शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

कळंबा तलावाचे पाणी १५ फुटांवर

By admin | Updated: May 8, 2015 00:19 IST

उपनगरातील पाणीप्रश्न गंभीर : नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले

अमर पाटील -कळंबा कळंबा व उपनगरांच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत असणाऱ्या कळंबा तलावातील पाण्याची पातळी ऐन उन्हाळ्यात अवघी पंधरा फुटांवर आली आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तलावाचा वापर मोठ्या प्रमाणावर अंघोळ, जनावरे व कपडे धुण्यासाठी होतो.कळंबा तलावाचे एकूण क्षेत्र ६३.९३ हेक्टर व पाणी साठवण क्षमता ७.३५ दशलक्ष घनफूट आहे. गेल्या पाच वर्षांत पावसाचे प्रमाण कमी झाल्याने व तलावातील गाळ न काढल्याने पाणीसाठा कमी होतो. या तलावातून कळंबा, पाचगाव, मोरेवाडी, जरगनगर व अन्य उपनगरांस पाणीपुरवठा केला जातो. कात्यायनी टेकड्यांतून वाहणारे पाणी हा तलावाचा मुख्य जलस्रोत आहे; पण बेसुमार वृक्षतोडीने तो कमी झाला आहे. तलावातील पाणीपातळी कमी झाल्याने रोज एक तास येणारे पाणी पंधरा मिनिटे सोडण्यात येत आहे. पाणी समस्येचे गंभीर स्वरूप नागरिकांनी लक्षात घेऊन घरोघरी मोठ्या पाण्याच्या टाक्या बसविल्या आहेत; पण तलावातून येणारे पाणी पिण्यास योग्य नाही. त्याचा उग्र वास येत असून, ते हिरवट असल्याची तक्रार सर्वच नागरिक करीत आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना बोअरवेल, विहिरींचा आधार घ्यावा लागत आहे.दोन वर्षांपूर्वी पालिका व पाटबंधारे विभागाने गाळ उपसा केल्यामुळे पाणीसाठा वाढला होता. त्यामुळे टंचाई नव्हती; पण यंदा पुन्हा 'येरे माझ्या मागल्या' अशी अवस्था झाल्यामुळे कळंबावासीयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.४तलाव पूर्ण आटला असून, ज्याला ‘डेड वॉटर’ (मृत पाणी) म्हणता येईल, असेच पाणी आता शिल्लक राहिले आहे.४राजर्षी शाहू महाराज हे दूरदृष्टीचे राजे होते. तलाव जरी पूर्ण क्षमतेने आटला तरी जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी तलावात मजबूत विहिरी खोदल्या होत्या. सध्या त्या उघड्या पडल्या आहेत. प्रदूषणाने त्यातील पाणीही वापरण्यासाठी योग्य राहिलेले नाही.४तलावाचे सुशोभीकरण करण्याची पालिकेची भीमगर्जना आता हवेत विरली असून, सुशोभीकरणाचा निधी सात कोटी ७५ लाख वर्षापूर्वी पालिका खात्यावर जमा; पण कार्यवाही मात्र शून्य.४तलाव जरी जीवन प्राधिकरणाने पालिकेकडे हस्तांतरित केला असला, तरी तलावाच्या पाण्याचा वापर कळंबा ग्रामपंचायतच जास्त करते. त्यामुळे तलाव प्रदूषणमुक्त ठेवण्याची जबाबदारी पालिकेइतकी ग्रामपंचायतीची आहे; पण नोटीसबोर्ड लावण्यापलीकडे ठोस कार्यवाही ग्रामपंचायतीने केलेली नाही.