शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
7
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
8
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
9
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
10
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
11
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
12
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
13
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
14
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
15
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
16
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
17
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
18
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
19
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
20
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?

आरोग्य योजना अडकली खाबुगिरीत : रुग्णांची होत आहे राजरोस लूट; मूळ हेतूलाच हरताळ

By admin | Updated: August 25, 2014 00:20 IST

‘प्राथमिक कागदपत्रे न पाहताच हे योजनेत बसत नाही’ असे सांगत ‘हबकी’ डाव टाकून पैसे उकळण्यासाठी पहिला फासा टाकला जातो आणि येथूनच एजंटगिरीचा श्रीगणेश होतो.

संतोष पाटील - कोल्हापूर -‘साहेब... राजीव गांधी योजनेतनं आॅपरेशन करायचं हाय, व्हईल न्हवं?’ अशी मोठ्या आशेने व करुण स्वरात दररोज शेकडो रुग्ण व त्यांचे नातेवाईक आर्त विनविण्या करीत जीवनदायी योजनेच्या ‘आरोग्य मित्रा’कडे उपचाराचे साकडे घालतात. विनवणी करणारा याचक अन् आपण दाता असल्याच्या भूमिकेतून रुग्णांना माहिती दिली जाते. ‘प्राथमिक कागदपत्रे न पाहताच हे योजनेत बसत नाही’ असे सांगत ‘हबकी’ डाव टाकून पैसे उकळण्यासाठी पहिला फासा टाकला जातो आणि येथूनच एजंटगिरीचा श्रीगणेश होतो. आरोग्यपूर्ण जीवनाची हमी देणाऱ्या योजनेचा मुळापासूनच पुनर्आढावा घेण्यासारखीच सद्य:स्थिती आहे. एकूण लोकसंख्येच्या ९० टक्के जनतेच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेकडे काही रुग्णालये वरकमाईचे साधन म्हणून पाहू लागली आहेत. योजनेत दीड लाखापर्यंतच्या ९७२ प्रकारच्या शस्त्रक्रिया सर्व सरकारी व खासगी रुग्णालयांत मोफत केल्या जातात. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असणाऱ्या या योजनेला खाबुगिरीने पोखरल्याची सद्य:स्थिती आहे. (क्रमश:)एक लाखापेक्षा कमी एकत्रित वार्षिक उत्पन्न असणारी कुटुंबे, तसेच पांढरे शिधापत्रिकाधारक वगळता सर्व शिधापत्रिकाधारक कुटुंबे या योजनेसाठी पात्र आहेत. लाभार्थी कुटुंबांना विशेष ओळखपत्र देऊन लाभार्थी ठरविण्यात येते. या योजनेत जिल्ह्यातील २६ लाखांहून अधिक नागरिक पात्र आहेत. मात्र, योजनेची मूळ माहिती व गांभीर्य नसल्यानेच ही योजना केवळ कागद रंगवून पैसे खाण्याचे कुरण बनली आहे.या योजनेत सर्व शासकीय, खासगी तसेच धर्मादाय संस्था रुग्णालयांचा सहभाग आहे. जिल्ह्यातील २८ मोजकी रुग्णालये या योजनेत सहभागी आहेत. तसेच लाभार्थ्याला त्याच्या मर्जीनुसार नोंदविलेल्या कोणत्याही रुग्णालयात उपचार घेण्याची मुभा आहे. हर्निया, डायलेसिस, कर्करोग, मेंदूचे विकार, मूतखडा, बायपास, हृदय शस्त्रक्रिया, हाडांचे प्रत्यारोपण, अपघातातील दुखापत, आतड्यांचे विकार आदी ९७२ आजार व त्याच प्रकारांच्या शस्त्रक्रिया तसेच १२१ पाठपुरावा सेवांचा लाभ घेता येतो.या योजनेतील लाभार्थ्यांचा ३६८ रुपयांचा विम्याचा हप्ता शासनातर्फे भरला जातो. लाभार्र्थ्यांंना प्रतिवर्षी दीड लाखापर्यंतचे विमा संरक्षण तसेच मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी २ लाख ५० हजारांपर्यंत मर्यादा आहे. कुटुंबातील व्यक्तीसाठी एका वर्षासाठी या योजनेचा लाभ घेता येतो.