शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

रानमेवाच ठरतोय ‘त्यांच्या’ जगण्याचा आधार...

By admin | Updated: May 8, 2015 00:19 IST

जंगलातून भटकंती : रानमेवा विक्रीतून मिळणाऱ्या पैशांतून वर्षभरासाठी संसारोपयोगी वस्तूंची साठवणूक

राजाराम कांबळे - मलकापूरवर्षातून दोन महिन्यांसाठी येणाऱ्या रानमेव्यांची डोळ्यात आसवं आणून वाट बघायची आणि त्या दोन महिन्यांत जेवढा जंगलातील रानमेवा पदरात पाडून घेता येईल तेवढा घ्यायचा, त्याची विक्री करून मिळणाऱ्या चार पैशांतून वर्षभरासाठी संसाराला लागणाऱ्या वस्तूंची साठवणूक करायची. रानमेवा धनगर बांधवांच्या जगण्याचा आधार ठरत आहे.चालूवर्षी अवकाळी पाऊस, वादळी वारा, आभाळ येणे, असे चमत्कारिक प्रकार घडल्याने त्याचा रानमेव्यांवर परिणाम झाला आहे. परिणामी करवंद, आळू, जांभूळ, काजू, आंबा या फळांचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे जंगलात राहणाऱ्या धनगर बांधवांचे अर्थकारण कोलमडून पडले आहे. शाहूवाडी तालुक्यात ३०१६५.८१.२० हेक्टर एवढी वनखात्याची जमीन आहे. या जमिनीवर विशाळगड, चांदोली, अणुस्कुरा, आंबा, कांडवण, गिरगाव, आदी ठिकाणी मोठी जंगले वसली आहेत. या जंगलाशेजारी तालुक्यातील शंभर धनगरवाडे वसले आहेत. हे जंगल वेगवेगळ््या वृक्षांनी व्यापले आहे.करवंदे, जांभळे, काजू, नेर्ली, आळू, रतांबे, तोंदली, शेबत्याळ, तमालपत्री, औषधी वनस्पती, आदी रानमेव्यांची विपुल प्रमाणात भर पडत आहे. मोठ्या जंगलांमुळे जंगलातील गवे, डुकरे यांच्या अतिक्रमणामुळे ऊसपीक, भात, नाचना, मका, वरणा, सोयबीन या पिकांची नासाडी केली जात आहे. त्यामुळे जंगलव्याप्त भागात राहणारा शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे ऊन, वारा यांची तमा न बाळगता त्यांच्याशी दोन हात करताना त्यांच्या नाकीनऊ येते. रानमेवाच त्यांच्यासाठी मोठा आधार ठरत आहे. दोन महिन्यांत जेवढा रानमेवा विक्री करून पैसे मिळविता येतील, तेवढे मिळवून वर्षाची पोटगी केली जाते. त्याचबरोबर आर्थिक गणिते मांडली जातात. संपूर्ण कुटुंब पहाटे पाच वाजल्यांपासून सायंकाळी पाचवाजेपर्यंत रानमेवा गोळा करीत असते. शाहूवाडी तालुक्यात उदगिरी, शित्तूरवारूण, आळतूर, येळवण जुगाई, करंजफेण, आंबा परिसरात मोठ्या प्रमाणात धनगर बांधव वसले आहेत. जंगलातून मिळणाऱ्या वनौषधी वनस्पतींपासून ते जंगली रानमेवा विक्री करणे हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. धनगर बांधव आपला जीव धोक्यात घालून आंबा, फणस, काजू, आदी माडावर चढायचे, काही मिळेल ते झोपडीत घेऊन यायचे आणि ५० ते ६० कि. मी. अंतरापर्यंत पायी चालत जाऊन बाजारपेठेत रानमेवा विक्री केला जातो. त्यातून मिळणाऱ्या चार पैशांतून संसाराला लागणाऱ्या वस्तूंची खरेदी केली जाते.