शहरं
Join us  
Trending Stories
1
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
2
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
3
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
4
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
5
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
6
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
7
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
8
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
9
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
10
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
11
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
12
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
13
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
14
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
15
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
16
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
17
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
18
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
19
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
20
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा

पाचवीच्या वर्गात एकच विद्यार्थी

By admin | Updated: June 30, 2015 00:25 IST

अब्दुललाटची जि.प.ची शाळा : लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नाने पुन्हा वर्ग फुलला

दगडू कांबळे - अब्दुललाट -सन २०१५चे शैक्षणिक वर्ष सुरू झाले आणि नेहमी भेडसावणारा विद्यार्थ्यांच्या कमतरतेचा विषय सुरू झाला. येथील जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेत पहिल्याच दिवशी इयत्ता पाचवीच्या वर्गात एकच विद्यार्थी हजर राहिला. बाकीचे सर्व विद्यार्थी न्यू इंग्लिश स्कूल अब्दुललाट या शाळेत दाखल झाले. ही अवस्था पाहून प्राथमिक शाळेतील गुरुजींचे धाबे दणाणले. तत्काळ त्यांनी लोकप्रतिनिधींशी संपर्क साधून परिस्थितीची जाणीव करून दिली. त्यानंतर लोकप्रतिनिधी आणि खासगी शाळांचे शिक्षक, संचालक यांच्यात सुरू झाला संघर्षाचा ताकतुंबा. या दोहोतील संघर्षानंतर जिल्हा परिषदेच्या शाळेतील चौथी पास झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा बोलवण्यात आले आणि विद्यार्थ्यांविना पोरक्या झालेल्या शाळेत परत पाचवीचा पट भरल्यावर या संघर्षनाट्यावर पडदा पडला. त्यामुळे आता जबाबदारी आहे ती शाळेची गुणवत्ता वाढवायची की शाळाच बंद पाडायची याची.१६ जूनला शैक्षणिक वर्ष सुरू झाले. काहीजण कित्ता गिरविण्यासाठी दाखल झाले, तर काहीजण पहिली ते चौथीपर्यंत कित्ता गिरवून पाचवीमध्ये प्रवेश केलेले विद्यार्थी मात्र गावातीलच न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दाखल झाले आणि ‘प्राथमिक’चा वर्ग रिकामा पडला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जि. प. सदस्य दादासाहेब सांगावे, सरपंच शानाबाई कोळी, सदस्य मिलिंद कुरणे, माजी सरपंच श्रीकांत मधाळे, आदींकडून ‘त्या’ विद्यार्थ्यांना परत इकडे आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. त्यासाठी त्यांच्या पालकांची बैठक घेतली. या बैठकीला दस्तुरखुद्द आमदारही उपस्थित राहिले. बैठकीत पालकांचे मन वळविण्याचा प्रयत्न सुरू झाला. या सर्व प्रयत्नानंतर पालकांकडून एकच उत्तर मिळाले की, केंद्रीय प्राथमिक शाळेची गुणवत्ता कमी होत चालली आहे. त्यामुळे आमच्या मुलांना दुसऱ्या शाळेत घालत आहोत. यावेळी सर्वांचे म्हणणे ऐकल्यावर आमदारांसह सर्वच लोकप्रतिनिधींनी शाळेचा १५० वर्षांचा इतिहास पाहता ती बंद पडता कामा नये, यासाठी प्रयत्न करूया. तरी पण पालक ऐकेनात. शेवटी सर्व लोकप्रतिनिधींनी त्या पालकांना विनंती केली. यात आमदार उल्हास पाटीलही मागे राहिले नाहीत. यानंतर प्रत्येक महिन्याला शाळेची गुणवत्ता तपासली जाईल. जर यात शिक्षक कमी पडले, तर त्यांच्या बदल्या केल्या जातील, अशी हमी दिल्यानंतर पालकांना पाझर फुटला. त्यामुळे परत प्राथमिकचा पाचवीचा वर्ग फुलला.शिक्षक, पालक यांचीही जबाबदारीप्राथमिक शाळेची ढासळत चाललेली प्रतिमा आणि गुणवत्तेकडे लक्ष देणे गरजेचे बनले आहे. तेथील शिक्षकांवर अंकुश ठेऊन गुणवत्तेबाबत त्यांच्यावर दबावतंत्राचा वापर केला पाहिजे आणि शाळेच्या गरजांकडे लक्ष देणे, अशी कर्तव्ये पार पाडली पाहिजेत. पालकांनीही आपल्या पाल्याविषयी जबाबदारी झटकून चालणार नाही, त्यांनीही शाळेकडे आणि आपल्या पाल्याकडे प्रगतीची खातरजमा करून घेतली पाहिजे. एवढे केले तरच मिळवले, नाही तर प्रतिवर्षी विद्यार्थ्यांची पळवापळवी होतच राहणार आहे.