शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाड्यातील ८५५० पैकी १५१६ गावांतच सापडल्या ‘कुणबी’च्या नोंदी
2
स्वस्ताईचा गुड ॲण्ड सिम्पल टॅक्स! जीएसटीचे ५% आणि १८% असे दोनच दर; विमा पॉलिसींना करसूट, सिमेंटवर १८% जीएसटी
3
Video: पैज लागली, 500 रुपयांसाठी तरुणाची यमुनेच्या पुरात उडी; नंतर बघा काय घडलं?
4
Hyundai ने लॉन्च केले Creta Electric चे नवीन व्हेरिएंट; 510 KM रेंज अन् किंमत फक्त इतकी...
5
घर खरेदीदारांसाठी मोठी भेट! 'या' वस्तूवरील जीएसटीमध्ये मोठी कपात; घर बांधणेही होणार स्वस्त
6
Yamuna Flood: यमुनेचा रौद्रवतार, दिल्लीच्या नाकातोंडात पाणी! घरं पाण्याखाली, रस्तेही बंद; थरकाप उडवणारी दृश्ये
7
३० वर्षांनी गुरु-शनि त्रिदशांश योग: ८ राशींना फायदा, पैसाच पैसा, लाभच लाभ; शुभ-कल्याण घडेल!
8
८ वर्षांत तिप्पट...GST मधून सरकारची बंपर कमाई; नवीन सुधारणांमुळे मोठा फटका बसणार?
9
"तुझ्या चरणी येऊ न शकलेल्या...", भूषण प्रधानने 'लालबागचा राजा'कडे काय मागितलं? होतंय कौतुक
10
चातुर्मासातील पहिला शुक्र प्रदोष: सुख-सुबत्ता-वैभव, ‘असे’ करा व्रत; मंत्र जपाने शिव प्रसन्न!
11
अटीतटीचा सामना, मैदानात वातावरण तापलं, हाणामारीपर्यंत गेलं, मग भज्जीने असं केलं होतं शोएब अख्तरचं गर्वहरण
12
‘खर्रा मिळणार असेल तरच शाळेत येईन’; म्हणणारा योगेश झाला फासेपारधी समाजातील पहिला सेट उत्तीर्ण विद्यार्थी
13
कामगारांच्या कामाचे ९ चे झाले १२ तास, पण ओव्हरटाइमचा मिळणार जादा मोबदला; रजेचेही निकष बदलले
14
अमिताभ बच्चन आणि क्रिती सनॉन यांच्यानंतर कार्तिक आर्यननंही अलिबागमध्ये खरेदी केली जमीन; किती कोटींना झाली डील?
15
२२ षटकारांची आतषबाजी, ठोकल्या ३६७ धावा; धडाकेबाज खेळीमुळे टी२० संघात मिळालं स्थान
16
श्रेयस, यशस्वी अन् शार्दुल... टीम इंडियाच्या स्टार त्रिकुटाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष
17
"मुंबईत कधी आपलेपणा वाटला नाही...", असं का म्हणाले मनोज वाजपेयी? शहर सोडायचा आला विचार
18
GST Rate Cut: पहिले महिन्याला भरत होता ₹१७,७०० चा हेल्थ इन्शुरन्स प्रीमिअम, आता किती वाचतील; ३६ हजारांच्या टीव्हीवर किती बचत?
19
सर्वसामान्यांना दिलासा देणारे GST चे नवीन दर कधी लागू होणार? अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिले उत्तर
20
GST दरातील कपातीनंतर शेअर बाजार सुस्साट; Sensex ५४७ अंकांनी वधारला, या शेअर्समध्ये जोरदार तेजी

‘जयंती’चा पंचनामा- नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By admin | Updated: November 20, 2014 00:05 IST

