शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

‘किंगमेकर’ होण्याची शिवसेनेला संधी शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2017 00:15 IST

जागा वाढवण्याला वाव : गटबाजीला लगाम आवश्यक

विश्वास पाटील ल्ल कोल्हापूरविधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वांत घवघवीत यश मिळालेल्या कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत गतनिवडणुकीच्या तुलनेत कामगिरी सुधारण्याची संधी या पक्षाला चालून आली आहे. सत्तेच्या चाव्या या पक्षाच्या हातात येण्याची चिन्हे दिसत आहेत. मागच्या सभागृहात या पक्षाला सहा जागा होत्या. त्या या वेळेला दुप्पट झाल्या तरी चांगले यश मिळाले, असे म्हणायला हरकत नाही.दहापैकी सहा आमदार (साठ टक्के) यश पक्षाला अन्य कोणत्याच जिल्ह्यात मिळालेले नाही. तसा कोल्हापूर हा कधीच शिवसेनेचा बालेकिल्ला नव्हता व नाही. कोल्हापूर शहरातून यापूर्वी या पक्षाला संधी मिळाली तरी त्यामध्ये काँग्रेसमधल्या बेदिलीचा व निष्क्रिय उमेदवाराचा वाटा जास्त आहे. शिवसेनेचे सहा आमदार असे म्हणताना नेहमी हे लक्षात ठेवले पाहिजे की, हे यश पक्षीय संघटनात्मक ताकदीचे नव्हे. आमदार राजेश क्षीरसागर हे त्याला काही प्रमाणात अपवाद ठरू शकतील. अन्य पाच आमदार स्थानिक परिस्थितीत जी प्रस्थापित नेतृत्वाच्या विरोधात नाराजीची, सहानुभूतीची, बदलाची पोकळी तयार झाली, त्यामध्ये घुसून आमदार झाले आहेत. ते होताना त्यांची व्यक्तिगतही राजकीय ताकद तेवढी नाही. त्या-त्या मतदारसंघातील छुपे गट, दोन नंबरचे नेते यांची आणि तत्कालीन जातीय, राजकीय समीकरणे, साखर कारखानदारीतील राजकारणाचे पडसाद यांचा एकत्रित परिणाम झाल्यावर या आमदारांना गुलाल मिळाला. त्यातही चंद्रदीप नरके व सत्यजित पाटील यांचा विजय तर एक हजाराच्या आतील मताधिक्यातील आहे. लोकांनी कुणाला पाडायचे हे निवडणूक लागल्यावर ठरवले होते. ते करण्यासाठी जो उपलब्ध पर्याय होता, त्याचा पक्ष, नेतृत्व हे काहीच न पाहता लोकांनी मते दिल्याने शिवसेनेला हे यश मिळाले.सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे कागल तालुक्यातील संजय मंडलिक-संजय घाटगे गट यावेळेला शिवसेनेसोबत आहे. तो गतनिवडणुकीत काँग्रेसच्या चिन्हावर लढून पाचही जागा जिंकला होता. या तालुक्यात काटाजोड लढती असल्या, तरी वारसांना संधी दिल्याने काही नाराजी असली तरी या दोन्ही नेत्यांची तालुक्यात गट म्हणून ताकद आहे आणि कार्यकर्ते गटाच्या अस्मितेसाठी मतदान करतात, अशी त्या तालुक्याची खासियत आहे. त्यामुळे या निवडणुकीत कागलसह, करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, हातकणंगले तालुक्यात पक्षाला चांगली संधी आहे. भुदरगडमध्ये आमदार प्रकाश आबिटकर हे स्थानिक आघाडी करून लढत आहेत. शिवसेनेची सगळ्यांत मोठी अडचण कोणती असेल तर ती सहा आमदार, संपर्कप्रमुख, सहसंपर्कप्रमुख आणि तीन जिल्हाप्रमुख आणि तितकेच त्यांचे गट यांना एकत्रित जिल्हा पातळीवर बांधून ठेवू शकेल, अशा नेतृत्वाची वानवा. त्यामुळे वरकरणी संघटना आक्रमक दिसत असली तरी ती आतून गटबाजीने पोखरलेली आहे. ती इतकी पोखरली आहे की खासगीत दोन आमदार एकमेकांचा उल्लेख करताना समोरच्याला लाज वाटेल इतक्या खालच्या पातळीवर जाऊन करतात. आमदारांचा एक गट आणि शिवसेनेचा वेगळा असे चित्रही अनेक मतदारसंघांत दिसते. मूळचा शिवसैनिक त्यांच्या कामासाठी जिल्हाप्रमुखाकडे हक्काने जातो; परंतु तो आमदारांची पायरी कधी चढत नाही; कारण आमदारांच्या दरबारात तो खिजगणतीतही नाही. अशी संघटना एकीकडे व लोकप्रतिनिधी दुसरीकडे असे चित्र असल्याने शिवसेनेचा प्रभाव म्हणावा तेवढा पडलेला नाही. जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे व मुरलीधर जाधव यांनी गावोगावी फिरून सच्चा कार्यकर्त्यांना चार्ज केले आहे. शिवसेनेत उमेदवार कोण आहे यापेक्षा धनुष्यबाण बघून मतदान करणाराही वर्ग आहे. त्या बळावर या निवडणुकीत शिवसेनेने चांगली वातावरण निर्मिती केली आहे.मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरून भाजपबरोबरची युती तुटल्याने जिल्ह्यातही त्यांच्याबरोबर युती होण्याची शक्यता नाही. त्याचा परिणाम म्हणून शिवसेना जेवढ्या जास्त जागा घेईल तेवढा भाजप सत्तेपासून दूर जाणार आहे. महापालिका निवडणुकीपासून तटस्थ राहिलेली शिवसेना भाजप-ताराराणीला सत्तेपासून दूर लोटण्यासाठी काँग्रेससोबत गेली. तोच फॉर्म्युला जिल्हा परिषदेतही आकारास येणार आहे. यंदा नवीनच बेरजा..गत निवडणुकीवेळी शिवसेनेचे चंद्रदीप नरके, डॉ. सुजित मिणचेकर आणि राजेश क्षीरसागर हे आमदार होते. त्यातील क्षीरसागर यांचा मतदारसंघ शहरी आहे. नरके यांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील पाच जागा जिंकल्या. आमदार मिणचेकर यांना एका जागेवर समाधान मानावे लागले. आता या निवडणुकीकडे पाहताना काही बेरजा झाल्या आहेत.