शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

आजऱ्यात ७ वर्षात जंगली जनावरांकडून ४ कोटी ४१ लाख ९६ हजारांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:29 IST

सदाशिव मोरे। आजरा आजरा तालुक्यात हत्ती, गवे व जंगली जनावरांचा उपद्रप वाढला आहे. गेल्या ७ वर्षात जंगली जनावरांनी केलेल्या ...

सदाशिव मोरे। आजरा

आजरा तालुक्यात हत्ती, गवे व जंगली जनावरांचा उपद्रप वाढला आहे. गेल्या ७ वर्षात जंगली जनावरांनी केलेल्या नुकसानीची ४ कोटी ४१ लाख ९६ हजारांची भरपाई शेतकऱ्यांना वनविभागाने दिली आहे. भरपाईच्या रकमेपेक्षा नुकसानीची रक्कम अधिक आहे. जंगली जनावरांच्या भीतीने बहुतांशी शेतकऱ्यांनी जंगलाशेजारील शेती करणे बंद केले आहे.

आजरा तालुक्यात २००६ पासून हत्तींचे आगमन झाले आहे. हत्तींचे वास्तव्य मसोली, हाळोली, घाटकरवाडी व सुळेरान परिसरात आहे. शेतकरी राजा प्रत्येक वर्षी मशागत करून शेती करतो. मात्र, हत्ती व गव्यांसह जंगली जनावरांकडून पिकांची नासधूस मोठ्या प्रमाणात केली जाते. दिवसा जंगलात व रात्री शेतकऱ्यांच्या पिकावर डल्ला मारण्याचे काम जंगली जनावरांकडून सुरूच आहे. हत्ती गव्यांच्या भीतीने शेतकऱ्यांनी शेतातील राखणेही बंद केले आहे.

वनविभागाचे कर्मचारी गेली बारा-तेरा वर्षे दिवसा नुकसानीचे पंचनामे तर रात्री हत्तीला हुसकावून लावण्याचे काम करीत आहेत. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची आधुनिक साधने नाहीत. फक्त सूर बाणाने हत्तीला हुसकावून लावले जात आहे. सध्या जंगल क्षेत्रात हत्ती व गव्यांना त्यांचे खाद्य कमी झाले आहे. त्यामुळे त्यांचा अधिवास खाजगी मालकीतील जमिनीमध्ये होताना दिसून येतो. जंगलांमध्ये वनतळी व जंगली जनावरांसाठी खाद्य उपलब्ध करणे गरजेचे आहे. पिकांच्या नुकसानीबरोबर जंगलातील प्राणी जंगल क्षेत्रातच राहण्यासाठी योग्य ती उपाययोजना करणे गरजेचे आहे.

चौकट: ..नुकसानीची वर्षनिहाय दिलेली भरपाई रक्कम

२०१४-१५ - १९ लाख १६ हजार

२०१५-१६ - ४१ लाख ६२ हजार

२०१६-१७ - ५४ लाख ८० हजार

२०१७-१८ - ७४ लाख ७३ हजार

२०१८-१९ -६९ लाख ०८ हजार २०१९ -२० - ८८ लाख ७१ हजार

२०२०-२१ - ९३ लाख ४३ हजार.

मार्च ते जुलै २०२१ - ९४ लाख १५ हजार

-

-- हत्ती संगोपन केंद्राची गरज

घाटकरवाडी परिसरात हत्ती संगोपन केंद्र सुरू करण्याबाबत वनविभागाच्या हालचाली सुरू आहेत. पण, या परिसरातील ग्रामस्थांनी याला विरोध केला आहे. मात्र हत्ती संगोपन केंद्र सुरु झाल्यास पर्यटनाला चालना मिळून रोजगारामध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. त्यासाठी वनविभागाने घाटकरवाडी परिसरातील शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन माहिती देणे गरजेचे आहे.

चौकट :

...पिकांचे होणारे नुकसान

टस्कर हत्तीसह गव्यांकडून ऊस, केळी, नारळ, काजू, मेसकाठी, फणस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्याचबरोबर शेती अवजारे व पाईपलाईन पाण्याच्या टाक्या फोडल्या जात आहेत. हत्ती, गव्यांकडून होणारे नुकसान लाखात असले तरी भरपाई मात्र हजार रूपयात मिळत आहे.