शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

साडेदहा हजार शेतकऱ्यांचे नुकसान

By admin | Updated: February 27, 2015 23:20 IST

वनविभागाकडून नाममात्र भरपाई : कागदपत्रांच्या पूर्ततेवरच होतोय खर्च, उस नुकसानीस प्रतिटन फक्त ४०० रुपये

भीमगोंडा देसाई - कोल्हापूर -वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे, फळझाडांचे नुकसान झाल्यास वनविभागाकडून भरपाई दिली जाणारी भरपाई नाममात्र आहे. कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी होणाऱ्या खर्चापेक्षा भरपाई कमी मिळते. उसाचे नुकसान झाल्यास टनाला फक्त चारशे रुपये मिळतात. त्यामुळे शेतकऱ्यांवर ‘भीक नको; पण कुत्रं आवर’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. सन २००४ ते जानेवारी २०१५ अखेर कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या पाच जिल्ह्यांतील पीक आणि फळझाडांचे १० हजार ६७२ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. भरपाईपोटी ९ कोटी ५२ लाख ५३ हजार रुपये वनविभागाने दिले आहेत.हत्ती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी वनविभागाची अत्यल्प भरपाई २३ आॅगस्ट २००४ रोजी नाकारली. पाच जिल्ह्यांंतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली भरपाई वाढीसाठी वेळोवेळी निवेदने, आंदोलने, मोर्चा, उपोषण केले. याची दखल घेऊन शासनाने २००६, २०१३ मध्ये नुकसानभरपाईत अत्यल्प वाढ केली.हत्ती, रानगवे यांच्यापासून नुकसान झालेल्या नारळाच्या प्रतिझाडास दोन हजार, सुपारीस १२०० रुपये, कलमी आंब्यास १६०० रुपये, केळीस ४८ रुपये भरपाईचा दर आहे. हत्ती, रानडुक्कर, हरीण, रानगवा, नीलगाय, माकड यांच्यापासून पिकांचे २ हजार ते १० हजारांपर्यंत नुकसान झाल्यास कमीत कमी ५०० पासून ६ हजार, तर १० हजारांपेक्षा अधिक नुकसान झाल्यास सहा हजार ते १५ हजार रुपये भरपाई दिली जाते. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात गाय, म्हैस, बैलाचा मृत्यू झाल्यास अधिकाधिक दहा हजार, मेंढी, बकरी यांचा मृत्यू झाल्यास अधिकाधिक तीन हजार भरपाई देण्याची तरतूद आहे. जखमी प्रती जनावरास फक्त एक हजार रुपये दिले जातात. बाजारातील जनावराची किंमत आणि वनविभागाकडून दिल्या जाणाऱ्या सध्याच्या भरपाईमध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भुर्दंड सोसावा लागत आहे. वाघ, बिबट्या, अस्वल, गवा, रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, हत्ती, मगर, रानकुत्र्यांच्या हल्ल्यात व्यक्ती मृत झाल्यास वारसांना पाच लाख, कायमचे व्यंगत्व आल्यास चार लाख, गंभीर जखमी झाल्यास दहा हजार रुपये दिले जातात. (समाप्त)नारळासाठी फक्त ७ रुपये प्रजननादरम्यान गिधाड नारळाच्या झाडावर घरटे बांधते. त्याच्या विष्ठेने नारळाचे उत्पन्न घटते. नुकसानग्रस्तास प्रतिनारळास केवळ सात रुपये नुकसानभरपाई दिली जाते. ही रक्कम मिळण्यासाठीही गिधाडांच्या विणीचा हंगाम संपेपर्यंत शेतकऱ्यांनी घरट्यांचे संरक्षण करण्याची जाचक अटही त्यात आहे. नुकसानीची प्रकरणे अन् भरपाईपाच जिल्ह्यांत वर्षनिहाय झालेली नुकसानीची प्रकरणे आणि कंसात मिळालेली भरपाई अशी : २००४-०५ : ९ (२४ लाख), २००५-०६ : ५४४ (२१ लाख ९८ हजार), २००६-०७ : १४०९ (१ कोटी ५८ लाख ७६ हजार), २००७-०८ : १७९९ (१ कोटी ५७ लाख ४४ हजार), २००८-०९ : २४२२ (२ कोटी १८ लाख ९६ हजार), २००९-१० : ३७३ (८ लाख ५७ हजार), २०१०-११ : १२३८ (१ कोटी ३० लाख ८८९), २०११-१२ : ९५८ (७२ लाख १७२), २०१२-१३ : ९९८ (८६ लाख ८३ हजार), २०१३-१४ : ९६ हजार २१ हजार.