शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मलकापुरात ‘शाळी’च्या पाण्यास दुर्गंधी

By admin | Updated: January 20, 2017 23:54 IST

पाणीपुरवठा योजना बंद : प्रदूषित पाण्यामुळे शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न

मलकापूर : मलकापूर शहरातील शाळी नदीच्या पाण्याचे प्रदूषण झाले असून, पाण्याचा उग्र वास येत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न बनला आहे. नदीचे प्रदूषण रोखण्याचे आव्हान सत्ताधारी जनसुराज्य व भाजप आघाडीसमोर आहे.शहराची लोकसंख्या ५ हजार ५५५ इतकी आहे. मलकापूर हे विशाळगड जहागिरीची राजधानी होती. त्यामुळे छत्रपती शाहू महाराज यांनी खास बाब म्हणून मलकापूरला नगरपरिषद स्थापन केली. शाळी व कडवी या दोन नद्यांच्या तीरावर मलकापूर शहर वसले आहे. या दोन्ही नद्यांमुळे शहराची वाढ होत नाही. शहराच्या उजव्या बाजूने शाळी नदी वाहत आहे. आॅक्टोबरमध्ये मलकापूर शहराजवळ असणाऱ्या बंधाऱ्यात पाणी अडविले जाते; पण पालेश्वर धरणातून पाण्याचा प्रवाह कमी झाल्यावर शाळी नदीचे पाणी वाहण्याचे बंद होते. शाळी नदीवर नगरपरिषदेची पाण्याची योजना आहे. या योजनेसाठी नगरपरिषदेने लाखो रुपये दिले आहेत. प्रदूषित पाण्यामुळे ही पाणी योजना बंद ठेवण्यात आली आहे, तर शहरातील गटाराचे पाणी, शौचालयांचे पाणी शाळी नदीत मिसळत आहे. जनावरेदेखील या नदीत धुतली जातात. धरणातून पाण्याचा प्रवाह बंद झाल्यामुळे नदीच्या पाण्याला हिरवा रंग प्राप्त झाला असून, पाणी दूषित झाले आहे. पाण्याला उग्र वास सुटल्यामुळे नागरिकांना याचा त्रास होत आहे. दरवर्षी या नदीचे पाणी दूषित होत असते. या दूषित पाण्यामुळे शाळी नदीवरील पाणी योजना पालिकेला बंद ठेवून कडवी नदीवरील पाणी योजनेवर शहराला पाणीपुरवठा करावा लागतो. त्यामुळे नागरिकांना एक दिवसाआड पाणी मिळते. या नदीच्या पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी सत्ताधारी जनसुराज्य व भाजप महाआघाडीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)प्रक्रिया : यंत्रणा हवीशहरातील गटारे, शौचालयांच्या पाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा पालिकेने उभी करावी व शाळी नदीचे पाण्याचे प्रदूषण रोखावे. भविष्यात वाढणाऱ्या लोकसंख्येला पाण्याची समस्या जाणवणार नाही यासाठी लोकप्रतिनिधींकडून शासन दरबारी प्रयत्न होणे गरजेचे आहे. शाळी नदीचे दूषित झालेले पाणी स्वच्छ करण्यासाठी शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या यंत्रणेचा प्रस्ताव शासन दरबारी दाखल करणार आहे. -अमोल केसरकर, नगराध्यक्ष