शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

वाटाघाटीत अडकल्या नव्या बसेस

By admin | Updated: August 2, 2014 00:21 IST

फेरनिविदा काढणार : अशोक लेलॅँड कंपनीला ठेका देण्याचा निर्णय रद्दबातल

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या विशेष अनुदानातून महानगरपालिका परिवहन विभाग (के.एम.टी.) नव्या १०४ बसेस खरेदी करणार आहे. बस खरेदीसाठी काढलेल्या दुसऱ्यांदा निविदेत टाटा मोटर्स (२४.७२लाख), अशोक लेलँड (२४.६३ लाख) व व्ही. व्ही. मर्शियल व्हेईकल्स् (२५.२२लाख) (कंसातील दर प्रतिबस याप्रमाणे) बसेस पुरवठा करण्यास इच्छुक आहेत. सर्वांत कमी निविदा दर आलेल्या अशोक लेलँड कंपनीला ठेका देण्याचा निर्णय रद्दबातल ठरविण्यात आला. आज, शुक्रवारी परिवहन समितीच्या बैठकीत नव्याने निविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘अर्थ’पूर्ण वाटाघाटी करण्यासाठी अशोक लेलँडकडून प्रतिसाद न मिळाल्याने नव्याने निविदा काढण्यात येणार असल्याची चर्चा आहे. केंद्र सरकारने के.एम.टी.ला १०४ नव्या बसेस घेण्यासाठी ४४ कोटींचा निधी मंजूर केला आहे. महासभेने नव्या बसेसचा करासाठी साडेचार कोटी रुपयांची उभारणी करण्यास मंजुरी दिली आहे. नव्या बसेस आल्यानंतर के.एम.टी.ला पूर्ण क्षमतेने सेवा देणे सोपे होणार आहे. गेली दोन महिने भाडेतत्त्वावरील ३० बसेस बंद झाल्याने अनेक मार्गावरील सेवा बंद करण्याची वेळ के.एम.टी.वर आली आहे. कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिल्याखेरीज पगार होत नाही अशी अवस्था आहे. दररोज किमान दोन ते अडीच लाखांचा तोटा घेऊन प्रवास करणाऱ्या के.एम.टी.ला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी प्रशासकीय व राजकीय पातळीवर कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत.के.एम.टी.ने दुसऱ्यांदा काढलेल्या निविदेत तीन कंपन्या तांत्रिक निकषांवर पात्र ठरल्या. त्यामध्ये सर्वांत कमी दराची निविदा आलेल्या अशोक लेलँड कंपनीला निविदा मंजुरीचे पत्र देण्याबाबत बैठक लांबणीवर पडत होती. शेवटी निविदा नामंजूर करण्यात आली. केंद्र सरकारच्या निकषांप्रमाणे वरील चार कंपन्याच पुन्हा पात्र ठरणार आहेत तरीही पुन:पुन्हा निविदेच्या त्रांगड्यात नव्या बसेस अडवून ठेवण्यात येत आहेत. ‘ढपला संस्कृती’ला लगाम घालण्यासाठी आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी लक्ष घालण्याची मागणी के.एम.टी.च्या कर्मचाऱ्यांतून होत आहे. (प्रतिनिधी) नव्या बसेसमधून कशाप्रकारे हात ओले करता येतील याकडे व्यवस्थापनासह कारभाऱ्यांचे लक्ष आहे. गेली पंधरा दिवस निविदा प्रक्रिया पूर्ण होऊनही ठेकेदारास वर्क आॅर्डर देण्यास विलंब झाला. के.एम.टी.चे कितीही नुकसान झाले तरी चालेल; पण हिस्सा मिळालाच पाहिजे, अशीच व्यवस्थापन व समितीची भूमिका असल्यानेच दररोज एका ठेकेदारास आवतन दिले जाणार आहे.