शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
13
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
14
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
15
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
16
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
17
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
18
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
19
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
20
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

जत तालुक्यात द्राक्ष छाटण्या रखडल्या

By admin | Updated: November 11, 2016 00:05 IST

उत्पादन घटणार : पावसाने पाठ फिरविल्याने पाणीप्रश्न गंभीर; शेतकरी कर्जबाजारी

गजानन पाटील -- संख -कायम दुष्काळी जत तालुक्यामध्ये परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विहिरी, कूपनलिका, तलाव कोरडे पडले आहेत. पूर्व भागातील आॅक्टोबर महिन्यातील ५० टक्के छाटणीची कामे पाण्याअभावी खोळंबली आहेत. यावर्षी द्राक्ष छाटणीच होणार नसल्याने द्राक्ष उत्पादनात घट होणार आहे. उत्पादनच होणार नसल्याने द्राक्ष बागायतदार आर्थिक अडचणीत सापडला आहे. द्राक्षबागांवर काढलेल्या कर्जाची परतफेड कशी होणार?, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.तालुक्यामध्ये ५ हजार ६६० हेक्टर क्षेत्रावर द्राक्षबागा आहेत. प्रतिकूल परिस्थितीत, तंत्रज्ञानाचा वापर करीत उजाड माळरानावर बागा उभ्या केल्या आहेत. पाण्याचा काटकसरीने वापर करीत बागा फुलविल्या आहेत. ठिबक सिंचन, मडकी सिंचनाच्या साहाय्याने बागा जोपासल्या आहेत. कृषी विभागाच्या अनुदानावर व स्वत: शेततळी बांधली आहेत. पाण्याचा नियोजनबध्द वापर करून दर्जेदार द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. शरद, सोनाक्का, माणिक चमन, सुपर सोनाक्का, थॉमसन आदी द्राक्षजातीच्या बागा आहेत. विहिरीतील काळ्या दगडातील गोड पाणी असल्याने दर्जेदार सुट्या बेदाण्याची निर्मिती केली जात आहे. उमदी, तिकोंडी, बिळूर, डफळापूर, रामपूर, तिकोंडी, भिवर्गी, सिध्दनाथ, अंकलगी, जालिहाळ खुर्द, दरीकोणूर, जालिहाळ बुद्रुक, कोंत्यावबोबलाद आदी परिसरात द्राक्षबागांचे क्षेत्र अधिक आहे.परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने यावर्षी होणारी छाटणी झाली नाही. पाण्याची पातळी ७०० ते ८०० फुटापर्यंत खाली गेली आहे. कूपनलिका खोदली तरीसुध्दा पाणी लागत नाही. त्यामुळे बागा पुढे जगवायच्या कशा? हा प्रश्न आ वासून उभा आहे. यावर्षी तालुक्यामध्ये ५० टक्के बागांचीच आॅक्टोबर छाटणी झालेली आहे. जानेवारी महिन्यापासून बागांना पाणी मिळणे मुश्कील होणार असल्याने द्राक्षबागा वाळणार आहेत. बागा काढून टाकल्याशिवाय कोणताच पर्याय राहणार नाही. शेतकऱ्यांनी बागांवर काढलेल्या सोसायटी, बँकेच्या कर्जाची परतफेड कशी होणार? हा प्रश्न आ वासून उभा राहिला आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार असून द्राक्ष बागायतदार चिंताग्रस्त बनले आहेत.बेदाणा : मार्केटिंगकडे कल पाण्याअभावी द्राक्षबागांची छाटणी झाली नसल्याने व गेल्या दोन वर्षापासून बेदाण्याला दर मिळत नसल्यामुळे यावर्षी शेतकरी बेदाणा तयार करण्याच्या मानसिकतेत दिसत नाही. मार्केटिंग करण्याकडे त्याचा कल आहे. परिणामी बेदाणा निर्मितीमुळे मजुरांना काम मिळत होते, ते कमी होणार आहे. खरड छाटणीच झाली नाहीगेल्या दोन वर्षापासून पूर्व भागातील माडग्याळ, सोन्याळ, उटगी, उमदी, संख परिसरात पाऊस कमी झालेला आहे. या भागात पाण्याची तीव्र टंचाई आहे. त्यामुळे या भागातील ३० टक्के द्राक्षबागांची पाण्याअभावी उन्हाळ्यात खरड छाटणीच झालेली नाही.