शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

गुळाच्या उलाढालीवर परिणाम नाही

By admin | Updated: November 11, 2016 00:14 IST

कोल्हापूर मार्के ट : चांगला दर, परंतु आवक कमी

विश्वास पाटील -- कोल्हापूर -केंद्र शासनाच्या नोटा रद्दच्या निणर्याचा येथील गुळाच्या बाजारावर परिणाम झालेला नाही. हा व्यवहार चेकच्या माध्यमातून होत असल्याने आवक सुरळीत आहे; परंतु अजून गूळ आवकेने जोर पकडलेला नाही.नोव्हेंबर उजाडला की कोल्हापुरात गुऱ्हाळे सुरू होतात. पिवळाधमक जीभेला पाणी सुटायला लावणारा गुळ ट्रॉलीत भरून येथील मार्केट यार्डामध्ये यायला सुरुवात होते. गुरुवारी पाच आणि दहा किलोंच्या ३० हजार रव्यांची (भेली) यार्डात आवक झाली. तसेच एक किलोच्या छोट्या वड्यांची पाच हजार बॉक्सची आवक झाली. त्याचा क्ंिवटलचा दर ३८०० रुपये इतका, तर पाच किलोंच्या रव्यांचा दर ३६०० रुपये इतका होता. यंदा ऊस कमी असल्याने गुळाचे उत्पादनही कमी होणार हे माहीत असल्याने सुरुवातीपासूनच दर चढे आहेत; परंतु तुलनेत अजून आवक सुरू झालेली नाही. हंगाम पूर्ण तेजीत असतो तेव्हा दिवसाला सरासरी ३० किलोंच्या ६० हजार रव्यांची आवक होते.गुळाचे पैसे देण्याच्या व्यवहाराला ‘पट्टी दिली’ असे म्हटले जाते. ही रक्कम जास्त असल्याने अडत्यांकडून शेतकऱ्याला चेकच्या माध्यमातूनच ती अदा केली जाते. बरेच शेतकरी पावसाळ्यातही उचल घेतात. त्यामुळे सुरुवातीला त्या पैशांची परतफेड करण्याचाच व्यवहार सुरू असतो. अडत्या व शेतकरी यांचे नाते वर्षानुवर्षाचे असते. त्यामुळे पैसे कुठे जात नाहीत, अशी भावना असल्याने रोजच्या पैशांसाठी तगादा नसतो. त्यामुळेच पाचशेच्या नोटा रद्द झाल्या तरी मार्केट कमिटीतील व्यवहारावर त्याचा फारसा परिणाम झाला नसल्याचे गूळ विभागाच्या के. बी. पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.गुळाइतकाच कोल्हापूर मार्केटमध्ये कांदाही मोठ्या प्रमाणावर येतो. रोज प्रत्येकी सहा टनांचे किमान २० ट्रकची आवक होते. हा कांदा अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातून येतो; परंतु तिथेही शेतकरी व व्यापारी यांचे ओळखीचे संबंध असल्याने पैसे देण्यावरून फारशा अडचणी आल्या नाहीत. कोल्हापूरला शेजारच्या कर्नाटकातून रोज २५ हून जास्त ट्रक भाजीपाला येतो. तिथे मात्र काही प्रमाणात सुट्या पैशांवरून वादावादी झाली; परंतु काही व्यापाऱ्यांनी गुरुवारपासून ५०० रुपयांच्या नोटा स्वीकारायला सुरुवात केली. त्यामुळे सौदे काढण्यास कांही वेळ उशीर झाला.