शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
4
संतापलेले भारतीय तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकिस्तानला मदत करणारे इन्कम गमावून बसणार
5
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
6
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
7
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
8
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
9
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
10
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
11
सॅल्यूट! अ‍ॅसिड हल्ल्याने गेली दृष्टी, मानली नाही हार; बारावीत मिळवले ९५%, IAS होण्याचं स्वप्न
12
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
13
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
14
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले
15
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
16
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
17
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
18
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
19
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
20
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...

कोल्हापूर --सेवा शुल्क भरा; अन्यथा परवाना रद्द

By admin | Updated: September 10, 2014 00:39 IST

सदस्यांचा व्यापाऱ्यांना इशारा: गुळाचे सौदे होणारच

कोल्हापूर : विलंब आकारासह सेवा शुल्क भरा; अन्यथा परवाना रद्द करू, अशी इशारा बाजार समितीच्या सदस्यांनी पाच व्यापाऱ्यांना दिली आहे. गुळाच्या नियमन रद्दमुळे निर्माण झालेल्या पेचावर चर्चा करण्यासाठी आज, सोमवारी समितीमध्ये झालेल्या बैठकीकडे या व्यापाऱ्यांनी पाठ फिरविल्याने सदस्य आक्रमक झाले आहेत. गुळाचे सौदे बाजार समितीच्या नियंत्रणाखालीच काढण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. बाजार समितीच्या नियंत्रणाखाली गूळ सौदे पूर्ववत करण्यास सर्वच घटक तयार आहेत. त्याचा मसुदा तयार करून त्यानुसार सौदे काढण्याचा निर्णय समितीने घेतला आहे; पण काही अडते व व्यापारी समितीला वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत आहेत. समितीच्या बरखास्त संचालक मंडळाने सेवाशुल्क वाढविला होता. त्याची अंमलबजावणी प्रशासकांनी केली होती. त्याला विरोध करत पाच व्यापाऱ्यांनी पणन संचालकांकडे तक्रार केली होती. साधारणता १ एप्रिल पासून परवाना नूतनीकरण करावा लागतो; पण वाढीव सेवाशुल्क न भरल्याने या व्यापाऱ्यांचा परवाना नूतनीकरण समितीने थांबविले आहे. वेळेत परवाना नूतनीकरण झाला नसल्याने दिवसाला वीस रुपयेप्रमाणे दंडात्मक कारवाई सुरू झालेली आहे. विलंब शुल्क रद्द करा मगच नूतनीकरण करतो, असा पवित्रा व्यापाऱ्यांनी घेतल्याने अशासकीय मंडळाचे सदस्य आक्रमक झाले आहेत. गुळाच्या व्यवसायावर वर्षाला कोट्यवधी रुपये मिळणाऱ्यांना तीन हजार रुपयांचा विलंब शुल्क भरण्यास अडचण काय? अशी विचारणा करत येथे कोणी फुकटची प्रतिष्ठा पणाला लावून समितीला वेठीस धरत असेल, तर त्यांचा परवानाच रद्द करा, अशी सूचना अशासकीय मंडळाचे सदस्य मधुकर जांभळे यांनी केली. समितीने बैठकीला बोलावून ही अडते येत नसतील, तर विकास संस्थांच्या माध्यमातून सौदे काढू, अशी चर्चाही सदस्यांच्या बैठकीत करण्यात आली. (प्रतिनिधी)बॅँक गॅरंटीला व्यापाऱ्यांचा विरोध नियमन रद्द झाल्याने कायद्याने व्यापाऱ्यांवर समितीचा अंकुश राहणार नाही. तरीही शेतकऱ्यांच्या सोयीसाठी समिती मध्यस्थीची भूमिका बजावत आहे. शेतकऱ्यांच्या पैशासाठी व्यापाऱ्यांकडून एक कोटीची बॅँक गॅरंटी घेण्याचा निर्णय झाला; पण याला व्यापाऱ्यांचा विरोध आहे. समितीची स्थापनाआगामी गूळ हंगामाच्या पार्श्वभूमीवर पाच शेतकरी, तीन अडते व तीन व्यापारी यांची समिती स्थापन केली आहे. सौद्यांसह इतर बाबतीत काही समस्या निर्माण झाल्या तर ती सोडवण्याची जबाबदारी या समितीवर राहणार आहे. शासनाने शेतकऱ्यांना अडत्यांच्या कचाट्यातून बाहेर काढले असले, तरी गूळ उत्पादकांचे अडत्यांशिवाय चालतच नाही. अडते पाहिजेत पण अडते कमी पाहिजेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे; पण शासन नियमाप्रमाणे तीन टक्के अडत घेतली जात असल्याचे अडत्यांचे म्हणणे आहे.