शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

‘अन्न साक्षर’साठी पुढाकार

By admin | Updated: November 16, 2014 23:51 IST

जिल्हा सक्रिय : अन्न साक्षरता अभियान योजनेला प्रारंभ

भारत शास्त्री - बाहुबली -देशातील प्रत्येक नागरिकाला भेसळविरहित व सुरक्षित अन्न मिळविण्याचा हक्क आहे. त्यानुसार कायद्यातील तरतुदीनुसार ग्राहकांचे आरोग्य आणि हित जपण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने कंबर कसली आहे. प्रशासनाने राज्यातील सहाही विभागांमध्ये ‘अन्न साक्षरता’ या महाअभियानाची योजना आखली असून, त्याची कार्यवाही सुरू करण्यात येत आहे.‘अन्न साक्षरता’ अभियानामध्ये शाळा-महाविद्यालयांतील मुले, गृहिणी, ग्राहक, शासकीय योजनेतील अन्न संबंधित यंत्रणा राबविणारे अधिकारी, रस्त्यावरील अन्न विक्रेते व हॉटेल व्यावसायिकांचा समावेश आहे. शासकीय योजनेतील व्यावसायिक जसे बचत गट, शालेय पोषण आहार, मिड डे मिल, आश्रम शाळा, शासकीय वसतिगृह याचा प्रामुख्याने समावेश आहे.याशिवाय प्रामुख्याने रस्त्यावरील अन्न विक्रेते, दुग्ध व दुग्ध व्यावसायिकांना प्रशिक्षण, ग्राहकांसाठी ग्राहक जागर, विद्यार्थ्यांसाठी अन्न सुरक्षा, विद्यार्थी साक्षरता अभियान व गृहिणींसाठी स्वच्छ व आरोग्यदायी स्वयंपाकघर अभियान राबविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.या अभियानासाठी प्रत्येक जिल्ह्यातील नामांकित शाळा, ग्राहक मंच, तालुक्याची ठिकाणे निवडून ठिकठिकाणी व्याख्यान, प्रबोधन व प्रात्यक्षिकांद्वारे नागरिकांना व व्यावसायिकांना अन्न साक्षर करण्यात येणार आहे.प्रत्येकवेळी कारवाईची भीती न दाखविता अन्न व्यावसायिकांना अन्न साक्षर करण्याची ही संकल्पना व्यावसायिकांसह ग्राहकांनाही दिलासा देणारी आहे. स्वच्छ आणि सुरक्षित अन्न ग्राहकांचा अधिकार आहे. याचा थेट संबंध आरोग्याशी आहे. त्यामुळे गृहिणींपासून लहान-मोठ्या व्यावसायिकांना स्वच्छतेचे महत्त्व सांगितले जाईल व प्रबोधनातून नागरिकांना ‘अन्न साक्षर’ केले जाईल.- एस. एम. देशमुख, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन, कोल्हापूरवैशिष्ट्ये :- तीन टप्प्यांमध्ये योजना शाळकरी मुले, गृहिणी, अन्न व्यावसायिकांचा समावेशव्याख्यान, प्रबोधन, प्रात्यक्षिकांचे आयोजन