शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
2
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
3
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...
4
ग्रीन झोनमध्ये शेअर बाजाराची कामकाजास सुरुवात; मोठ्या चढ-उतारासह 'हे' शेअर्स उघडले
5
'निमिषा प्रियाला अजिबात माफ केले जाणार नाही, तिला ताबडतोब फाशी द्या', तलालच्या भावाने तिसऱ्यांदा दाखल केली याचिका
6
Tarot Card: ध्येयपूर्तीकडे वाटचाल करायला लावणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
7
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
8
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
9
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
10
Viral Video : भर रस्त्यात हाय वोल्टेज ड्रामा! पत्नीने पतीच्या कानशिलात लगावल्या, कशावरून सुरू झालेला वाद?
11
आमिर खानच्या कुटुंबियांनी जारी केलं स्टेटमेंट, भाऊ फैजल खानचे सर्व आरोप फेटाळले
12
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
13
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
14
Video: अल्लू अर्जुनने विमानतळावर अधिकाऱ्यासमोर दाखवला माज; अखेर काढावाच लागला मास्क
15
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
16
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
17
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
18
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
19
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
20
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस

‘किंगमेकर’ होण्याची शिवसेनेला संधी शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2017 00:15 IST

जागा वाढवण्याला वाव : गटबाजीला लगाम आवश्यक

विश्वास पाटील ल्ल कोल्हापूरविधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वांत घवघवीत यश मिळालेल्या कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत गतनिवडणुकीच्या तुलनेत कामगिरी सुधारण्याची संधी या पक्षाला चालून आली आहे. सत्तेच्या चाव्या या पक्षाच्या हातात येण्याची चिन्हे दिसत आहेत. मागच्या सभागृहात या पक्षाला सहा जागा होत्या. त्या या वेळेला दुप्पट झाल्या तरी चांगले यश मिळाले, असे म्हणायला हरकत नाही.दहापैकी सहा आमदार (साठ टक्के) यश पक्षाला अन्य कोणत्याच जिल्ह्यात मिळालेले नाही. तसा कोल्हापूर हा कधीच शिवसेनेचा बालेकिल्ला नव्हता व नाही. कोल्हापूर शहरातून यापूर्वी या पक्षाला संधी मिळाली तरी त्यामध्ये काँग्रेसमधल्या बेदिलीचा व निष्क्रिय उमेदवाराचा वाटा जास्त आहे. शिवसेनेचे सहा आमदार असे म्हणताना नेहमी हे लक्षात ठेवले पाहिजे की, हे यश पक्षीय संघटनात्मक ताकदीचे नव्हे. आमदार राजेश क्षीरसागर हे त्याला काही प्रमाणात अपवाद ठरू शकतील. अन्य पाच आमदार स्थानिक परिस्थितीत जी प्रस्थापित नेतृत्वाच्या विरोधात नाराजीची, सहानुभूतीची, बदलाची पोकळी तयार झाली, त्यामध्ये घुसून आमदार झाले आहेत. ते होताना त्यांची व्यक्तिगतही राजकीय ताकद तेवढी नाही. त्या-त्या मतदारसंघातील छुपे गट, दोन नंबरचे नेते यांची आणि तत्कालीन जातीय, राजकीय समीकरणे, साखर कारखानदारीतील राजकारणाचे पडसाद यांचा एकत्रित परिणाम झाल्यावर या आमदारांना गुलाल मिळाला. त्यातही चंद्रदीप नरके व सत्यजित पाटील यांचा विजय तर एक हजाराच्या आतील मताधिक्यातील आहे. लोकांनी कुणाला पाडायचे हे निवडणूक लागल्यावर ठरवले होते. ते करण्यासाठी जो उपलब्ध पर्याय होता, त्याचा पक्ष, नेतृत्व हे काहीच न पाहता लोकांनी मते दिल्याने शिवसेनेला हे यश मिळाले.सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे कागल तालुक्यातील संजय मंडलिक-संजय घाटगे गट यावेळेला शिवसेनेसोबत आहे. तो गतनिवडणुकीत काँग्रेसच्या चिन्हावर लढून पाचही जागा जिंकला होता. या तालुक्यात काटाजोड लढती असल्या, तरी वारसांना संधी दिल्याने काही नाराजी असली तरी या दोन्ही नेत्यांची तालुक्यात गट म्हणून ताकद आहे आणि कार्यकर्ते गटाच्या अस्मितेसाठी मतदान करतात, अशी त्या तालुक्याची खासियत आहे. त्यामुळे या निवडणुकीत कागलसह, करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, हातकणंगले तालुक्यात पक्षाला चांगली संधी आहे. भुदरगडमध्ये आमदार प्रकाश आबिटकर हे स्थानिक आघाडी करून लढत आहेत. शिवसेनेची सगळ्यांत मोठी अडचण कोणती असेल तर ती सहा आमदार, संपर्कप्रमुख, सहसंपर्कप्रमुख आणि तीन जिल्हाप्रमुख आणि तितकेच त्यांचे गट यांना एकत्रित जिल्हा पातळीवर बांधून ठेवू शकेल, अशा नेतृत्वाची वानवा. त्यामुळे वरकरणी संघटना आक्रमक दिसत असली तरी ती आतून गटबाजीने पोखरलेली आहे. ती इतकी पोखरली आहे की खासगीत दोन आमदार एकमेकांचा उल्लेख करताना समोरच्याला लाज वाटेल इतक्या खालच्या पातळीवर जाऊन करतात. आमदारांचा एक गट आणि शिवसेनेचा वेगळा असे चित्रही अनेक मतदारसंघांत दिसते. मूळचा शिवसैनिक त्यांच्या कामासाठी जिल्हाप्रमुखाकडे हक्काने जातो; परंतु तो आमदारांची पायरी कधी चढत नाही; कारण आमदारांच्या दरबारात तो खिजगणतीतही नाही. अशी संघटना एकीकडे व लोकप्रतिनिधी दुसरीकडे असे चित्र असल्याने शिवसेनेचा प्रभाव म्हणावा तेवढा पडलेला नाही. जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे व मुरलीधर जाधव यांनी गावोगावी फिरून सच्चा कार्यकर्त्यांना चार्ज केले आहे. शिवसेनेत उमेदवार कोण आहे यापेक्षा धनुष्यबाण बघून मतदान करणाराही वर्ग आहे. त्या बळावर या निवडणुकीत शिवसेनेने चांगली वातावरण निर्मिती केली आहे.मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरून भाजपबरोबरची युती तुटल्याने जिल्ह्यातही त्यांच्याबरोबर युती होण्याची शक्यता नाही. त्याचा परिणाम म्हणून शिवसेना जेवढ्या जास्त जागा घेईल तेवढा भाजप सत्तेपासून दूर जाणार आहे. महापालिका निवडणुकीपासून तटस्थ राहिलेली शिवसेना भाजप-ताराराणीला सत्तेपासून दूर लोटण्यासाठी काँग्रेससोबत गेली. तोच फॉर्म्युला जिल्हा परिषदेतही आकारास येणार आहे. यंदा नवीनच बेरजा..गत निवडणुकीवेळी शिवसेनेचे चंद्रदीप नरके, डॉ. सुजित मिणचेकर आणि राजेश क्षीरसागर हे आमदार होते. त्यातील क्षीरसागर यांचा मतदारसंघ शहरी आहे. नरके यांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील पाच जागा जिंकल्या. आमदार मिणचेकर यांना एका जागेवर समाधान मानावे लागले. आता या निवडणुकीकडे पाहताना काही बेरजा झाल्या आहेत.