शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

‘जयंती’चा पंचनामा- नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By admin | Updated: November 20, 2014 00:05 IST

प्रदूषण नियंत्रण मंडळ : महापालिकेला बजावली नोटीस

कोल्हापूर : जयंती नाल्यातून गेले आठवडाभर मैलामिश्रित पाणी थेट पंचगंगेत मिसळत आहे. नदीप्रदूषणाची मात्रा वाढत असताना बघ्याची भूमिका घेणाऱ्या प्रदूषण नियंत्रण महामंडळाला प्रजासत्ताक सामाजिक संस्थेने आज, बुधवारी जयंती नाल्याचा पंचनामा करण्यास भाग पाडले. नदीत मिसळणाऱ्या दूषित पाण्याचा पंचनामा करून महापालिकेला मंडळाने नोटीस बजावली. यानंतर जाग्या झालेल्या महापालिका प्रशासनाने पाणी रोखण्यासाठी चोवीस तासांची मुदत मागितली. उद्या, गुरुवारपासून दूषित पाणी सोडण्याचे बंद करू, असे महापालिकेने लेखी कळविल्याचे मंडळाच्या सूत्रांनी सांगितले.कसबा बावडा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात महापालिकेला अपयश आले. यातच गेले आठवडाभर जयंती नाल्यातून दूषित पाणी सोडण्यात येत आहे. पंचगंगा प्रदूषणाचा विषय न्यायप्रविष्ट असल्याने जयंती नाल्यातील पाणी महापालिकेने न थांबविल्यास याबाबत न्यायालयात धाव घेणार असल्याचे ‘प्रजासत्ताक’चे दिलीप देसाई यांनी प्रदूषण मंडळास कळविले. यानंतर मंडळाच्या अधिकारी मनीषा होळकर जयंती नाल्यातील दूषित पाण्याचे नमुने घेतले. पाणी मिसळत असल्याचा पंचनामा करून महापालिकेला नोटीस बजावली. चोवीस तासांत नाल्यावर बरगे घालून पाण्याचा उपसा सुरू करीत असल्याचे आश्वासन महापालिकेने मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे. (प्रतिनिधी) नागरिकांचे आरोग्य धोक्यातशहरासह इचलकरंजीपर्यंतच्या नदीपट्ट्यात साथीचे आजार वाढले, काविळीचे रुग्ण वाढले की पंचगंगेतील पाण्याच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर येतो. पाण्याचे नमुने घेऊन पंचनामे केले जातात. कागदोपत्री कारवाई होते. नदी वॉशआउट करण्याची वल्गना होते. प्रदूषण कमी करण्याचा फार्स झाला की पुन्हा मात्र प्रश्न तेथेच राहतो. महानगरपालिकेच्या मुर्दाडपणामुळे नदीकाठच्या गावांना साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे.

२महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कितीही कारवाई केली, उच्च न्यायालयाने कितीही फटकारले, तरी पंचगंगेत दूषित पाणी सोडण्याच्या प्रकारात काहीही फरक पडलेला नाही. कोल्हापूर महानगरपालिक ा हद्दीत दररोज निर्माण होणारे १०० ते ११० दशलक्ष लिटर (एमएलडी) सांडपाणी आजही अंशत: प्रक्रि या करून किंवा जसे आहे तसे थेट नदीत सोडले जात आहे. जयंती नाला, दुधाळी नाला या दोन मुख्य नाल्यांसह शहरातील छोट्या १२ नाल्यांतील सांडपाणी नदीत मिसळते आहे. जयंती नाल्यातून गेले आठवडाभर मैलामिश्रित सांडपाणी थेट नदीत जात आहे.

३कसबा बावडा येथील ७६ एमएलडी क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची उभारणी गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. दुधाळी नाल्यावर प्रक्रिया केंद्र उभारण्याच्या कामास नुकतीच एजन्सी नेमली गेली आहे. बारा छोट्या नाल्यांचा ३१ कोटींचा प्रस्ताव राज्य सरकारच्या सुजल निर्मल योजनेकडून मंजूर केला गेला आहे. मात्र, या योजनेचे कामही संथ व निकृष्ट होत आहे.