शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

कॅन्सरवरील उपचारांसाठी कोल्हापूरच भारी

By admin | Updated: February 4, 2015 00:41 IST

रुग्णांना दिलासा : मुंबई, पुण्याकडील धावपळ वाचली; अद्ययावत उपचार पद्धती उपलब्ध

संतोष मिठारी - कोल्हापूर  -चाळीस वर्षांपूर्वी एखाद्याचे ‘कॅन्सर’चे निदान झाले की, त्याला कोल्हापुरातून मिरज अथवा मुंबई, पुण्याला जाण्याचा सल्ला दिला जायचा. याठिकाणी जाण्याचा सल्ला म्हणजे रुग्णाची स्थिती बिकट असल्याचे कुटुंबीय, नातेवाइकांकडून समजण्यात येत होते. मात्र, आता हे चित्र बदलले आहे. मुंबई, पुण्यासह देशातील मोठ्या हॉस्पिटलच्या तुलनेत कॅन्सरवरील उपचारासाठी कोल्हापूर भारी ठरत आहे. रेडिएशन, केमोथेरपीसह बिनटाक्यांची शस्त्रक्रिया, आदी सुविधा उपलब्ध आहेत. गेल्या दहा वर्षांत येथील उपचारपद्धती टप्प्याटप्प्याने बदलली आहे.कोल्हापुरात साधारणत: १९९५ पासून कॅन्सरवर शस्त्रक्रिया करण्याची सुविधा उपलब्ध झाली; पण त्यानंतर त्याच्या पुढे या क्षेत्रात पाऊल पडले नाही. त्यामुळे येथील रुग्णांना मिरज, मुंबई, पुणे, आदी शहरांमध्ये उपचारांसाठी जावे लागत होते. या ठिकाणी उपचार, राहणे, आदींचा खर्च तसेच हॉस्पिटलमधील वेटिंग लिस्ट आणि व्यावसायिक वृत्तीमुळे रुग्णांचा वेळ, पैसा अधिक खर्च व्हायचा. शिवाय उपचारांना विलंब झाल्याने आजार बळावत होता. ते लक्षात घेऊन कोल्हापुरातील काही डॉक्टरांनी कॅन्सरवरील शस्त्रक्रियेसह अन्य उपचार पद्धतीची सुरुवात गेल्या दहा वर्षांपूर्वी केली. सध्या या ठिकाणी आठ कॅन्सर सर्जन असून, एक अद्ययावत कॅन्सर सेंटर कार्यरत आहे. येथे रेडिऐशन, केमोथेरपी, बिनटाक्याची शस्त्रक्रिया, ट्युमरचा अचूक अभ्यास करणारी ओंको पॅथॉलॉजी, मेजर व सुपरामेजर सर्जरीची तसेच अचूक रेडिऐशन करणाऱ्या यंत्रसामग्रीची सुविधा उपलब्ध आहे. त्याद्वारे मुंबई, पुण्यासह देशातील मोठ्या हॉस्पिटलसारखे उपचार मिळत आहेत. यामुळे रुग्णांचा वेळ, पैशांची बचत होऊन त्यांच्यावर वेळेवर उपचार होत आहे. अद्ययावत आणि बदललेली उपचार पद्धती कोल्हापूरसह सांगली, सातारा, हुबळी, आदी परिसरांतील रुग्णांना दिलासा देणारी ठरली आहे.तोंड, अन्ननलिका, स्तन, पचनसंस्था, मूत्राशय अशा सर्व प्रकारच्या कॅन्सरवर कोल्हापुरात उपचार केले जातात. मेजर सर्जरीसाठी साधारणत: ३५ ते ५० हजार, तर सुपरामेजर सर्जरीसाठी एक लाखापर्यंत उपचारांचा खर्च होतो. अन्य शहरांतील तुलनेत हा खर्च ५० टक्क्यांपर्यंत आहे. उपचारांचा खर्च याठिकाणी कमी येत असल्याने कोल्हापूरसह औरंगाबाद, अहमदनगर, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, कोकण, गोवा, कर्नाटकातील हुबळीपर्यंतचे रुग्ण येथे येतात. एकंदरीतच कोल्हापुरात आता कॅन्सरवर अत्याधुनिक उपचार होणे शक्य आहे. ‘पेट सीटी’ ची कमतरता...कॅन्सरचा टप्पा अचूकपणे ओळखता येणारी ‘पेट सीटी होल बॉडी स्कॅन’ आणि रक्ताच्या कॅन्सरच्या स्वतंत्र विभागाची कोल्हापुरात कमतरता आहे. काही डॉक्टर, हॉस्पिटल या सुविधा सुरू करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.कॅन्सरवरील उपचारपद्धतीत कोल्हापूर हे मुंबई, पुण्यासह देशातील विविध हॉस्पिटल्स्च्या बरोबरीने आहे. कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये गेल्यावर्षी राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत चार हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले. कोल्हापूरच्या रुग्णांना कॅन्सरबाबतच्या शस्त्रक्रियेसाठी मुंबई, पुणे आता गाठावे लागत नाही. अन्य शहरांच्या तुलनेत कोल्हापुरात उपचारांचा खर्च कमी आहे. त्यामुळे येथे उपचारांसाठी राज्यातून रुग्ण येत आहेत.- डॉ. सूरज पवार (कॅन्सर सर्जन)