शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

जिल्ह्यात ‘मनसे’च्या रेल्वेला लागली गळती

By admin | Updated: November 21, 2014 00:34 IST

पदाधिकाऱ्यांचे राजीनामासत्र सुरूच : नेतृत्वाच्या दुर्लक्षामुळे पक्षाला हादरा, नवीन निवडीतही अडचणी

प्रवीण देसाई - कोल्हापूर --विधानसभा निवडणुकीत राज्यात ‘मनसे’ला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. कोल्हापूर जिल्हाही त्याला अपवाद नाही. पक्षाला आता एका नव्या संकटाचा सामना करावा लागत आहे. तो म्हणजे पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या गळतीचा असून निवडणुकीच्या पूर्वीपासून लागलेली ही गळती अद्यापही थांबलेली नाही. नुकतेच एका जिल्हाध्यक्षांनी ‘जय महाराष्ट्र’ करून पक्षाला जिल्ह्यात हादरा दिला आहे. येणाऱ्या काळातही आणखी हादरे बसण्याची शक्यता आहे.पदाधिकाऱ्यांच्या वादाबरोबरच इतर विविध कारणांनी ‘मनसे’ नेहमीच चर्चेत राहिली आहे. सुरुवातीपासूनच पक्षाला गटबाजीचे ग्रहण लागले आहे. त्यामध्ये शहरात एकाचवेळी तीन-तीन शहराध्यक्षांची नेमणूक झाली होती. त्यामुळे प्रत्येकाचे गट आणि तट यामध्ये पक्षाची विभागणी होऊन ही गटबाजी अधिकच तीव्र झाली होती परंतु यामध्ये हस्तक्षेप करून ती मिटविण्याचा साधा प्रयत्न ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून झाला नाही. तत्कालिन जिल्हा संपर्कप्रमुखांनी तर याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले होते. अलीकडच्या काळात यशवंत किल्लेदार या युवा संपर्कप्रमुखाने सूत्रे स्वीकारल्यानंतर नवीन कार्यकारिणी निवडून नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संधी दिली. काही काळ सुरळीतपणे काम सुरू होते पण आता त्यांनी नेमलेले पदाधिकारीसुद्धा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करत आहेत. एक-एक करत ही संख्या आता वाढत आहे.निवडणुकीपूर्वी काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला होता. परंतु आता निवडणुुकीनंतरही प्रमुख पदाधिकारी पदाचा आणि पक्षसदस्यत्वाचा राजीनामा देऊन पक्षाला रामराम करताना दिसत आहेत. निवडणुकीपूर्वीपासून लागलेली ही गळती थांबण्याऐवजी ती अधिकच वाढत चालली असल्याचे चित्र आहे. लवकरच काही प्रमुख पदाधिकारी पक्षातून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. त्याचबरोबर पक्षनेतृत्वाचे दुर्लक्ष आणि निवडणुकांमध्ये पक्षाच्या वरिष्ठ तसेच स्थानिक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या ‘सोयीच्या भूमिके’मुळे बहुतांश पदाधिकारी व कार्यकर्ते हे नाराज आहेत. ते जरी पक्षातून बाहेर पडले नसले तरी ते पक्षाच्या कामासाठीही अद्याप बाहेर पडले नसल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर फेरबदल करून नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे संकेत पक्षाच्या वरिष्ठ स्तरावरून जरी देण्यात आले असले तरी सध्याचे वातावरण पाहता ते अडचणीचे ठरणार आहे.विधानसभा निवडणुकीत ‘मनसे’ने जिल्ह्यातील दहापैकी नऊ जागांवर उमेदवार उभे केले होते. परंतु सर्वच ठिकाणी अनामत रक्कम जप्त झाली. हाताच्या बोटावर मोजण्या इतकी मते पडल्याने इतके दिवस आंदोलने करून व संघटनात्मक काम करून बांधलेली कार्यकर्त्यांची मोट गेली कुठं. काही ठिकाणी तर पक्षाच्या उमेदवारांना कार्यकर्तेही मिळाले नाहीत. काही पदाधिकाऱ्यांनी पक्षविरोधी भूमिका घेत दुसऱ्या पक्षाच्या उमेदवारांना रसद देण्याचे काम केले. यामध्ये ‘अर्थ’पूर्ण व्यवहार झाल्याची चर्चा आहे. याबाबत लेखी स्वरुपात त्याचबरोबर अन्य माध्यमांतून पक्षनेतृत्वाकडे तक्रारी गेल्या आहेत. जिल्ह्यात ‘मनसे’ला गळती वगैरे काहीही लागलेली नाही, तर पक्ष सोडून जाणाऱ्यांची कारणे वेगळी आहेत. त्याचे स्पष्टीकरण आपण कोल्हापुरात आल्यावर देऊ.- यशवंत किल्लेदार, संपर्क जिल्हाध्यक्ष, मनसे.यांनी केला जय महाराष्ट्र...मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष दिवाकर पाटील, उदय पोवार, व माजी जिल्हा उपाध्यक्ष नामदेव गिरी यांनी राजीनामा दिला.