शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
6
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
7
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
8
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
9
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
10
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
11
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
12
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
13
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
14
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
15
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
16
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
17
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
18
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
19
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
20
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...

आंबेओहोळ प्रकल्पाचा जलपूजनाचा कार्यक्रम होणार लोकोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:28 IST

रवींद्र येसादे उत्तूर : १६ ऑक्टोबर १९९८ रोजी प्रशासकीय मंजुरी मिळालेला आजरा तालुक्यातील आंबेओहोळ प्रकल्प २२ वर्षांनंतर पूर्णत्वास आला ...

रवींद्र येसादे

उत्तूर : १६ ऑक्टोबर १९९८ रोजी प्रशासकीय मंजुरी मिळालेला आजरा तालुक्यातील आंबेओहोळ प्रकल्प २२ वर्षांनंतर पूर्णत्वास आला आहे. लोकोत्सव ठरणाऱ्या या प्रकल्पाचा जलपूजन आज (गुरुवारी) होत आहे. यानिमित्त आंबेओहोळ प्रकल्पामुळे ३९२५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. सव्वा टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता असणाऱ्या प्रकल्पात सध्या प्रकल्पात ८८ टक्के इतका पाणीसाठा आहे. प्रकल्प तुडुंब भरल्याने उत्तूर परिसरासह गडहिंग्लज तालुक्यातील कडगाव, गिजवणे, शिप्पूर, लिंगनूर या परिसरातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

कृती समितींची मतभिन्नता प्रशासकीय अडचणी, न्यायालयीन दाव्यांचा अडथळा, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनासाठी होणारी आंदोलने, निधीसाठी नसणारी तरतूद अशा अनेक कारणांनी हा प्रकल्प रखडला.

तत्कालीन आमदार बाबासाहेब कुपेकर यांच्या प्रयत्नाने प्रकल्पाला मंजुरी मिळाली. परंतु, त्यांचे निधन आणि मतदारसंघाच्या पुनर्रचनेमुळे प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आली.

बहुतांश प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या सुटल्या, काही अंशी शिल्लक असणारे पुनर्वसन केल्याशिवाय आपण मागे हटणार नाही. त्यांनी दिल्याने गेली दोन वर्षे प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली अन् प्रकल्पाचे काम पूर्णत्वाकडे गेले.

प्रकल्पाचे ३३.८४ चौ. कि. मी. इतके पाणलोट क्षेत्र आहे. ३५.११ द.ल.घ.मी. एकूण पाणीसाठा असणार आहे. उपयुक्त पाणीसाठा ३३.६३ द.ल.घ.मी. असणार आहे. आजरा तालुक्यातील १० तर गडहिंग्लज तालुक्यातील ११ गावांना पाण्याचा लाभ होणार आहे. १९६० मीटर मातीचे धरण व ८० मीटर सांडवा आहे. ०.५० मेगावॅट क्षमतेची विद्युतनिर्मिती होणार आहे. बांधकामावर ८४.८७ कोटी, भू-संपादन व पुनर्वसनासाठी ९९.७३ कोटी असा खर्च झाला आहे.

कोल्हापूर पद्धतीचे ७ बंधारे असून ६ बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. १४१ प्रकल्पग्रस्तांना कडगाव व लिंगनूर येथे भूखंड वाटप होणार आहेत. भू-संपादनासाठी ३४९.५० हेक्टर खासगी जमीन आवश्यक आहे. संबंधित क्षेत्र संपादनासाठी अंतिम निवाड्यानुसार मोबदला वाटप होऊन संपूर्ण ३७९.५० हेक्टर क्षेत्र जलसंपदाच्या ताब्यात आहे. एकूण ८१७ प्रकल्पग्रस्त असून ३५७ प्रकल्पग्रस्तांनी स्वेच्छा पुनर्वसन स्वीकारले आहे. ४६० प्रकल्पग्रस्त पुनर्वसनासाठी पात्र आहेत. पूर्णत: जमीन वाटप झालेले ९३, अंशत: जमीन वाटप झालेले ३०, अंशत: पॅकेज वाटप करून पुनर्वसन झालेले ३६, आर्थिक पॅकेज वाटप करून पूर्णत: पुनर्वसन झालेले प्रकल्पग्रस्त २४६, पूर्णत: पुनर्वसन झालेले प्रकल्पग्रस्त ३७५, अशंत: पुनर्वसन पूर्ण झालेले पुनर्वसन प्रकल्पग्रस्त ३०, पूर्णत: पुनर्वसन न झालेले प्रकल्पग्रस्त ५५, पॅकेज प्रगतीत असणारे १२, पुनर्वसनास प्रतिसाद न दिलेले २८ जण आहेत. या प्रकल्पामुळे उत्तूर २२, आर्दाळ १३६, करपेवाडी १५, होन्याळी ८५, हालेवाडी ९३, महागोंड १९, वडकशिवाले १७ आदी शेतकऱ्यांच्या जमिनी बुडित क्षेत्रात गेल्या आहेत. तर आर्दाळ २५२, करपेवाडी १५३, उत्तूर ५१, हालेवाडी १७२, होन्याळी १६५, महागोंड ३०, वडकशिवाले ४५ इतके प्रकल्पग्रस्त बाधित झाले आहेत.