शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

‘व्हॅट’ऐवजी सरचार्ज, प्रवेश कराला विरोधच

By admin | Updated: March 10, 2015 00:16 IST

व्यापाऱ्यांची भूमिका : १८ मार्चला होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पाबाबत उत्सुकता

कोल्हापूर : स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटी मूल्यवर्धित करामध्ये (व्हॅट)समाविष्ट करावा, अशी सर्वच व्यापाऱ्यांची सत्ताधारी भाजप-शिवसेना सरकारकडे मागणी आहे. ‘व्हॅट’ऐवजी सरचार्ज, प्रवेश कर या कराला व्यापाऱ्यांचा ठाम विरोध आहे. सोमवारपासून राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील व्यापाऱ्यांची मते जाणून घेतली असता, त्यातून ही माहिती पुढे आली. दरम्यान, कोल्हापूर महापालिकेच्या तिजोरीत १ एप्रिल २०१४ ते ७ मार्च २०१५ अखेर ७७ कोटी ३५ लाख ४५ हजार २७३ रुपये एलबीटीमधून आजअखेर जमा झाले. या कराला राज्यातील सर्वच व्यापाऱ्यांचा विरोध आहे. गेली चार वर्षे व्यापाऱ्यांनी याप्रश्नी आंदोलन करून एलबीटीऐवजी व्हॅटमध्ये दीड ते दोन टक्के वाढ करावी व आता कोणताही जाचक कर नको, ही व्यापाऱ्यांची भूमिका आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना या प्रश्नांची सोडवणूक करता आली नाही. दरम्यान, राज्यातील सत्तेवर आलेल्या भाजप-शिवसेना सरकारबरोबर फेडरेशन आॅफ असोसिएशन आॅफ महाराष्ट्र (फाम) या व्यापाऱ्यांच्या शिखर संघटनेची गत चार महिन्यांत २६ महापालिकांच्या व्यापारी प्रतिनिधींबरोबर चारवेळा बैठका झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्यावेळी केलेल्या जाहीरनाम्यातील कोणत्याही स्थितीत एलबीटी घालवू, असे आश्वासन दिले आहे. १८ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात एलबीटी हा कर कोणत्या करामध्ये समाविष्ट होईल. याबाबत उत्सुकता आहे. सरचार्ज आकारल्यास ग्राहक, व्यापाऱ्यांनाही भुर्दंड...राज्य शासनाने एलबीटीऐवजी सरचार्ज (अधिभार)आकारल्यास याचा भुर्दंड ग्राहकांबरोबर व्यापाऱ्यांनाही बसणार आहे. त्याचा परिणाम म्हणून वस्तूच्या किमती वाढणार, काळ्या बाजाराला वाव मिळणार आहे तसेच प्रवेश कर (एंट्री टॅक्स) आकारल्यास आपोआपच सर्वच वस्तू, मालाच्या किमती वाढणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.अडीच हजार व्यापाऱ्यांना नोटिसा....महापालिकेत सध्या १७ हजार एलबीटी नोंदणीधारक व्यापाऱ्यांची नोंद आहे. विक्रीकर विभागाकडून शहरातील जे व्यापारी व्हॅट भरतात, त्यांची यादी महापालिका प्रशासनाने घेतली आहे. त्यामध्ये अडीच हजार व्यापाऱ्यांनी एलबीटीची नोंदणी केली नसल्याचे उघडकीस आले. त्यामुळे अडीच हजार व्यापाऱ्यांना एलबीटी नोंदणी करण्यासाठी नोटिसा पाठविल्या असल्याचे प्रशासनाने सांगितले....व्हॅट लागू झाल्यास अशी होणार कराची अंमलबजावणी मूल्यवर्धित कर हा विविध वस्तूंच्या करांवर आधारित आहे. समजा, पाच टक्के व्हॅट असेल तर तो सहा होणार, साडेबारा टक्क्यांचा १५ टक्के तसेच २५ टक्के असेल तर तो ३० टक्के होणार.आता आम्हाला कोणताही कर नको आहे. एलबीटी व्हॅटमध्ये समाविष्ट करून सरकारने दिलेले वचन पाळावे.-सदानंद कोरगांवकर, अध्यक्ष,कोल्हापूर जिल्हा व्यापारी व उद्योजक महासंघ.