शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

‘अन्न साक्षर’साठी पुढाकार

By admin | Updated: November 16, 2014 23:51 IST

जिल्हा सक्रिय : अन्न साक्षरता अभियान योजनेला प्रारंभ

भारत शास्त्री - बाहुबली -देशातील प्रत्येक नागरिकाला भेसळविरहित व सुरक्षित अन्न मिळविण्याचा हक्क आहे. त्यानुसार कायद्यातील तरतुदीनुसार ग्राहकांचे आरोग्य आणि हित जपण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने कंबर कसली आहे. प्रशासनाने राज्यातील सहाही विभागांमध्ये ‘अन्न साक्षरता’ या महाअभियानाची योजना आखली असून, त्याची कार्यवाही सुरू करण्यात येत आहे.‘अन्न साक्षरता’ अभियानामध्ये शाळा-महाविद्यालयांतील मुले, गृहिणी, ग्राहक, शासकीय योजनेतील अन्न संबंधित यंत्रणा राबविणारे अधिकारी, रस्त्यावरील अन्न विक्रेते व हॉटेल व्यावसायिकांचा समावेश आहे. शासकीय योजनेतील व्यावसायिक जसे बचत गट, शालेय पोषण आहार, मिड डे मिल, आश्रम शाळा, शासकीय वसतिगृह याचा प्रामुख्याने समावेश आहे.याशिवाय प्रामुख्याने रस्त्यावरील अन्न विक्रेते, दुग्ध व दुग्ध व्यावसायिकांना प्रशिक्षण, ग्राहकांसाठी ग्राहक जागर, विद्यार्थ्यांसाठी अन्न सुरक्षा, विद्यार्थी साक्षरता अभियान व गृहिणींसाठी स्वच्छ व आरोग्यदायी स्वयंपाकघर अभियान राबविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.या अभियानासाठी प्रत्येक जिल्ह्यातील नामांकित शाळा, ग्राहक मंच, तालुक्याची ठिकाणे निवडून ठिकठिकाणी व्याख्यान, प्रबोधन व प्रात्यक्षिकांद्वारे नागरिकांना व व्यावसायिकांना अन्न साक्षर करण्यात येणार आहे.प्रत्येकवेळी कारवाईची भीती न दाखविता अन्न व्यावसायिकांना अन्न साक्षर करण्याची ही संकल्पना व्यावसायिकांसह ग्राहकांनाही दिलासा देणारी आहे. स्वच्छ आणि सुरक्षित अन्न ग्राहकांचा अधिकार आहे. याचा थेट संबंध आरोग्याशी आहे. त्यामुळे गृहिणींपासून लहान-मोठ्या व्यावसायिकांना स्वच्छतेचे महत्त्व सांगितले जाईल व प्रबोधनातून नागरिकांना ‘अन्न साक्षर’ केले जाईल.- एस. एम. देशमुख, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन, कोल्हापूरवैशिष्ट्ये :- तीन टप्प्यांमध्ये योजना शाळकरी मुले, गृहिणी, अन्न व्यावसायिकांचा समावेशव्याख्यान, प्रबोधन, प्रात्यक्षिकांचे आयोजन