शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

‘जयंती’चा पंचनामा- नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By admin | Updated: November 20, 2014 00:05 IST

प्रदूषण नियंत्रण मंडळ : महापालिकेला बजावली नोटीस

कोल्हापूर : जयंती नाल्यातून गेले आठवडाभर मैलामिश्रित पाणी थेट पंचगंगेत मिसळत आहे. नदीप्रदूषणाची मात्रा वाढत असताना बघ्याची भूमिका घेणाऱ्या प्रदूषण नियंत्रण महामंडळाला प्रजासत्ताक सामाजिक संस्थेने आज, बुधवारी जयंती नाल्याचा पंचनामा करण्यास भाग पाडले. नदीत मिसळणाऱ्या दूषित पाण्याचा पंचनामा करून महापालिकेला मंडळाने नोटीस बजावली. यानंतर जाग्या झालेल्या महापालिका प्रशासनाने पाणी रोखण्यासाठी चोवीस तासांची मुदत मागितली. उद्या, गुरुवारपासून दूषित पाणी सोडण्याचे बंद करू, असे महापालिकेने लेखी कळविल्याचे मंडळाच्या सूत्रांनी सांगितले.कसबा बावडा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात महापालिकेला अपयश आले. यातच गेले आठवडाभर जयंती नाल्यातून दूषित पाणी सोडण्यात येत आहे. पंचगंगा प्रदूषणाचा विषय न्यायप्रविष्ट असल्याने जयंती नाल्यातील पाणी महापालिकेने न थांबविल्यास याबाबत न्यायालयात धाव घेणार असल्याचे ‘प्रजासत्ताक’चे दिलीप देसाई यांनी प्रदूषण मंडळास कळविले. यानंतर मंडळाच्या अधिकारी मनीषा होळकर जयंती नाल्यातील दूषित पाण्याचे नमुने घेतले. पाणी मिसळत असल्याचा पंचनामा करून महापालिकेला नोटीस बजावली. चोवीस तासांत नाल्यावर बरगे घालून पाण्याचा उपसा सुरू करीत असल्याचे आश्वासन महापालिकेने मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे. (प्रतिनिधी) नागरिकांचे आरोग्य धोक्यातशहरासह इचलकरंजीपर्यंतच्या नदीपट्ट्यात साथीचे आजार वाढले, काविळीचे रुग्ण वाढले की पंचगंगेतील पाण्याच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर येतो. पाण्याचे नमुने घेऊन पंचनामे केले जातात. कागदोपत्री कारवाई होते. नदी वॉशआउट करण्याची वल्गना होते. प्रदूषण कमी करण्याचा फार्स झाला की पुन्हा मात्र प्रश्न तेथेच राहतो. महानगरपालिकेच्या मुर्दाडपणामुळे नदीकाठच्या गावांना साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे.

२महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कितीही कारवाई केली, उच्च न्यायालयाने कितीही फटकारले, तरी पंचगंगेत दूषित पाणी सोडण्याच्या प्रकारात काहीही फरक पडलेला नाही. कोल्हापूर महानगरपालिक ा हद्दीत दररोज निर्माण होणारे १०० ते ११० दशलक्ष लिटर (एमएलडी) सांडपाणी आजही अंशत: प्रक्रि या करून किंवा जसे आहे तसे थेट नदीत सोडले जात आहे. जयंती नाला, दुधाळी नाला या दोन मुख्य नाल्यांसह शहरातील छोट्या १२ नाल्यांतील सांडपाणी नदीत मिसळते आहे. जयंती नाल्यातून गेले आठवडाभर मैलामिश्रित सांडपाणी थेट नदीत जात आहे.

३कसबा बावडा येथील ७६ एमएलडी क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची उभारणी गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. दुधाळी नाल्यावर प्रक्रिया केंद्र उभारण्याच्या कामास नुकतीच एजन्सी नेमली गेली आहे. बारा छोट्या नाल्यांचा ३१ कोटींचा प्रस्ताव राज्य सरकारच्या सुजल निर्मल योजनेकडून मंजूर केला गेला आहे. मात्र, या योजनेचे कामही संथ व निकृष्ट होत आहे.