शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
2
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
3
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
4
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
5
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
6
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
7
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
8
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
9
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
10
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
11
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
12
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
13
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगेंसोबत उद्धव ठाकरेंनी फोनवरून साधला संवाद
14
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले
15
'ट्रम्प यांच्या टॅरिफ'ला धक्का बसणार ! जपानमधील मेगा डीलनंतर पंतप्रधान मोदी चीनला पोहोचले
16
रात्री गाढ झोपले, सकाळी मृतदेह बाहेर काढले; भूस्खलनात आई-वडिलांसह ५ मुलांचा मृत्यू
17
Nagpur Girl Stabbed: एका दिवसाची आईची साथ सुटली अन् एंजेल नेहमीसाठीच दुरावली!
18
फोनवरील 'तो' संवाद अन् ट्रम्प यांचा प्लॅन फसला; भारत-अमेरिका संबंध कसे बिघडले? सर्वात मोठा खुलासा
19
Gauri Pujan 2025: गौरी पूजेच्या वेळी माहेरवाशिणीचाही असतो मान; तिला का बोलवतात? वाचा
20
बदलीमुळे अभियंता संतापला, रागाच्या भरात पाणीपुरवठा खंडित केला; सत्य आले समोर

(नियोजन विषय) कोरोना लसीकरणानंतर नको बाहेर पडण्याची घाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:16 IST

कोल्हापूर : कोरोना लस घेतल्यानंतर लगेचच काही त्रास जाणवू नये म्हणून वैद्यकीय निरीक्षणाखाली अर्धा तास थांबावे, असा नियमच आहे; ...

कोल्हापूर : कोरोना लस घेतल्यानंतर लगेचच काही त्रास जाणवू नये म्हणून वैद्यकीय निरीक्षणाखाली अर्धा तास थांबावे, असा नियमच आहे; पण लसीकरणासाठी गर्दी वाढल्यापासून लस घेणाऱ्या नागरिकापासून ते ती देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यापर्यंत सर्वांनाच विसर पडल्यासारखी परिस्थिती आहे. लसींची रिॲक्शन लाखातील एखाद्यालाच होत असलीतरी तातडीने केंद्राबाहेर पडणे, उन्हात भटकणे आरोग्याच्या दृष्टीने महागात पडू शकते.

काेराना विषाणूशी लढण्यासाठी शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढीस लागावी या हेतूने लसींची निर्मिती केली आहे. कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन या लसींचे डोस प्राधान्याने जिल्ह्यात दिले जात आहेत. लस घेतल्यानंतर १० ते १२ तासांनी ती शरीरभर पसरते. या लसीचा काहींना सौम्य, तर काहींना अतितीव्र स्वरूपाचा त्रास होतो; पण तोदेखील त्रास २४ तासांचाच असतो.

केंद्रावर लस घेतल्यानंतर लगेचच काही त्रास जाणवू नये म्हणून वैद्यकीय निरीक्षणाखाली अर्धा तास थांबावे, असा लसीकरणाचा नियम आहे; पण लसीकरणासाठीच्या वाढत्या गर्दीमुळे हा नियमच पायदळी तुडवला जात आहे. लस टोचल्यापासून ५ ते १० मिनिटांतच बाहेर जाण्यास सांगितले जाते. जाताना पॅरासिटिमॉलच्या चार गोळ्या दिल्या जातात.

१) पॉइंटर्स

आतापर्यंत झालेले लसीकरण

एकूण लसीकरण - १२ लाख २७ हजार ६१७

पहिला डोस - ९ लाख ७६ हजार ३७७

दुसरा डोस - २ लाख ५१ हजार २४०

एकूण लसीकरण केंद्रे - ३५०

३० ते ४४ वयोगटासाठी अजून केंद्र निश्चिती नाही

या वयोगटासाठीचे लसीकरण अत्यल्प प्रमाणात आाणि आहे त्या केंद्रांवरच सुरू आहे. या वयोगटाची लोकसंख्या १८ लाख इतकी सर्वाधिक आहे. त्यासाठी आणखी २०० केंद्रांची आवश्यकता आहे; पण सध्या लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांनाच प्राधान्याने लस दिली जात असल्याने आणि पुरवठाही आठवड्यातून दोन वेळा १५ हजारांचा होत असल्याने सद्य:स्थितीत ३० ते ४४ वयोगटासाठीचे लसीकरण बऱ्यापैकी थांबविण्यात आले आहे.

२) लसीकरणानंतर अर्धा तास कशासाठी?

लसीकरणाची फारशी रिॲक्शन येत नाही; पण आलीच तर तिचे प्रमाण लाखात एक असते आणि ही रिॲक्शन जीवघेणी ठरू शकते. चक्कर येणे, मेंदूचा रक्तपुरवठा थांबणे, अशा घटना घडू शकतात. त्यामुळे अर्धातास केंद्रातच थांबल्यास व काही अडचण आली तर तातडीने उपचार करणे शक्य होते. न थांबता तसेच बाहेर पडले आणि बाहेर जाऊन काही अडचण आली, तर नेमके कशामुळे आणि काय झाले, हे सांगण्याच्या मन:स्थितीत तो रुग्ण असेलच, असे नाही. त्यामुळे लोकांनी काळजी म्हणून अर्धातास केंद्रातच थांबावे, असे आवाहन लसीकरण अधिकारी डॉ. एफ.ए. देसाई यांनी सांगितले.

३) लस हेच औषध

लसीकरणानंतर त्रास झाल्याच्या काही तक्रारी असल्या तरी कोरोनावर लस हेच औषध आहे. त्यामुळे थोडासा त्रास झाला तरी लसीकरण केंद्रावरील डाॅक्टरांकडून दिलेली औषधे व पुरेशी विश्रांती घेऊन या त्रासावर मात करता येते.

४) दोन कॉलम फोटो (लसीकरण केंद्रावरील फोटो नसीर अत्तार देणार आहेत.)