शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

‘पीएसीएल’चे दहा हजार गुंतवणूकदार हवालदिल

By admin | Updated: August 25, 2014 00:20 IST

जिल्ह्यातील स्थिती; दूरध्वनी, प्रत्यक्ष भेटून विचारणा

कोल्हापूर : पीएसीएल लिमिटेड (पल्स) राबवत असलेली कलेक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट स्कीम (सीआयएस) ताबडतोब बंद करावी. तसेच तब्बल ४९ हजार १०० कोटी रुपये गुंतवणूकदारांना तीन महिन्यांत परत देण्याचे आदेश सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडियाने (सेबी) ‘पीएसीएल’ला दिले आहेत. ते समजताच कोल्हापुरातील ‘पीएसीएल’चे सुमारे दहा हजार गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. त्यातील काही जणांनी आज, रविवारी कंपनी कार्यालयात दूरध्वनीवरून, प्रत्यक्ष भेटून याबाबत विचारणा केली.गेल्या २१ वर्षांपासून कोल्हापुरात पीएसीएल कार्यरत आहे. या ठिकाणी कंपनीच्या विविध योजनांमध्ये सुमारे दहा हजार जणांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यासह फिल्ड असोसिएट आणि एजंट म्हणून येथील अनेकजण या कंपनीत कार्यरत आहेत. ‘सेबी’च्या आदेशाची माहिती वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांद्वारे समजताच कोल्हापुरातील ‘पीएसीएल’चे गुंतवणूकदार हवालदिल झाले. त्यातील काहीजणांनी त्यांच्याशी संबंधित असलेले कंपनीचे फिल्ड असोसिएट, एजंटांची घरे गाठली. काहींनी कोल्हापुरातील स्टेशन रोडवरील कंपनीच्या कार्यालयात प्रत्यक्ष भेटून माहिती घेतली.पैसा बुडविणार नाहीलोकमत’ने ‘पीएसीएल’चे कोल्हापूर शाखेचे व्यवस्थापक अमित शर्मा यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, कोल्हापुरात १९९६ पासून कंपनी कार्यरत आहे. सुरुवातीला गुंतवणूक केलेल्यांचे पैसे त्यांना मिळणाऱ्या लाभासहीत परत केले आहेत. उर्वरित गुंतवणूकदारांना देखील पैसे दिले जातील. कोणत्याही गुंतवणूकदाराचा एकही पैसा बुडविणार नाही. कंपनी आणि ‘सेबी’ यांच्यात १९९९ पासून न्यायालयीन लढा सुरू आहे. जयपूर (राजस्थान)मधील न्यायालयातील लढा कंपनीने जिंकला. त्यावर ‘सेबी’ सर्वोच्च न्यायालयात गेली. ‘सेबी’ने दिलेल्या या आदेशामुळे कंपनीचे फिल्ड असोसिएट आणि एजंटांची फळी मात्र विस्कळीत होणार आहे.