शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
4
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
5
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
6
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
7
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
8
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
9
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
10
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
11
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
12
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
13
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
14
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
15
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
16
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
17
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
18
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
19
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय खेडी देशाचा आत्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 00:04 IST

भारत पाटील भारतीय खेडी हा देशाचा आत्मा आहे आणि म्हणूनच ग्रामीण जीवनामध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी खेडी स्वयंपूर्ण व्हावीत यासाठी ...

भारत पाटीलभारतीय खेडी हा देशाचा आत्मा आहे आणि म्हणूनच ग्रामीण जीवनामध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी खेडी स्वयंपूर्ण व्हावीत यासाठी ग्रामीण जीवनाची पुनर्निर्मिती झाली पाहिजे. याबद्दल महात्मा गांधीजी खूप आग्रही होते. आपला भारत देश भविष्यात मोजक्या शहरांत सापडणार नाही तर तो खेड्यांतही सापडेल. म्हणून खेडी जोपर्यंत विकसित होणार नाहीत; तोपर्यंत देश बदलणार नाही. अलीकडे वाढते शहरीकरण आणि कमी होणारा ग्रामीण भाग हा सर्वांच्या चिंतेचा विषय बनला आहे. शासन व ग्रामीण लोकप्रतिनिधी यांचा हा नैतिक पराभव मानावा लागेल. शहरांची प्रमाणापेक्षा झालेली वाढ ही सूजच म्हणावी लागेल. शहरी विकास, जीवनशैली व शहरांचे आकर्षण हे ग्रामीण लोकांना सतत राहिले आहे. शिक्षण, व्यवसाय व रोजगाराच्या निमित्ताने खेड्यातील माणूस शहरांकडे स्थलांतर करीत आहे आणि यामुळे आपली खेडी ओस पडत चालली आहेत व शहरांची सूज मात्र बेसुमार वाढत आहे. आणि यामुळं दोन्ही ठिकाणी खूप गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. भारताच्या सर्वांगीण विकासामध्ये ग्रामीण विकास ही तातडीची व अत्यावश्यक गरज बनली आहे. आर्थिक वाढ हा जरी विकासातील महत्त्वाचा घटक असला तरी फक्त आर्थिक विकास झाला म्हणजे सर्वांगीण विकास झाला हे म्हणणे आता चुकीचे ठरले आहे आणि म्हणून ‘विकास ही एक विविधांगी सतत चालणारी प्रक्रिया आहे’ असं मानून सर्व अंगांचा विचार करून नियोजनपूर्वक कृती आराखडा तयार केला पाहिजे. यामध्ये आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक व मानवी मूल्यमापनाच्या बाबतीत गुणवत्तापूर्ण बदल होतील, असे प्रभावी कार्यक्रम असावेत. भारतात पंजाब व केरळ या दोन राज्यांची सर्वांगीण विकासाची तुलना करायची झाली, तर पंजाब हे दरडोई उत्पन्नामध्ये केरळच्या पुढे प्रगतीवर आहे. परंतु साक्षरता, बाल मृत्यू दर, महिला शिक्षण व सक्षमीकरण, आरोग्य बालविकास, स्वच्छता यामध्ये केरळ पंजाबच्या खूप पुढे आहे. म्हणूनच भारतीय खेड्यांत आर्थिक वाढीबरोबरच सर्वांगीण व अंगभूत विकासाला महत्त्व दिले पाहिजे. आपल्या सर्व खेड्यांचा कृतिशील विकास आराखडा (ॠढऊढ) करायची वेळ आली आहे. कोणतेही राष्ट्र असो वा व्यक्ती त्याला स्वाभिमान, आत्मसन्मान व प्रतिष्ठा असतेच. याला समानता व स्वातंत्र्य यांची जोड असणंही खूप महत्त्वाचे आहे. आमचं गाव आम्हीच सरकार...आपला देश समृद्ध व सुंदर देश...ही भावना ग्रामीण भागातील प्रत्येकाच्या अंगी यायलाच हवी. यासाठी ग्रामीण भागातील सर्व लोकप्रतिनिधी व कर्मचारी यांची उंस्रंू्र३८ ु४्र’्िरल्लॅ अतिशय महत्त्वाची आहे. यासाठी नवीन अद्ययावत प्रशिक्षण त्यांना देणे ही काळाची गरज आहे. आपले अधिकार, कर्तव्य व जबाबदारी हे समजले तरंच कार्यात सुलभता येऊ शकते. गावाचा कारभार चालवताना अधिनियम, पारदर्शकता, अद्ययावत सुविधा, नेतृत्व गुण, आदर्श गाव संकल्पना, गाव कृती आराखडा, लोकसहभाग या बाबींसाठी प्रभावी प्रशिक्षण असायलाच पाहिजे. याशिवाय स्मार्ट व्हिलेज, मॉडेल गाव, आदर्श गाव हे घडू शकत नाही. म्हणून भविष्यातील आपला गाव उभा करत असताना गावातील सर्व घटकांना प्रबोधन व प्रशिक्षण देऊन ग्रामदूतांची फौज उभी करावी लागेल. त्यांनी जसं आर्मीमधील जवान सीमेवर देशाचे रक्षण करताना अहोरात्र डोळ्यात तेल घालून उभा असतो तसं आपणही आपली गावं विकसित करण्यासाठी ती प्रेरणा.. ती ऊर्जा व तो निर्धार अंगी घेऊन कार्य करण्याची वेळ आली आहे. शहरांतील सोयी-सुविधा व संधी जर खेड्यांत उपलब्ध झाल्या; तर ग्रामीण भागाकडून शहरांकडे जाणारे लोंढे आपोआप थोपवले जातील. शैक्षणिक पात्रता, रोजगार र‘्र’’ ीि५’ङ्मस्रेील्ल३ या बाबी आता गाव कृती आराखड्यात अंतर्भूत केल्या पाहिजेत. व्यापक दृष्टिकोन यावा यासाठी गावचे कारभारी आता सक्षम झालेच पाहिजेत. ‘जे जे गावी शहाणे झाले ! शक्ती युक्तीनी पुढे निघाले ’’(लेखक ग्रामविकास व व्यसनमुक्ती चळवळीतील बिनीचे कार्यकर्ते आहेत)