शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

मलकापुरात ‘शाळी’च्या पाण्यास दुर्गंधी

By admin | Updated: January 20, 2017 23:54 IST

पाणीपुरवठा योजना बंद : प्रदूषित पाण्यामुळे शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न

मलकापूर : मलकापूर शहरातील शाळी नदीच्या पाण्याचे प्रदूषण झाले असून, पाण्याचा उग्र वास येत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न बनला आहे. नदीचे प्रदूषण रोखण्याचे आव्हान सत्ताधारी जनसुराज्य व भाजप आघाडीसमोर आहे.शहराची लोकसंख्या ५ हजार ५५५ इतकी आहे. मलकापूर हे विशाळगड जहागिरीची राजधानी होती. त्यामुळे छत्रपती शाहू महाराज यांनी खास बाब म्हणून मलकापूरला नगरपरिषद स्थापन केली. शाळी व कडवी या दोन नद्यांच्या तीरावर मलकापूर शहर वसले आहे. या दोन्ही नद्यांमुळे शहराची वाढ होत नाही. शहराच्या उजव्या बाजूने शाळी नदी वाहत आहे. आॅक्टोबरमध्ये मलकापूर शहराजवळ असणाऱ्या बंधाऱ्यात पाणी अडविले जाते; पण पालेश्वर धरणातून पाण्याचा प्रवाह कमी झाल्यावर शाळी नदीचे पाणी वाहण्याचे बंद होते. शाळी नदीवर नगरपरिषदेची पाण्याची योजना आहे. या योजनेसाठी नगरपरिषदेने लाखो रुपये दिले आहेत. प्रदूषित पाण्यामुळे ही पाणी योजना बंद ठेवण्यात आली आहे, तर शहरातील गटाराचे पाणी, शौचालयांचे पाणी शाळी नदीत मिसळत आहे. जनावरेदेखील या नदीत धुतली जातात. धरणातून पाण्याचा प्रवाह बंद झाल्यामुळे नदीच्या पाण्याला हिरवा रंग प्राप्त झाला असून, पाणी दूषित झाले आहे. पाण्याला उग्र वास सुटल्यामुळे नागरिकांना याचा त्रास होत आहे. दरवर्षी या नदीचे पाणी दूषित होत असते. या दूषित पाण्यामुळे शाळी नदीवरील पाणी योजना पालिकेला बंद ठेवून कडवी नदीवरील पाणी योजनेवर शहराला पाणीपुरवठा करावा लागतो. त्यामुळे नागरिकांना एक दिवसाआड पाणी मिळते. या नदीच्या पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी सत्ताधारी जनसुराज्य व भाजप महाआघाडीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)प्रक्रिया : यंत्रणा हवीशहरातील गटारे, शौचालयांच्या पाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा पालिकेने उभी करावी व शाळी नदीचे पाण्याचे प्रदूषण रोखावे. भविष्यात वाढणाऱ्या लोकसंख्येला पाण्याची समस्या जाणवणार नाही यासाठी लोकप्रतिनिधींकडून शासन दरबारी प्रयत्न होणे गरजेचे आहे. शाळी नदीचे दूषित झालेले पाणी स्वच्छ करण्यासाठी शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या यंत्रणेचा प्रस्ताव शासन दरबारी दाखल करणार आहे. -अमोल केसरकर, नगराध्यक्ष