्यात ३०१६५.८१.२० हेक्टर एवढी वनखात्याची जमीन आहे. या जमिनीवर विशाळगड, चांदोली, अणुस्कुरा, आंबा, कांडवण, गिरगाव, आदी ठिकाणी मोठी जंगले वसली आहेत. या जंगलाशेजारी तालुक्यातील शंभर धनगरवाडे वसले आहेत. हे जंगल वेगवेगळ््या वृक्षांनी व्यापले आहे.करवंदे, जांभळे, काजू, नेर्ली, आळू, रतांबे, तोंदली, शेबत्याळ, तमालपत्री, औषधी वनस्पती, आदी रानमेव्यांची विपुल प्रमाणात भर पडत आहे. मोठ्या जंगलांमुळे जंगलातील गवे, डुकरे यांच्या अतिक्रमणामुळे ऊसपीक, भात, नाचना, मका, वरणा, सोयबीन या पिकांची नासाडी केली जात आहे. त्यामुळे जंगलव्याप्त भागात राहणारा शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे ऊन, वारा यांची तमा न बाळगता त्यांच्याशी दोन हात करताना त्यांच्या नाकीनऊ येते. रानमेवाच त्यांच्यासाठी मोठा आधार ठरत आहे. दोन महिन्यांत जेवढा रानमेवा विक्री करून पैसे मिळविता येतील, तेवढे मिळवून वर्षाची पोटगी केली जाते. त्याचबरोबर आर्थिक गणिते मांडली जातात. संपूर्ण कुटुंब पहाटे पाच वाजल्यांपासून सायंकाळी पाचवाजेपर्यंत रानमेवा गोळा करीत असते. शाहूवाडी तालुक्यात उदगिरी, शित्तूरवारूण, आळतूर, येळवण जुगाई, करंजफेण, आंबा परिसरात मोठ्या प्रमाणात धनगर बांधव वसले आहेत. जंगलातून मिळणाऱ्या वनौषधी वनस्पतींपासून ते जंगली रानमेवा विक्री करणे हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. धनगर बांधव आपला जीव धोक्यात घालून आंबा, फणस, काजू, आदी माडावर चढायचे, काही मिळेल ते झोपडीत घेऊन यायचे आणि ५० ते ६० कि. मी. अंतरापर्यंत पायी चालत जाऊन बाजारपेठेत रानमेवा विक्री केला जातो. त्यातून मिळणाऱ्या चार पैशांतून संसाराला लागणाऱ्या वस्तूंची खरेदी केली जाते.