प्रदूषण नियंत्रण मंडळ : महापालिकेला बजावली नोटीस

कोल्हापूर : जयंती नाल्यातून गेले आठवडाभर मैलामिश्रित पाणी थेट पंचगंगेत मिसळत आहे. नदीप्रदूषणाची मात्रा वाढत असताना बघ्याची भूमिका घेणाऱ्या प्रदूषण नियंत्रण महामंडळाला प्रजासत्ताक सामाजिक संस्थेने आज, बुधवारी जयंती नाल्याचा पंचनामा करण्यास भाग पाडले. नदीत मिसळणाऱ्या दूषित पाण्याचा पंचनामा करून महापालिकेला मंडळाने नोटीस बजावली. यानंतर जाग्या झालेल्या महापालिका प्रशासनाने पाणी रोखण्यासाठी चोवीस तासांची मुदत मागितली. उद्या, गुरुवारपासून दूषित पाणी सोडण्याचे बंद करू, असे महापालिकेने लेखी कळविल्याचे मंडळाच्या सूत्रांनी सांगितले.कसबा बावडा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात महापालिकेला अपयश आले. यातच गेले आठवडाभर जयंती नाल्यातून दूषित पाणी सोडण्यात येत आहे. पंचगंगा प्रदूषणाचा विषय न्यायप्रविष्ट असल्याने जयंती नाल्यातील पाणी महापालिकेने न थांबविल्यास याबाबत न्यायालयात धाव घेणार असल्याचे ‘प्रजासत्ताक’चे दिलीप देसाई यांनी प्रदूषण मंडळास कळविले. यानंतर मंडळाच्या अधिकारी मनीषा होळकर जयंती नाल्यातील दूषित पाण्याचे नमुने घेतले. पाणी मिसळत असल्याचा पंचनामा करून महापालिकेला नोटीस बजावली. चोवीस तासांत नाल्यावर बरगे घालून पाण्याचा उपसा सुरू करीत असल्याचे आश्वासन महापालिकेने मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे. (प्रतिनिधी) नागरिकांचे आरोग्य धोक्यातशहरासह इचलकरंजीपर्यंतच्या नदीपट्ट्यात साथीचे आजार वाढले, काविळीचे रुग्ण वाढले की पंचगंगेतील पाण्याच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर येतो. पाण्याचे नमुने घेऊन पंचनामे केले जातात. कागदोपत्री कारवाई होते. नदी वॉशआउट करण्याची वल्गना होते. प्रदूषण कमी करण्याचा फार्स झाला की पुन्हा मात्र प्रश्न तेथेच राहतो. महानगरपालिकेच्या मुर्दाडपणामुळे नदीकाठच्या गावांना साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे.

२महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कितीही कारवाई केली, उच्च न्यायालयाने कितीही फटकारले, तरी पंचगंगेत दूषित पाणी सोडण्याच्या प्रकारात काहीही फरक पडलेला नाही. कोल्हापूर महानगरपालिक ा हद्दीत दररोज निर्माण होणारे १०० ते ११० दशलक्ष लिटर (एमएलडी) सांडपाणी आजही अंशत: प्रक्रि या करून किंवा जसे आहे तसे थेट नदीत सोडले जात आहे. जयंती नाला, दुधाळी नाला या दोन मुख्य नाल्यांसह शहरातील छोट्या १२ नाल्यांतील सांडपाणी नदीत मिसळते आहे. जयंती नाल्यातून गेले आठवडाभर मैलामिश्रित सांडपाणी थेट नदीत जात आहे.

३कसबा बावडा येथील ७६ एमएलडी क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची उभारणी गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. दुधाळी नाल्यावर प्रक्रिया केंद्र उभारण्याच्या कामास नुकतीच एजन्सी नेमली गेली आहे. बारा छोट्या नाल्यांचा ३१ कोटींचा प्रस्ताव राज्य सरकारच्या सुजल निर्मल योजनेकडून मंजूर केला गेला आहे. मात्र, या योजनेचे कामही संथ व निकृष्ट होत आहे.