शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

साडेदहा हजार शेतकऱ्यांचे नुकसान

By admin | Updated: February 27, 2015 23:20 IST

वनविभागाकडून नाममात्र भरपाई : कागदपत्रांच्या पूर्ततेवरच होतोय खर्च, उस नुकसानीस प्रतिटन फक्त ४०० रुपये

भीमगोंडा देसाई - कोल्हापूर -वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे, फळझाडांचे नुकसान झाल्यास वनविभागाकडून भरपाई दिली जाणारी भरपाई नाममात्र आहे. कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी होणाऱ्या खर्चापेक्षा भरपाई कमी मिळते. उसाचे नुकसान झाल्यास टनाला फक्त चारशे रुपये मिळतात. त्यामुळे शेतकऱ्यांवर ‘भीक नको; पण कुत्रं आवर’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. सन २००४ ते जानेवारी २०१५ अखेर कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या पाच जिल्ह्यांतील पीक आणि फळझाडांचे १० हजार ६७२ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. भरपाईपोटी ९ कोटी ५२ लाख ५३ हजार रुपये वनविभागाने दिले आहेत.हत्ती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी वनविभागाची अत्यल्प भरपाई २३ आॅगस्ट २००४ रोजी नाकारली. पाच जिल्ह्यांंतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली भरपाई वाढीसाठी वेळोवेळी निवेदने, आंदोलने, मोर्चा, उपोषण केले. याची दखल घेऊन शासनाने २००६, २०१३ मध्ये नुकसानभरपाईत अत्यल्प वाढ केली.हत्ती, रानगवे यांच्यापासून नुकसान झालेल्या नारळाच्या प्रतिझाडास दोन हजार, सुपारीस १२०० रुपये, कलमी आंब्यास १६०० रुपये, केळीस ४८ रुपये भरपाईचा दर आहे. हत्ती, रानडुक्कर, हरीण, रानगवा, नीलगाय, माकड यांच्यापासून पिकांचे २ हजार ते १० हजारांपर्यंत नुकसान झाल्यास कमीत कमी ५०० पासून ६ हजार, तर १० हजारांपेक्षा अधिक नुकसान झाल्यास सहा हजार ते १५ हजार रुपये भरपाई दिली जाते. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात गाय, म्हैस, बैलाचा मृत्यू झाल्यास अधिकाधिक दहा हजार, मेंढी, बकरी यांचा मृत्यू झाल्यास अधिकाधिक तीन हजार भरपाई देण्याची तरतूद आहे. जखमी प्रती जनावरास फक्त एक हजार रुपये दिले जातात. बाजारातील जनावराची किंमत आणि वनविभागाकडून दिल्या जाणाऱ्या सध्याच्या भरपाईमध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भुर्दंड सोसावा लागत आहे. वाघ, बिबट्या, अस्वल, गवा, रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, हत्ती, मगर, रानकुत्र्यांच्या हल्ल्यात व्यक्ती मृत झाल्यास वारसांना पाच लाख, कायमचे व्यंगत्व आल्यास चार लाख, गंभीर जखमी झाल्यास दहा हजार रुपये दिले जातात. (समाप्त)नारळासाठी फक्त ७ रुपये प्रजननादरम्यान गिधाड नारळाच्या झाडावर घरटे बांधते. त्याच्या विष्ठेने नारळाचे उत्पन्न घटते. नुकसानग्रस्तास प्रतिनारळास केवळ सात रुपये नुकसानभरपाई दिली जाते. ही रक्कम मिळण्यासाठीही गिधाडांच्या विणीचा हंगाम संपेपर्यंत शेतकऱ्यांनी घरट्यांचे संरक्षण करण्याची जाचक अटही त्यात आहे. नुकसानीची प्रकरणे अन् भरपाईपाच जिल्ह्यांत वर्षनिहाय झालेली नुकसानीची प्रकरणे आणि कंसात मिळालेली भरपाई अशी : २००४-०५ : ९ (२४ लाख), २००५-०६ : ५४४ (२१ लाख ९८ हजार), २००६-०७ : १४०९ (१ कोटी ५८ लाख ७६ हजार), २००७-०८ : १७९९ (१ कोटी ५७ लाख ४४ हजार), २००८-०९ : २४२२ (२ कोटी १८ लाख ९६ हजार), २००९-१० : ३७३ (८ लाख ५७ हजार), २०१०-११ : १२३८ (१ कोटी ३० लाख ८८९), २०११-१२ : ९५८ (७२ लाख १७२), २०१२-१३ : ९९८ (८६ लाख ८३ हजार), २०१३-१४ : ९६ हजार २१ हजार.