शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजी पोलीस दलाची नामुष्की

By admin | Updated: March 31, 2015 00:28 IST

चोऱ्या, घरफोड्यांसह दरोडेही : गस्ती पथकासह गुन्हे शोध पथक निष्क्रिय, अनेक प्रकरणांचा तपास रखडला

अतुल आंबी- इचलकरंजी - येथील दिवसाढवळ्या होणाऱ्या चोऱ्या, रात्रीच्या घरफोड्या यांसह दोन दिवसांपूर्वी भरचौकात पडलेला साडेचार कोटींचा दरोडा यामुळे इचलकरंजीतील पोलीस दलांची चांगलीच नामुष्की झाली आहे. शहरात कार्यरत असलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी नेमके करतात तरी काय? असा सवाल या निमित्ताने नागरिक उपस्थित करीत आहेत.पोलीस अधिकाऱ्यांची इचलकरंजीला नियुक्ती म्हणजे ‘चांगले’ पोलीस स्टेशन अशी ओळख जिल्हा पोलीस दलात होती. कारण शहरातील वस्त्रोद्योगाची आर्थिक उलाढाल मोठी असल्याने पोलिसांची पाचही बोटे तुपात, अशी परिस्थिती होती. येथील वस्त्रोद्योग व्यवसायामुळे देशातील अनेक राज्यांतून लोक येऊन राहिले आहेत. त्यामध्ये कामगारवर्ग मोठ्या प्रमाणात आहे. औद्योगिकीकरणामुळे येथील प्रगती झाली असली तरी त्याबरोबर अवैध व्यवसायही वाढत गेले. शहरात खंडणी, खून, मारामाऱ्या यासह मटका, जुगार, गावठी दारू यासारखे अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात पसरले होते. इचलकरंजी शहरात अतिरिक्त पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस उपअधीक्षक कार्यालय यासह दोन पोलीस स्टेशन, एक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक असे सुमारे २५० पोलीस कार्यरत असतानाही तत्कालीन पोलिसांना या अवैध व्यवसायाला पसरण्यापासून थांबवणे अथवा त्यावर जरब बसविणे म्हणावे तसे कोणाला जमले नाही. दीड वर्षांपूर्वी एस. चैतन्य हे आयपीएस अधिकारी याठिकाणी सहायक पोलीस अधीक्षक म्हणून रूजू झाले. योगायोगाने त्यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालयाचा पदभार रिक्त होता. त्यामुळे पोलीस उपअधीक्षक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील संपूर्ण जबाबदारी चैतन्य यांनी घेतली. कोणाचाही हस्तक्षेप होत नसल्याने कारवाईचा धडाका लावत कोणतीही तडजोड न करता येथील अवैध व्यवसाय ९० टक्के गुंडाळला. शहराच्या इतिहासातील हा पहिलाच यशस्वी प्रयत्न होता. येथील कामगारवर्गामुळे ९० टक्केसुद्धा अवैध व्यवसाय बंद करणे सहजासहजी शक्य नव्हते. मात्र, आयपीएस अधिकारी असल्याने गुंडांसह त्यांना पाठबळ देणाऱ्या व्हाईट कॉलर लोकांवरही त्यांची जरब बसली आणि बघता-बघता मटका, जुगार, गावठी दारू यासह खंडणीसारखे प्रकार कमी झाले. (पूर्वार्ध)अनेक मोठ्या प्रकरणांचा तपास नाहीशहरातील कित्येक मोठे गुन्हे उघडकीस आले नाहीत. कृष्णकुंज बंगल्यावर पडलेला दरोडा, वाटमारी करून कोयत्याचा धाक दाखवून लुटून नेलेले लाखो रुपये यासह कित्येक सर्वसामान्यांच्या घरात झालेल्या घरफोड्या, दिवसाढवळ्या महिलांच्या गळ्यातून धूम स्टाईलने चोरलेले दागिने अशा अनेक प्रकरणांचा तपास रखडला आहे. अच्छे दिन कधी येणार?भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर नागरिकांच्या आशाही वाढल्या आहेत. सर्वच सरकारी क्षेत्रात बदल होतील, असे वाटत आहे. याचा परिणाम पोलीस दलावर कधी होणार?, पोलिसांच्या यंत्रणेत सुधारणा होऊन अच्छे दिन कधी येणार?, असे प्रश्न सामान्य नागरिकांतून उपस्थित होत आहेत.