शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
4
shefali jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
7
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
10
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
11
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
12
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
13
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
14
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
15
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
16
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
17
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
18
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
19
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
20
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले

मलकापुरात ‘शाळी’च्या पाण्यास दुर्गंधी

By admin | Updated: January 20, 2017 23:54 IST

पाणीपुरवठा योजना बंद : प्रदूषित पाण्यामुळे शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न

मलकापूर : मलकापूर शहरातील शाळी नदीच्या पाण्याचे प्रदूषण झाले असून, पाण्याचा उग्र वास येत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न बनला आहे. नदीचे प्रदूषण रोखण्याचे आव्हान सत्ताधारी जनसुराज्य व भाजप आघाडीसमोर आहे.शहराची लोकसंख्या ५ हजार ५५५ इतकी आहे. मलकापूर हे विशाळगड जहागिरीची राजधानी होती. त्यामुळे छत्रपती शाहू महाराज यांनी खास बाब म्हणून मलकापूरला नगरपरिषद स्थापन केली. शाळी व कडवी या दोन नद्यांच्या तीरावर मलकापूर शहर वसले आहे. या दोन्ही नद्यांमुळे शहराची वाढ होत नाही. शहराच्या उजव्या बाजूने शाळी नदी वाहत आहे. आॅक्टोबरमध्ये मलकापूर शहराजवळ असणाऱ्या बंधाऱ्यात पाणी अडविले जाते; पण पालेश्वर धरणातून पाण्याचा प्रवाह कमी झाल्यावर शाळी नदीचे पाणी वाहण्याचे बंद होते. शाळी नदीवर नगरपरिषदेची पाण्याची योजना आहे. या योजनेसाठी नगरपरिषदेने लाखो रुपये दिले आहेत. प्रदूषित पाण्यामुळे ही पाणी योजना बंद ठेवण्यात आली आहे, तर शहरातील गटाराचे पाणी, शौचालयांचे पाणी शाळी नदीत मिसळत आहे. जनावरेदेखील या नदीत धुतली जातात. धरणातून पाण्याचा प्रवाह बंद झाल्यामुळे नदीच्या पाण्याला हिरवा रंग प्राप्त झाला असून, पाणी दूषित झाले आहे. पाण्याला उग्र वास सुटल्यामुळे नागरिकांना याचा त्रास होत आहे. दरवर्षी या नदीचे पाणी दूषित होत असते. या दूषित पाण्यामुळे शाळी नदीवरील पाणी योजना पालिकेला बंद ठेवून कडवी नदीवरील पाणी योजनेवर शहराला पाणीपुरवठा करावा लागतो. त्यामुळे नागरिकांना एक दिवसाआड पाणी मिळते. या नदीच्या पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी सत्ताधारी जनसुराज्य व भाजप महाआघाडीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)प्रक्रिया : यंत्रणा हवीशहरातील गटारे, शौचालयांच्या पाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा पालिकेने उभी करावी व शाळी नदीचे पाण्याचे प्रदूषण रोखावे. भविष्यात वाढणाऱ्या लोकसंख्येला पाण्याची समस्या जाणवणार नाही यासाठी लोकप्रतिनिधींकडून शासन दरबारी प्रयत्न होणे गरजेचे आहे. शाळी नदीचे दूषित झालेले पाणी स्वच्छ करण्यासाठी शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या यंत्रणेचा प्रस्ताव शासन दरबारी दाखल करणार आहे. -अमोल केसरकर, नगराध्यक्ष