शहरं
Join us  
Trending Stories
1
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
2
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
3
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
4
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
5
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
6
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
7
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
8
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
9
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
10
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
11
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
12
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
13
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
14
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
15
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
16
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
17
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
18
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
19
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
20
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक

आजऱ्यात ७ वर्षात जंगली जनावरांकडून ४ कोटी ४१ लाख ९६ हजारांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:29 IST

सदाशिव मोरे। आजरा आजरा तालुक्यात हत्ती, गवे व जंगली जनावरांचा उपद्रप वाढला आहे. गेल्या ७ वर्षात जंगली जनावरांनी केलेल्या ...

सदाशिव मोरे। आजरा

आजरा तालुक्यात हत्ती, गवे व जंगली जनावरांचा उपद्रप वाढला आहे. गेल्या ७ वर्षात जंगली जनावरांनी केलेल्या नुकसानीची ४ कोटी ४१ लाख ९६ हजारांची भरपाई शेतकऱ्यांना वनविभागाने दिली आहे. भरपाईच्या रकमेपेक्षा नुकसानीची रक्कम अधिक आहे. जंगली जनावरांच्या भीतीने बहुतांशी शेतकऱ्यांनी जंगलाशेजारील शेती करणे बंद केले आहे.

आजरा तालुक्यात २००६ पासून हत्तींचे आगमन झाले आहे. हत्तींचे वास्तव्य मसोली, हाळोली, घाटकरवाडी व सुळेरान परिसरात आहे. शेतकरी राजा प्रत्येक वर्षी मशागत करून शेती करतो. मात्र, हत्ती व गव्यांसह जंगली जनावरांकडून पिकांची नासधूस मोठ्या प्रमाणात केली जाते. दिवसा जंगलात व रात्री शेतकऱ्यांच्या पिकावर डल्ला मारण्याचे काम जंगली जनावरांकडून सुरूच आहे. हत्ती गव्यांच्या भीतीने शेतकऱ्यांनी शेतातील राखणेही बंद केले आहे.

वनविभागाचे कर्मचारी गेली बारा-तेरा वर्षे दिवसा नुकसानीचे पंचनामे तर रात्री हत्तीला हुसकावून लावण्याचे काम करीत आहेत. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची आधुनिक साधने नाहीत. फक्त सूर बाणाने हत्तीला हुसकावून लावले जात आहे. सध्या जंगल क्षेत्रात हत्ती व गव्यांना त्यांचे खाद्य कमी झाले आहे. त्यामुळे त्यांचा अधिवास खाजगी मालकीतील जमिनीमध्ये होताना दिसून येतो. जंगलांमध्ये वनतळी व जंगली जनावरांसाठी खाद्य उपलब्ध करणे गरजेचे आहे. पिकांच्या नुकसानीबरोबर जंगलातील प्राणी जंगल क्षेत्रातच राहण्यासाठी योग्य ती उपाययोजना करणे गरजेचे आहे.

चौकट: ..नुकसानीची वर्षनिहाय दिलेली भरपाई रक्कम

२०१४-१५ - १९ लाख १६ हजार

२०१५-१६ - ४१ लाख ६२ हजार

२०१६-१७ - ५४ लाख ८० हजार

२०१७-१८ - ७४ लाख ७३ हजार

२०१८-१९ -६९ लाख ०८ हजार २०१९ -२० - ८८ लाख ७१ हजार

२०२०-२१ - ९३ लाख ४३ हजार.

मार्च ते जुलै २०२१ - ९४ लाख १५ हजार

-

-- हत्ती संगोपन केंद्राची गरज

घाटकरवाडी परिसरात हत्ती संगोपन केंद्र सुरू करण्याबाबत वनविभागाच्या हालचाली सुरू आहेत. पण, या परिसरातील ग्रामस्थांनी याला विरोध केला आहे. मात्र हत्ती संगोपन केंद्र सुरु झाल्यास पर्यटनाला चालना मिळून रोजगारामध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. त्यासाठी वनविभागाने घाटकरवाडी परिसरातील शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन माहिती देणे गरजेचे आहे.

चौकट :

...पिकांचे होणारे नुकसान

टस्कर हत्तीसह गव्यांकडून ऊस, केळी, नारळ, काजू, मेसकाठी, फणस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्याचबरोबर शेती अवजारे व पाईपलाईन पाण्याच्या टाक्या फोडल्या जात आहेत. हत्ती, गव्यांकडून होणारे नुकसान लाखात असले तरी भरपाई मात्र हजार रूपयात मिळत आहे.