शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

महापालिकेत होणार ‘महाभरती’

By admin | Updated: November 28, 2014 23:44 IST

नव्या आकृतिबंधास वेग : लवकरच प्रस्ताव पाठविणार; ७०० नवे कर्मचारी येणार

संतोष पाटील - कोल्हापूर -महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून गेली ४० वर्षे नवी कामगार सूची झाली नाही. शहराची लोकसंख्या चौपट झाली, विभाग व घरे तिप्पट झाली. तरी कामगारांचा आकृतिबंध १९७४ साली होता तोच आहे. मात्र आता स्थायी समितीची शिफारस व महासभेच्या मंजुरीमुळे नव्या कामगार सूचीला वेग आला आहे. प्रशासनाने प्रस्ताव पाठविल्यानंतर येत्या तीन महिन्यांत महापालिकेत तब्बल २० टक्के नोकर वाढणार असून, ७०० हून अधिक कामगारांची भरती होणार आहे.राज्यातील ‘बेबी कॉर्पोरेशन’ म्हणून १६ एप्रिल १९७४ रोजी कोल्हापूरला लोकसंख्येचा निकष बसत नसतानाही विशेष बाब म्हणून महापालिका स्थापन करण्यात आली. त्यावेळी शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, शनिवार पेठ, राजारामपुरी, शाहूपुरी, बावडा असे जुने पेठांचे कोल्हापूरच अस्तित्वात होते. १९९२ नंतर शहरीकरणाचा वेगाने विस्तार झाला. नगरपालिका असताना पावणेदोन लाख असणारी लोकसंख्या आता सहा लाखांचा टप्पा ओलांडत आहे. मात्र, महापालिकेत असणारी कर्मचाऱ्यांची सूची व आकृतिबंध १९७४ चा आहे. यामध्ये दर दहा वर्षांनी आवश्यक असणारा बदल केला गेला नाही.सध्या महापालिकेत ४८०० कायम, तर ५५० रोजंदारीवरील कर्मचारी आहेत. यातील १५०० झाडू कामगार, ३१२ सफाई कामगार व ६४१ ‘पवडी’ कामगार आहेत. एकूण कर्मचाऱ्यांपैकी तब्बल तीन हजार कर्मचारी इतर कामांसाठी वापरातील आहेत. १८०० कर्मचाऱ्यांवर ३६ विभागांचा भार आहे. यामध्ये ४२ खातेप्रमुख आहेत. उर्वरित कर्मचाऱ्यांची तांत्रिक, अतांत्रिक, लेखा व प्रशासकीय अशी विभागणी आहे. शहरात १९७४ साली ५० हजार मिळकती होत्या. आज त्या १,३६,००० आहेत. लोकसंख्याही चौपट झाली. मात्र, नोकरभरती झाली नसल्याने रोजंदारीसह ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांवर काम चालविले जात आहे. नागरिकांना वेळेत सुविधा देण्यासाठी नव्याने आकृतिबंध करण्याचा निर्णय घेतला आहे.१ कोटी ६० लाखांचा भारमहापालिकेतील नोकरपगारावर सध्या आठ कोटी रुपये खर्च होतात. नव्या भरतीनंतर यामध्ये एक कोटी साठ लाखांची भर पडणार आहे. मात्र, यामुळे २० टक्के जागांचे मनुष्यबळ शहरवासीयांच्या सेवेत दाखल होईल.राज्य शासनाने नव्या आकृतिबंधानुसार नोकरभरती सुरू केली आहे. ‘बीपीएमसी अ‍ॅक्ट’ कलम ५१ अनुसार याचा कोल्हापूरला फायदा होऊ शकतो. प्रशासनाने कायद्याच्या चाकोरीतून प्रस्ताव पाठविल्यास तीन महिन्यांत नव्या नोकरभरतीचा मार्ग खुला होणार आहे.