शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
2
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, १ तासांत सर्व GR काढा, मग अंतिम निर्णय सांगतो: मनोज जरांगे पाटील
3
रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द
4
Manoj Jarange: मनोज जरांगे आजच उपोषण सोडणार? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली...
5
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
6
मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! अंतिम मसुदा घेऊन सरकारचे ४ मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला
7
Viral Video : गर्लफ्रेंडचा फोन सतत लागत होता व्यस्त, संतापलेल्या बॉयफ्रेंडनं काय केलं बघाच!
8
Maratha Protest: मनोज जरांगे यांच्या पत्नी आणि मुलांचाही अन्नत्याग; मुलगी म्हणाली...
9
८ वर्षांपूर्वी गायब झालेला 'रीलस्टार' पती, सतत शोध घेत होती पत्नी! आता समोर आलं धक्कादायक सत्य
10
शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा देणारी सरकारी योजना; EPF का ठरत आहे सरस? संपूर्ण गणित समजून घ्या
11
Video: आझाद मैदान परिसरात तणावाची स्थिती, आंदोलकांनी वाट अडवली; पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली
12
Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीला का बांधला जातो अनंताचा धागा? हे व्रत गणेशाचे नाही तर... 
13
नाशिकच्या राहुल धोत्रे हत्या प्रकरणातील फरार दोघांना बेड्या, पोलीस माजी नगरसेवक निमसेच्या मागावर
14
भाक्रा धरणापासून एअरबेसपर्यंत पाकिस्तानला दिली माहिती; प्रसिद्ध युटयूबर विरोधात आरोपपत्र दाखल
15
"पूर नव्हे, हा तर देवाचा आशीर्वाद"; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी जनतेला दिला अजब सल्ला! म्हणाले...
16
'आंदोलक रस्त्यावर नाचताहेत म्हणून तुम्ही न्यायमूर्तींना पायी कोर्टात जायला भाग पाडू शकत नाही'; उच्च न्यायालयाने सरकारला झापले
17
सेबीचा नवा नियम! F&O ट्रेडिंगमध्ये १ ऑक्टोबरपासून पोझिशन लिमिट वाढणार; लहान गुंतवणूकदारांना फायदा
18
स्वार्थी ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'नंतरही भारताची अर्थव्यवस्था 'बम-बम'! ग्रोथ पाहून पंतप्रधान मोदीही खूश; स्पष्टच बोलले...
19
“बस… जरांगे आता थांबा! आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, नामुष्की टाळा”; कुणी दिला सल्ला?
20
'या' देशात भाड्याने मिळते पत्नी; लग्न करून एकत्रही राहू शकता, पण मोजावे लागतील 'इतके' पैसे!

पगाराला ‘आॅनलाईन’चा फटका

By admin | Updated: May 23, 2015 00:29 IST

१३ हजारजणप्रभावित : दोन महिन्यांपासून कर्मचारी, शिक्षकांचे पगार अडकले

भीमगोंडा देसाई - कोल्हापूर -प्राथमिक शिक्षण विभागाकडील ८,९८५ शिक्षकांचे ‘शालार्थ’, तर जिल्हा परिषदेतील विविध विभागांच्या ४,०३० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार ‘सेवार्थ’ या आॅनलाईन प्रणालीच्या कचाट्यात अडकले आहेत. परिणामी, संबंधितांना दोन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर उसनवार करून उदरनिर्वाह करण्याची वेळ आली आहे. राज्यातील सर्व जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांसंबंधी ही समस्या निर्माण झाली आहे. सर्व कर्मचाऱ्यांचे पगार लवकरच मिळावेत, यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषद प्रशासन व्यापक प्रयत्न करत आहेत. तालुका पातळीवर पगार देण्यासंबंधी वित्त विभागाने गुरुवारी आदेश दिला.जिल्हा परिषदेअंतर्गत शिक्षण विभागाकडील प्राथमिक शिक्षक आणि मुख्यालय, तालुका पंचायत समिती येथील कर्मचारी असे एकूण सुमारे १९ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या पगारापोटी प्रत्येक महिन्याला ५० कोटींची गरज आहे. इतकी रक्कम वित्त विभाग शासनाकडे दरमहा मागणी करून पगारापोटी बँकेत जमा करते. या पद्धतीत पगारापोटीची काही रक्कम जिल्हा परिषदेकडे पडून राहते.दरम्यान, पगार जमा करण्यात पारदर्शकता यावी, वेळेत पगार व्हावेत, सेवापुस्तक अद्ययावत राहावे, यासाठी गेल्यावर्षी प्रायोगिक तत्त्वावर शिक्षकांचे पगार ‘शालार्थ’ प्रणालीतून काढण्याचा आदेश दिला आहे. तो यशस्वी झाला. त्यामुळे दोन महिन्यांपासून सर्व शिक्षकांचे पगार ‘शालार्थ’नेच काढावे आणि जिल्हा परिषदेंतर्गत येणाऱ्या सर्वच विभागांच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार ‘सेवार्थ’ प्रणालीतून काढावे, असा आदेश शासनाने दिला आहे. तसा पगार न काढल्यास संबंधित विभागप्रमुखास जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. त्यामुळे वित्त विभागाने आस्थापन विभागाकडील सर्व कर्मचाऱ्यांना ‘शालार्थ’ आणि ‘सेवार्थ’ प्रणालीमध्ये प्रत्येक कर्मचाऱ्यांची माहिती कशी भरावी, यासंबंधी प्रशिक्षण दिले आहे. त्यानुसार माहिती भरली जात आहे. परंतु, आस्थापना विभागातील कर्मचाऱ्यांनी माहिती वेळेत भरली नाही, दिरंगाई केली. त्यामुळे दोन महिन्यांपासून पगार झालेला नाही. या प्रणालीचा फायदा कर्मचाऱ्यांना होणार आहे. मात्र, प्रणालीमध्ये माहिती भरणे किचकट आहे. सेवापुस्तिकांची माहिती वेळेत भरण्याकडे केलेले दुर्लक्ष यामुळे शिक्षण, ग्रामपंचायत, समाजकल्याण, बांधकाम, महिला व बालकल्याण, आरोग्य या विभागांतील कर्मचाऱ्यांचा पगार थांबला आहे. वर्ग - एक व दोनच्या अधिकाऱ्यांचा पगार शासनाकडून थेट जमा होतो. त्यामुळे अधिकाऱ्यांचा दरमहा वेळेत पगार होत आहे. याउलट कर्मचाऱ्यांचा पगार आॅनलाईनच्या कचाट्यात सापडला आहे. परिणामी, ‘अधिकारी तुपाशी आणि कर्मचारी उपाशी’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पगार न मिळाल्याने कर्मचाऱ्यांची आर्थिक ओढाताण झाली आहे. उसनवारी, बँकेत कर्ज काढून संसाराचा गाडा चालवावा लागत आहे. वरिष्ठ नाराज होतील म्हणून कर्मचारी पगार न मिळाल्याची तक्रार करण्याचे धाडसही करत नसल्याचे चित्र आहे. सेवार्थ व शालार्थ या प्रणालीमुळे पगाराला विलंब झाला आहे, ही वस्तुस्थिती आहे. संपूर्ण राज्यात ही परिस्थिती आहे. मात्र, लवकरच सर्वांना पगार मिळेल. प्रशासनाचे तसे प्रयत्न सुरू आहेत. गुरुवारी काही विभागांच्या कर्मचाऱ्यांचा पगार जमा केला आहे. - गणेश देशपांडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद