शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

कायद्याच्या लाभापासून यंत्रमाग कामगार वंचित

By admin | Updated: November 9, 2014 23:29 IST

४५ वर्षांच्या संघर्ष : भविष्य निर्वाह निधी, पेन्शन सुविधा स्वप्नवतच

राजाराम पाटील - इचलकरंजी --साधारणत: ४५ वर्षांच्या संघर्षानंतरही यंत्रमाग कामगारांना कायद्याचे संरक्षण नसल्याने आयुष्य घालवूनही कामगारांना त्यांचे घरकुलसुद्धा बांधता येत नाही, अशी दयनीय अवस्था आहे. त्यामुळे भविष्य निर्वाह निधी, निवृत्तीनंतरची पेन्शन, विम्याची वैद्यकीय सुविधा अशा सुविधा स्वप्नवतच आहेत.राज्यात शेतीखालोखाल वस्त्रोद्योगात रोजगार उपलब्ध होतो. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी यंत्रमागांची केंद्रे आहेत. त्यातील इचलकरंजी येथे सव्वालाख यंत्रमाग आहेत. येथील यंत्रमाग कारखान्यात ४० हजार कामगार कार्यरत आहेत. त्यांना उत्पादनाशी निगडित मजुरी मिळते.सन १९६७-६८ मध्ये राज्यात प्रथमच यंत्रमाग कामगारांशी वेतनाचा कायदा व्हावा, यासाठी इचलकरंजीत आंदोलन झाले. त्यानंतर सातत्याच्या संघर्षाचे फलित म्हणून सन १९८४-८५ मध्ये शासनाने यंत्रमाग कामगारांना प्रतिमहिना ६५२ रुपये किमान वेतन ठरविले. त्यामध्ये किमान वेतन व महागाई भत्ता यांचा समावेश होता. त्यानंतर प्रत्येक सहा महिन्याला महागाई निर्देशांकावर आधारित वेतनवाढ याचाही अंतर्भाव करण्यात आला.त्यावेळी ६५२ रुपये किमान वेतनाविषयी कामगार व यंत्रमागधारकांत मोठा संघर्ष झाला. उत्पादनाशी निगडित ‘पीस रेट’ पद्धतीने वेतन, असा आग्रह यंत्रमागधारकांनी धरला. या लढ्यातून पुढे इचलकरंजीसह राज्यातील अन्य यंत्रमाग केंद्रांमध्ये ‘पीस रेट’ वेतन पद्धती अंंमलात आली. त्यानंतर अनेकवेळा नवीन यंत्रमाग कामगार वेतन कायदा करावा, यासाठी लढे झाले. शासनाने काही समित्याही नेमल्या; पण समित्यांचे अहवाल बासनात गेले. या सर्वांच्या परिणामामुळे यंत्रमाग कामगार मात्र संरक्षण कायद्यापासून वंचित राहिलाय. यंत्रमागधारकांशी तडजोड करून मिळेल त्या वेतनावर काम करावे लागत असल्याने दैनंदिन उपजीविकेपलीकडे त्याला पाहताच येत नाही. अगदी छोटेसे घर बांधण्यासाठी आवश्यक असलेल्या तीन-चार लाख रुपयांची पुंजीसुद्धा त्याच्या आयुष्यभराच्या कमाईनंतर शिल्लक राहत नाही. कायद्याचे संरक्षण नसल्याने निवृत्ती पश्चात पेन्शन, भविष्य निर्वाहासाठी प्रॉव्हिडंट फंड, कुटुंबीयांसाठी वैद्यकीय विमा, अशा मूलभूत गरजांपासून हा कामगार वंचित राहिलाय. (क्रमश:)सुतावरील एक टक्का सेससुद्धा प्रलंबितमाजी कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी दोन वर्षांपूर्वी नवीन समिती नेमली. त्यामध्ये यंत्रमाग केंद्रातील विधानसभा सदस्यांबरोबर काही कामगार नेत्यांचा समावेश होता. या समितीनेसुद्धा यंत्रमाग कामगार कल्याण मंडळ स्थापन करण्याची शिफारस केली. यंत्रमाग उद्योगासाठी लागणाऱ्या सुताच्या विक्रीवर एक टक्का सेस लावून त्यातून निर्माण होणारा निधी मंडळास द्यावा आणि निधीतून विमा, वैद्यकीय सेवा-सुविधा, बोनस, घरकुले, आदी कामगारांना देण्याची शिफारसही समितीने केली; पण अद्यापही या शिफारशी शासनाच्या विचाराधीन आहेत.कल्याणकारी मंडळाची शिफारस बासनातयंत्रमाग कामगारांसाठी माथाडी कामगारांच्या धर्तीवर कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी. प्रत्येक यंत्रमाग केंद्रात स्वतंत्रपणे कार्यरत असणाऱ्या मंडळाकडे कामगारांची नोंद करून प्रत्येक महिन्याला कामगाराच्या वेतनातील काही टक्के रक्कम आणि त्यामध्ये यंत्रमागधारकांच्या हिस्स्याची ठरावीक रक्कम घेऊन हा निधी मंडळाकडे जमा करावा. या रकमेतून विमा, वैद्यकीय सुविधा, दीपावली बोनस, पाल्याच्या उच्च शिक्षणाची सोय, घरकुले बांधावीत, अशी शिफारस सुमारे सात वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार आवाडे व कामगार नेते नरसय्या आडम यांच्या समितीने शासनाकडे केली; पण हा अहवाल व्यवहार्य असूनसुद्धा बासनात पडला.