शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

शेवग्याचा पाला, कडधान्यापासून पौष्टिक नूडल्स

By admin | Updated: July 24, 2016 00:57 IST

शिवाजी विद्यापीठातील संशोधन : अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाला प्रस्ताव सादर

संतोष मिठारी -- कोल्हापूर --नोकरी, व्यवसाय, शिक्षण अशा सर्वच क्षेत्रांतील वाढत्या स्पर्धेमुळे सध्याचे जीवन धावपळीचे बनले आहे. त्यातून आहारातही फास्ट फूड आले असून, ते जीवनशैलीचा भागच बनले आहे. या फास्ट फूडला पौष्टिकतेची जोड देण्याचे काम शिवाजी विद्यापीठाने केले आहे. विद्यापीठातील फूड सायन्स अ‍ॅँड टेक्नॉलॉजी (अन्नविज्ञान आणि तंत्रज्ञान) विभागाने चार वर्षांच्या संशोधनातून तृणधान्ये, कडधान्ये व पालेभाज्यांपासून पौष्टिक नूडल्सची निर्मिती केली आहे.फास्ट फूडमध्ये बहुतांश जणांच्या आवडीचा पदार्थ नूडल्स आहे. हे लक्षात घेऊन फूड सायन्स अ‍ॅँड टेक्नॉलॉजीचे समन्वयक डॉ. अक्षयकुमार साहू व संशोधक विद्यार्थी अभिजित गाताडे यांनी फास्टफूडमध्ये पौष्टिकता देण्यासाठी या नूडल्सचे संशोधन करण्याचे ठरविले. त्याचा प्राथमिक आराखडा करून त्यांनी सन २०११ मध्ये नवी दिल्लीतील अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाला संशोधनाचा प्रस्ताव सादर केला. मंत्रालयाने त्याला दुसऱ्या वर्षी मंजुरी देऊन ३१ लाख १३ हजार रुपयांचा निधी दिला. यानंतर गेल्या चार वर्षांत डॉ. साहू व संशोधक विद्यार्थी गाताडे यांनी संशोधन करून तृणधान्य गहू, कडधान्य सोयाबीन, हरभरा आणि शेवगा व हरभऱ्याचा पाला, पालक यांच्या एकत्रीकरणातून पौष्टिक नूडल्सची निर्मिती केली. सन २०१४ मध्ये त्याची पुण्यातील एपीटी रिसर्च फौंडेशनमध्ये चाचणी केली. यातून आरोग्याच्या दृष्टीने असलेली त्याची उपयुक्तता जाणून घेतली. या नूडल्सच्या निर्मितीचे तंत्रज्ञान हे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या मान्यतेनुसार महिला बचतगट आणि उद्योजकांना देण्याची तयारी विद्यापीठाने केली आहे.सर्व वयोगटांसाठी समतोल आहारफास्ट फूडच्या जमान्यात पौष्टिकता जपण्याच्या उद्देशाने पौष्टिक नूडल्सची निर्मिती केली असल्याचे डॉ. अक्षयकुमार साहू यांनी सांगितले. ते म्हणाले, या नूडल्समध्ये मैद्याचा वापर कमी प्रमाणात, तर तृणधान्य, कडधान्य व पालेभाज्या यांचा वापर अधिक केल्याने सर्व वयोगटातील लोकांना त्याद्वारे एक समतोल आहार मिळणार आहे. शिवाय ज्या महिला व मुले-मुलींमध्ये आयर्न, कॅल्शिअमची कमतरता आहे, त्यांच्यासाठी तो पोषक आहार म्हणून उपयुक्त ठरणार आहे. शेवगा व हरभऱ्याचा पाला अधिकतर वेळा वाया जातो; पण या नूडल्समध्ये त्याचा वापर केल्याने शेतकऱ्यांना त्याच्या विक्रीतून अर्थार्जन करता येणार आहे.आरोग्यदृष्टीने महत्त्वया पौष्टिक नूडल्सचा रंग हिरवा आहे. नूडल्स् खाल्याने रक्तामधील आयर्न, कॅल्शिअम, हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास मदत होते. शिवाय कोलेस्टेरॉल कमी होऊन वजन आटोक्यात राहते. कडधान्यांच्या वापरामुळे नूडल्समधील प्रथिनांचे प्रमाण व गुणवत्ताही वाढविलेली आहे. पालेभाज्यांच्या वापरामुळे आयर्न, कॅल्शिअम आणि तंतुमय पदार्थ यांचे प्रमाण वाढलेले आहे. या नूडल्स पचण्यास हलक्या असल्याचे संशोधक विद्यार्थी अभिजित गाताडे याने सांगितले.