शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

अन्न भेसळ नव्हे स्लो पॉयझनिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2017 00:11 IST

तरुणपणातच जडते अर्धशिषी अन् अनेक आजार

आमचा काळच वेगळा होता, भाजी-भाकरी खायचो; पण आजारी पडत नव्हतो...’ हे जेव्हा वडीलधारी सांगतात त्यावर ‘हायब्रिड’चा जमाना आहे. हे उत्तर मिळतं. रासायनिकदृष्ट्या पिकवलेले फळे, कडधान्यांमुळे आरोग्यावर दुष्परिणाम होत असतानाच अन्न भेसळ हे भलतंच डोकं वर काढत आहे. यामुळे अप्रत्यक्षपणे ‘स्लो पॉयझनिंग’सारखे काम करत आहेत. त्यामुळे आजच्या पिढीला तरुणपणाच नको ते आजार जडत आहेत. एकेकाळी काटा मारणे म्हणजे, ‘मापात पाप’ समजले जात होते; पण अलीकडच्या काही दशकांपासून जास्त पैसा कमविण्याच्या हव्यासापायी अनेक व्यापारी फळांवर रासायनिक प्रक्रिया करतात. दैनंदिन आहारातील अन्नपदार्थांमध्ये भेसळ केली जात आहे. यातून तान्हुल्यांना दिले जाणारे दूधही सुटलेले नाही. गेल्यावर्षी मॅगीतील भेसळ हे प्रकरण खूपच गाजलं होतं. त्यानंतर खऱ्या अर्थाने भेसळीचा शरीरावर होणारा परिणाम सर्वसामान्यांमध्ये चर्चेला गेला. अन्न पदार्थांचे वजन वाढविण्यासाठी सर्वसाधारणपणे खडे, माती, पाला, झाडांच्या काड्यांचा वापर केला जातो. काही वेळेस दुधाची घनता वाढविण्यासाठी तेल, युरियासारख्या पदार्थांचाही वापर केला जातो. भेसळयुक्त पदार्थ शरीरावर संथगतीने परिणाम करतात. लहान मुलांची प्रतिकार शक्ती कमी असल्यास लवकरच दमा, डोकेदुखी, मधुमेह, शरीरावर व्रण उमटणे, अ‍ॅलर्जी यासारखे आजार जडत आहेत. त्यामुळे चार जिने चढून गेले तरी धाप लागणे, हातपाय थरथरणे, शरीरातील आंतरअवयव निकामी होण्याचेही धोके वाढत आहेत.सर्वच प्रकारचे जंकफूड हे चवीला चटपटीत लागलात. त्यामुळे नेहमीच्या जेवणापेक्षा या पदार्थांसाठी हट्ट धरला जातो. लहान मुलांचा हट्ट पुरविण्यासाठी ते आपणच आणून देतो. मात्र, शरीराला गरज नसलेले पदार्थ खाण्यात आल्याने वजन वाढण्याच्या तक्रारीही वाढत आहेत.फळांचे इंजेक्शनचा धोकाअनेकदा फळांना इंजेक्शन दिले जाते. त्यामुळे शरीरावर विपरीत परिणाम होण्याचा धोका असतो.जगदीश कोष्टी