शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
3
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
4
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
5
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
6
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
7
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
8
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
9
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
10
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
11
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
12
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
13
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
14
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

‘पीएसीएल’चे दहा हजार गुंतवणूकदार हवालदिल

By admin | Updated: August 25, 2014 00:20 IST

जिल्ह्यातील स्थिती; दूरध्वनी, प्रत्यक्ष भेटून विचारणा

कोल्हापूर : पीएसीएल लिमिटेड (पल्स) राबवत असलेली कलेक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट स्कीम (सीआयएस) ताबडतोब बंद करावी. तसेच तब्बल ४९ हजार १०० कोटी रुपये गुंतवणूकदारांना तीन महिन्यांत परत देण्याचे आदेश सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडियाने (सेबी) ‘पीएसीएल’ला दिले आहेत. ते समजताच कोल्हापुरातील ‘पीएसीएल’चे सुमारे दहा हजार गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. त्यातील काही जणांनी आज, रविवारी कंपनी कार्यालयात दूरध्वनीवरून, प्रत्यक्ष भेटून याबाबत विचारणा केली.गेल्या २१ वर्षांपासून कोल्हापुरात पीएसीएल कार्यरत आहे. या ठिकाणी कंपनीच्या विविध योजनांमध्ये सुमारे दहा हजार जणांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यासह फिल्ड असोसिएट आणि एजंट म्हणून येथील अनेकजण या कंपनीत कार्यरत आहेत. ‘सेबी’च्या आदेशाची माहिती वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांद्वारे समजताच कोल्हापुरातील ‘पीएसीएल’चे गुंतवणूकदार हवालदिल झाले. त्यातील काहीजणांनी त्यांच्याशी संबंधित असलेले कंपनीचे फिल्ड असोसिएट, एजंटांची घरे गाठली. काहींनी कोल्हापुरातील स्टेशन रोडवरील कंपनीच्या कार्यालयात प्रत्यक्ष भेटून माहिती घेतली.पैसा बुडविणार नाहीलोकमत’ने ‘पीएसीएल’चे कोल्हापूर शाखेचे व्यवस्थापक अमित शर्मा यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, कोल्हापुरात १९९६ पासून कंपनी कार्यरत आहे. सुरुवातीला गुंतवणूक केलेल्यांचे पैसे त्यांना मिळणाऱ्या लाभासहीत परत केले आहेत. उर्वरित गुंतवणूकदारांना देखील पैसे दिले जातील. कोणत्याही गुंतवणूकदाराचा एकही पैसा बुडविणार नाही. कंपनी आणि ‘सेबी’ यांच्यात १९९९ पासून न्यायालयीन लढा सुरू आहे. जयपूर (राजस्थान)मधील न्यायालयातील लढा कंपनीने जिंकला. त्यावर ‘सेबी’ सर्वोच्च न्यायालयात गेली. ‘सेबी’ने दिलेल्या या आदेशामुळे कंपनीचे फिल्ड असोसिएट आणि एजंटांची फळी मात्र विस्कळीत होणार आहे.