शहरं
Join us  
Trending Stories
1
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
2
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
3
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
4
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
5
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
6
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
7
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
8
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
9
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
10
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
12
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
13
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
14
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
15
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
16
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
17
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
18
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
19
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
20
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं

मलकापुरात ‘शाळी’च्या पाण्यास दुर्गंधी

By admin | Updated: January 20, 2017 23:54 IST

पाणीपुरवठा योजना बंद : प्रदूषित पाण्यामुळे शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न

मलकापूर : मलकापूर शहरातील शाळी नदीच्या पाण्याचे प्रदूषण झाले असून, पाण्याचा उग्र वास येत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न बनला आहे. नदीचे प्रदूषण रोखण्याचे आव्हान सत्ताधारी जनसुराज्य व भाजप आघाडीसमोर आहे.शहराची लोकसंख्या ५ हजार ५५५ इतकी आहे. मलकापूर हे विशाळगड जहागिरीची राजधानी होती. त्यामुळे छत्रपती शाहू महाराज यांनी खास बाब म्हणून मलकापूरला नगरपरिषद स्थापन केली. शाळी व कडवी या दोन नद्यांच्या तीरावर मलकापूर शहर वसले आहे. या दोन्ही नद्यांमुळे शहराची वाढ होत नाही. शहराच्या उजव्या बाजूने शाळी नदी वाहत आहे. आॅक्टोबरमध्ये मलकापूर शहराजवळ असणाऱ्या बंधाऱ्यात पाणी अडविले जाते; पण पालेश्वर धरणातून पाण्याचा प्रवाह कमी झाल्यावर शाळी नदीचे पाणी वाहण्याचे बंद होते. शाळी नदीवर नगरपरिषदेची पाण्याची योजना आहे. या योजनेसाठी नगरपरिषदेने लाखो रुपये दिले आहेत. प्रदूषित पाण्यामुळे ही पाणी योजना बंद ठेवण्यात आली आहे, तर शहरातील गटाराचे पाणी, शौचालयांचे पाणी शाळी नदीत मिसळत आहे. जनावरेदेखील या नदीत धुतली जातात. धरणातून पाण्याचा प्रवाह बंद झाल्यामुळे नदीच्या पाण्याला हिरवा रंग प्राप्त झाला असून, पाणी दूषित झाले आहे. पाण्याला उग्र वास सुटल्यामुळे नागरिकांना याचा त्रास होत आहे. दरवर्षी या नदीचे पाणी दूषित होत असते. या दूषित पाण्यामुळे शाळी नदीवरील पाणी योजना पालिकेला बंद ठेवून कडवी नदीवरील पाणी योजनेवर शहराला पाणीपुरवठा करावा लागतो. त्यामुळे नागरिकांना एक दिवसाआड पाणी मिळते. या नदीच्या पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी सत्ताधारी जनसुराज्य व भाजप महाआघाडीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)प्रक्रिया : यंत्रणा हवीशहरातील गटारे, शौचालयांच्या पाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा पालिकेने उभी करावी व शाळी नदीचे पाण्याचे प्रदूषण रोखावे. भविष्यात वाढणाऱ्या लोकसंख्येला पाण्याची समस्या जाणवणार नाही यासाठी लोकप्रतिनिधींकडून शासन दरबारी प्रयत्न होणे गरजेचे आहे. शाळी नदीचे दूषित झालेले पाणी स्वच्छ करण्यासाठी शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या यंत्रणेचा प्रस्ताव शासन दरबारी दाखल करणार आहे. -अमोल केसरकर, नगराध्यक्ष