शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

‘अन्न साक्षर’साठी पुढाकार

By admin | Updated: November 16, 2014 23:51 IST

जिल्हा सक्रिय : अन्न साक्षरता अभियान योजनेला प्रारंभ

भारत शास्त्री - बाहुबली -देशातील प्रत्येक नागरिकाला भेसळविरहित व सुरक्षित अन्न मिळविण्याचा हक्क आहे. त्यानुसार कायद्यातील तरतुदीनुसार ग्राहकांचे आरोग्य आणि हित जपण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने कंबर कसली आहे. प्रशासनाने राज्यातील सहाही विभागांमध्ये ‘अन्न साक्षरता’ या महाअभियानाची योजना आखली असून, त्याची कार्यवाही सुरू करण्यात येत आहे.‘अन्न साक्षरता’ अभियानामध्ये शाळा-महाविद्यालयांतील मुले, गृहिणी, ग्राहक, शासकीय योजनेतील अन्न संबंधित यंत्रणा राबविणारे अधिकारी, रस्त्यावरील अन्न विक्रेते व हॉटेल व्यावसायिकांचा समावेश आहे. शासकीय योजनेतील व्यावसायिक जसे बचत गट, शालेय पोषण आहार, मिड डे मिल, आश्रम शाळा, शासकीय वसतिगृह याचा प्रामुख्याने समावेश आहे.याशिवाय प्रामुख्याने रस्त्यावरील अन्न विक्रेते, दुग्ध व दुग्ध व्यावसायिकांना प्रशिक्षण, ग्राहकांसाठी ग्राहक जागर, विद्यार्थ्यांसाठी अन्न सुरक्षा, विद्यार्थी साक्षरता अभियान व गृहिणींसाठी स्वच्छ व आरोग्यदायी स्वयंपाकघर अभियान राबविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.या अभियानासाठी प्रत्येक जिल्ह्यातील नामांकित शाळा, ग्राहक मंच, तालुक्याची ठिकाणे निवडून ठिकठिकाणी व्याख्यान, प्रबोधन व प्रात्यक्षिकांद्वारे नागरिकांना व व्यावसायिकांना अन्न साक्षर करण्यात येणार आहे.प्रत्येकवेळी कारवाईची भीती न दाखविता अन्न व्यावसायिकांना अन्न साक्षर करण्याची ही संकल्पना व्यावसायिकांसह ग्राहकांनाही दिलासा देणारी आहे. स्वच्छ आणि सुरक्षित अन्न ग्राहकांचा अधिकार आहे. याचा थेट संबंध आरोग्याशी आहे. त्यामुळे गृहिणींपासून लहान-मोठ्या व्यावसायिकांना स्वच्छतेचे महत्त्व सांगितले जाईल व प्रबोधनातून नागरिकांना ‘अन्न साक्षर’ केले जाईल.- एस. एम. देशमुख, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन, कोल्हापूरवैशिष्ट्ये :- तीन टप्प्यांमध्ये योजना शाळकरी मुले, गृहिणी, अन्न व्यावसायिकांचा समावेशव्याख्यान, प्रबोधन, प्रात्यक्षिकांचे आयोजन