शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

तरच न्यायालयात टिकणारे आरक्षण मिळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:17 IST

कोल्हापूर : महाराष्ट्रात गठीत झालेल्या महाराष्ट्र राज्य मागास आयोग कायद्याचे कलम ९ व ११ याचे तंतोतंत पालन केले आणि ...

कोल्हापूर : महाराष्ट्रात गठीत झालेल्या महाराष्ट्र राज्य मागास आयोग कायद्याचे कलम ९ व ११ याचे तंतोतंत पालन केले आणि सध्या जे मागासवर्ग म्हणून राहिले नाहीत अशा वर्गांना इतर मागास वर्गाच्या यादीतून वगळून सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मराठा समाजाला या वर्गात समाविष्ट केल्यास न्यायालयात टिकणारे आरक्षण मराठा समाजाला मिळेल, या मुद्द्याकडे ॲड. बाबा इंदूलकर व प्रा. जयंत पाटील यांनी गुरुवारी लक्ष वेधले.

सकल मराठा समाजातील समन्वयकांची बैठक गुरुवारी खासदार संभाजीराजे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी बाेलताना इंदूलकर व प्रा. पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित संभाजीराजे व राज्य शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

महाराष्ट्र राज्य मागास आयोग कायद्याचे कलम ९ व ११ प्रमाणे सध्या जे इतर मागासवर्ग राहिलेले नाहीत, अशा वर्गांना इतर मागास वर्गाच्या यादीतून वगळण्याच्या तसेच नवीन मागास वर्गाचा अशा यादीत अंतर्भाव करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे. शासनाला दहा वर्षांनंतर यादींचे पुनर्रिक्षण करता येते आणि ज्या जातीची प्रगती झाली आहे त्यांना यादीतून वगळून नवीन मागास जातीचा समावेश करण्याचा अधिकार असल्याने अशी कृती केली तरच मराठा समाजाच्या आरक्षणाच्या समस्येवर तोडगा निघू शकतो, असे ॲड. इंदूलकर यांनी सांगितले.

न्या. दिलीप भोसले समितीच्या अहवालावर कृती करण्याबरोबरच इंदिरा सहानी खटल्याच्या निकालाची व जून २०१९ च्या मुंबई उच्च न्यायालयातील परिच्छेद १७६ मध्ये वर्णन केल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग कायदा २००५ ते कलम ९ व ११ याची तंतोतंत अंमलबजावणी केली तरच इंदिरा सहानी खटल्याने निर्देशित केलेली पन्नास टक्क्याच्या मर्यादेचे पालन होऊन मराठ्यांना न्यायालयात टिकणारे आरक्षण मिळू शकेल, असा दावाही इंदूलकर यांनी केला आहे.