शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

कासवांच्या २५ हजार अंड्यांचे संवर्धन

By admin | Updated: March 5, 2017 23:14 IST

दापोलीत ६५ घरट्यांतून सात हजार अंडी संरक्षित

शिवाजी गोरे ल्ल दापोलीकासव संवर्धनावर वनखात्याने विशेष भर दिला असल्याने वर्षभरात रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्रकिनाऱ्यावरील गावांमध्ये २५ हजार अंड्यांचे संवर्धन झाले आहे. एकट्या दापोली तालुक्यात ६५ घरट्यांतून सात हजार अंडी संरक्षित करण्यात आली आहेत. समुद्र व निसर्गातील समतोल राखणारा महत्त्वाचा दुवा म्हणजेच कोकण किनारपट्टीवर आढळून येणारे आॅलिव्ह रिडले जातीचे समुद्री कासव. मात्र, अलीकडे अंड्यांची होणारी तस्करी, जंगली कुत्री व हिंस्र पशूच्या आक्रमणामुळे समुद्री कासवांचा अधिवास धोक्यात आला आहे. समुद्र किनारपट्टीची धूप, किनाऱ्यावरील वाढलेली माणसांची गर्दी हीदेखील एक समस्या झाली आहे. यावर उपाय म्हणून वनविभागाने कोकण किनारपट्टीवरील गावात कासव संवर्धन केंद्रे सुरू केली आहेत. दापोली तालुक्यातील केळशी, आंजर्ले, पाडले, पाळंदे, लाडघर, मुरुड, कर्दे, दाभोळ, कोळथरे या नऊ गावांतील समुद्रकिनाऱ्यावर एकूण ६५ घरटी आढळून आली. या घरट्यांतील सुमारे सात हजार अंडी वनविभागाने संरक्षित केली आहेत. वेळास गावापासून कासव संवर्धन मोहिमेची सुरुवात झाली. पाच वर्षांपूर्वी या मोहिमेला अल्प प्रतिसाद होता; परंतु अलीकडे ही मोहीम गतिमान झाली. या मोहिमेच्या माध्यमातून दरवर्षी अंड्यांचे संवर्धन करून दरवर्षी हजारो पिल्ले समुद्रात सोडण्यात वनविभागाला यश आले आहे.ज्या-ज्या समुद्रकिनाऱ्यावर कासवांचा अधिवास आहे त्या-त्या ठिकाणी वनविभागाने कासव संवर्धन केंद्र सुरू केली आहेत. या मोहिमेत दापोली तालुक्याने गरुडझेप घेतली ाहे. यात वनकर्मचारी महादेव पाटील, सहयोग कराडे, विजय तोडकर यांचेही मोलाचे योगदान आहे.कोट६०० पिल्ले समुद्रात सोडलीदापोली तालुक्यातील कासव संवर्धन केंद्रातील संरक्षित करण्यात आलेल्या अंड्यांची संख्या विक्रमी असून या किनाऱ्यावरील घरट्यात यावर्षी वाढ झाली आहे. आजतागायत मंडणगड तालुक्यातील वेळास ते दाभोळ या दहा गावांतील कासव संवर्धन केंद्रात ६५ घरटी आढळून आली आहेत. या घरट्यात सुमारे ७ हजार अंडी संरक्षित करण्यात आली आहेत. आतापर्यंत ६०० पिल्ले समुद्रात सोडण्यात वनविभागाला यश आलेय. - सुरेश वरक, वनपरिक्षेत्र अधिकारी, दापोली उपविभाग. दाभोळ-कोळथरे, मुरुड, कर्दे या गावांत सर्वाधिक घरटी आढळून आली आहेत. स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वी होत आहे. कासव संवर्धन केंद्र आंजर्ले, अजिंक्य केळस्कर, लहू धोपावकर, ज्ञानेश्वर माने, मनराज नरवणकर, दत्ताराम वानरकर यांच्यासह सर्वच केंद्रांतील रक्षकांनी चांगले काम केले आहे. त्यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणावर यश मिळू शकले आहे. - मारुती जांभळे, वनपाल, दापोली