शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

गुरुजी करणार अध्यक्षाला सलाम

By admin | Updated: November 9, 2014 01:06 IST

मुख्यालयात राहण्याच्या आदेशाची कार्यवाही

 कोल्हापूर : प्राथमिक शिक्षकांना मुख्यालयात राहण्याच्या आदेशाची कार्यवाही तालुका पातळीवर सुरू झाली आहे. यामुळे मुख्यालयात न राहणाऱ्या शिक्षकांमध्ये खळबळ माजली आहे. शिक्षक खरोखरच मुख्यालयात राहतात की नाहीत, याची माहिती विहित नमुन्यात संकलित केली जात आहे. मुख्यालयात राहत असलेल्या विहित नमुन्यातील तपासणी अहवालावर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किंवा सचिव यांची सही घ्यावी लागणार आहे. त्यामुळे गुरुजींना आता सहीसाठी अध्यक्ष किंवा सचिव यांना सलाम ठोकावा लागणार आहे. मुख्यालयात राहत असलेल्या तपासणी अहवालातील माहितीमध्ये तफावत आढळल्यास संबंधित गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांना शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे कागदोपत्री मुख्यालयी राहणाऱ्या शिक्षकांना मुख्यालयाच्या ठिकाणी घर शोधून राहावे लागणार आहे. जिल्ह्णातील सर्वच शिक्षक मुख्यालयात राहतात, या माहितीची फेरतपासणी केली जात आहे. शिक्षकाचे नाव, कार्यरत असलेल्या शाळेचे नाव, शिक्षकाचे सध्याचे राहण्याचे ठिकाण, घरमालकाचे नाव, घर नंबरसह पूर्ण पत्ता, शिक्षक घरी नेहमी वास्तव्यास असल्याबाबत घरमालकाची स्वाक्षरी, शिक्षकांचे मूळ गाव, तपासणीअंती मुख्यालयात राहतात अगर कसे, नसल्यास मुख्यालयात न राहण्याची कारणे, मुख्यालयाच्या ठिकाणी राहत असलेल्या घरासमोर थांबून संबंधित शिक्षकांनी काढून घेतलेला फोटो, भाड्याने राहत असल्यास घरमालकाचा करारनामा किंवा संमतीपत्र अशी माहिती शिक्षकांना द्यावी लागणार आहे. ही माहिती खरी आणि वस्तुस्थितिजन्य असल्याची खात्री करण्याची जबाबदारी गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांच्यावर आहे. मुख्यालयात राहत असल्याबद्दल खोटी माहिती दिलेल्यांचा शोध घेण्यासाठी या नमुन्यात माहिती घेतली जात आहे. मुख्यालयात राहत असल्याचे कागदोपत्री दाखवून घरभाडे घ्यायचे आणि प्रत्यक्षात आपल्याला हव्या त्या ठिकाणी राहायचे, असे सध्याचे वास्तव आहे. केवळ शिक्षकच नव्हे, तर सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांची मुख्यालयात राहण्याची मानसिकता नाही.