शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
2
मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने'साठी २४ हजार कोटींची तरतूद
3
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
4
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
5
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
6
२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...
7
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
8
"माझ्याकडून ज्यांना घेतलं त्यांच्यासाठी मुख्यमंत्री..."; दानवेंच्या निरोपसमारंभात उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला
9
आधी प्रायव्हेट जेटवरून चर्चेत, आता आलिशान जीवनशैली समोर! झोमॅटोच्या मालकाची नेटवर्थ किती?
10
MTNL Loan Defaults: कर्जात बुडालीये 'ही' सरकारी कंपनी; बँकांना परत करू शकत नाहीये ८५८५ कोटींचं लोन, जाणून घ्या
11
भारतातून येमेनच्या मौलवींना गेला एक फोन, 'या' व्यक्तीच्या कॉलने वाचला निमिषा प्रियाचा जीव
12
Festive Hiring 2025: सणासुदीच्या काळात २.१६ लाख नोकऱ्या निर्माण होणार; पाहा कोणत्या क्षेत्रात आहेत संधी?
13
मांजर समजून बिबट्याच्या मागे लागली डॉगेश गँग; सत्य समजताच झाली पळताभुई, पाहा मजेशीर video
14
सुप्रीम कोर्टात बांधलेली काचेची भिंत वर्षभरातच पाडली, करदात्यांचे २.६८ कोटी रुपये वाया
15
Stock Market : सेन्सेक्स-निफ्टी सपाट, पण SBI-पतंजलीसह 'या' शेअर्सनी मारली बाजी, तुमचा स्टॉक यात आहे का?
16
पुण्यात चाललंय काय? सहा महिन्यांत 47 जणांची हत्या, महिन्याला 7 ते 8 हत्या
17
नाशिकमध्ये सहा महिन्यांमध्ये १७ बलात्कार, अत्याचार होतात, गुन्हेही दाखल; पण...
18
Salman Khan: सलमान खानने विकला आलिशान फ्लॅट, किती कोटींना झाली डील? वाचा सविस्तर
19
चिंताजनक! प्रसिद्ध अभिनेत्रीची भयानक अवस्था, रस्त्यावर सापडली, नसीरुद्दीन शाहांसोबत केलंय काम
20
१६०० कोटी पगार! मेटा 'या' व्यक्तींसाठी उधळतोय पाण्यासारखा पैसा, कारण ऐकून धक्का बसेल!

अपहारानंतर कागदपत्रेच गहाळ

By admin | Updated: January 29, 2015 23:54 IST

अधिकाऱ्यांचीही मेहरनजर : उपठेकेदारही नात्यातीलच, दप्तरसाठी कपाट फोडावे लागले

भीमगोंडा देसाई-कोल्हापूर -सातवे (ता. पन्हाळा) येथील जलस्वराज्य योजनेतील कागदपत्रे गहाळ झाल्याने किती अनियमितता आणि अपहार झाला हे स्पष्ट होत नाही, असा स्पष्ट अहवाल जिल्हा परिषद प्रशासनाने दिला आहे. यावरून आवश्यक कागदपत्रे गैरकारभार चव्हाट्यावर येणार म्हणूनच गहाळ केल्याचा संशय आता बळावत आहे. कागदपत्रे गहाळ होण्यात काही अधिकारी, कर्मचारी यांचीही ‘मेहरनजर’असल्याचे बोलले जात आहे. योजनेचे कामकाज पारदर्शक व्हावे, याकडे लक्ष देण्याची जबाबदारी तत्कालीन सरपंच सुमन सतीश नांगरे, ग्रामसेवक एच. जी. निरूखे यांची पहिली जबादारी होती. नियमानुसार आणि पारदर्शकपणे काम होते, की नाही हे पाहण्याचे काम जिल्हा परिषदेमधील अधिकाऱ्यांचे होते. परंतु, राजकीय आश्रय, कर्मचारी ते अधिकारी यांनी ‘सगळं काम समितीचे’, ‘ते गावानेच करायचे आहे’, असा सोयीस्करपणे युक्तिवाद करत जाणीवपूर्वक केलेल्या दुर्लक्षाने योजना वादग्रस्त ठरली. ढपला मारलेला आणि टक्केवारीची मलई बाहेर येणार म्हणून कागदपत्रे गहाळ केल्याचा आरोप तक्रारदार उत्तम नंदूरकर यांचा आहे. कागदपत्रे कोणाकडे आहेत याचा शोध घेण्यासाठी वेगवेगळया स्तरांवर चौकशी झाली. विविध समितीचे अध्यक्ष, सचिव व तत्कालीन ग्रामसेवकांनी तपास अधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदवले. जबाबात प्रत्येकजण कागदपत्रे सांभाळायचे काम माझे कसे नाही, हे सांगितले आहे. कागदपत्रे सांभाळण्यापेक्षा आपल्या वाटणीची टक्केवारी कशी मिळेल याकडेही ‘काहीं’नी अधिक रस दाखविला. परिणामी योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे झाले. ३१ आॅगस्ट २०१० ते ३१ आॅगस्ट २०११ कालावधित सरपंच म्हणून काम केलेले संजय दळवी यांनी आपल्या लेखी जबाबात म्हटले आहे, अभिलेख हस्तांतरणाचा (योजनेची कागदपत्रे) कागद खोटा आहे. त्याच्यावरील ठराव २५ नोव्हेंबर २००९ च्या ग्रामसभेतील नाही. हस्तांतराचा कागदच बोगस आहे. ग्रामपंचायतीचे दप्तर सांभाळण्याचे काम ग्रामसेवकाचे आहे. योजना पूर्ण झाल्यानंतरही पाणी वाड्यांना मिळत नाही. परिणामी जलस्वराज्य योजना कुचकामी ठरली. त्यामध्ये मोठा अपहार झाला आहे. विविध विभागांतील खर्च बोगस आहे.दरम्यान, ज्यांना ‘आर्थिक मेवा’ मिळाला आहे. त्यांनी जबाबात योजना कशी यशस्वी झाली आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे; परंतु चौकशी अहवालात वाळकेवाडी, शिंदेवाडी ग्रामस्थांना अजूनही पाण्यासाठी दाही दिशा फिरावे लागते, हे उघड झाले आहे. यावरून योजना फेल झाली आहे हे जगजाहीर आहे. राज्यात, तालुक्यात राजकीय वजन होते, त्यावेळी आमचे कोणीही काही करू शकत नाही, अशा अविभार्वात वावरणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर काही प्रमाणात का असेना धडा मिळाला आहे. (क्रमश:)तत्कालीन अध्यक्ष, सचिवच जबाबदारसमितीचे अध्यक्ष व सचिव यांनी मुख्य ठेकेदाराचा मृत्यू झाल्यानंतर उपठेकेदार नेमले. ते तत्कालीन अध्यक्ष, सरपंचांचे भाऊ आहेत. त्यामुळे नात्यातील लोकांनी संगनमताने हा गैरव्यवहार केल्याचे बोलले जात आहे. १३ आॅगस्ट २०१४ रोजी ग्रामपंचायतीमधील कपाट फोडून दप्तर बाहेर काढले. मात्र, मुख्य कागदपत्रांचे दप्तर मिळालेले नाही. त्यास अध्यक्ष व सचिवच जबाबदार आहेत, असेही जबाबात माजी सरपंच संजय दळवी यांनी म्हटले आहे. योजनेचे कसे ‘बारा वाजविले’ हे समजण्यासाठी हा जबाबच पुरेसा आहे.