शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

गुरुजी तुमच्यावर भरोसा नाय काय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 23:26 IST

जि. प. शाळा अडचणीत : शिक्षकांची मुले खासगी शाळेत

विक्रम पाटील ।  लोकमत न्यूज नेटवर्ककरंजफेण : इंग्रजी माध्यमांचे वाढते आकर्षण, शासनाची दुर्लक्षपणाची भूमिका आणि खासगी शाळांची वाढलेली संख्या यांमुळे सरकारी शाळांना आपले अस्तित्व टिकविण्यासाठीची धडपड करावी लागत असल्याचे चित्र दिसत आहे. असे असले तरी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची मुले खासगी शाळांमध्ये शिक्षण घेत असल्याचे चित्र आहे.खेडोपाडी इंग्रजी माध्यमांच्या शाळांना पेव फुटल्यामुळे बहुतांश पालकांना आपल्या पाल्याला जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळेत घालणे कमीपणाचे व नुकसानकारक वाटत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे सरकारी शाळेत आता शेतकरी, मजूर, हमाल, तसेच सर्वसामान्य कुटुंबातील मुले जास्त प्रमाणात दिसत आहेत. एकीकडे मराठी शाळा टिकल्या पाहिजेत म्हणून आपण ढोल बडवत असलो तरी मराठी शाळेतील कमतरता शोधण्याची गरज भासू लागली आहे. जिल्ह्यातील अनेक सरकारी शाळांनी आपला दर्जा राखला आहे. बहुतेक शाळेत ई-लर्निंग सुविधा पुरविली आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा, यासाठी अनेक शाळांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. तर आजही अनेक शिक्षक शाळा सुटल्यानंतर जादा तास घेण्यापासून बाहेर शाळेला गेलेल्या विद्यार्थ्यांची आपल्या शाळेत येण्यासाठी मनधरणी करीत आहेत.काही कष्टाळू शिक्षकांच्या प्रयत्नामुळे शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून यावर्षी सरकारी शाळेच्या दर्जाची चुणूक दाखविली असली तरी जिल्हा प्रशासनाने शिक्षकांची मुले सरकारी शाळेतच शिकविली जावीत, असा मापदंड जारी केला असला तरी त्याला पाने पुसत अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यातील बहुतांश प्राथमिक शाळेतील शिक्षकांची मुले मात्र खासगी शाळेत शिकत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. यामागची मानासिकता अशी आहे की, काही शिक्षकांना सरकारी शाळेतील इंग्रजी विषयाच्या अध्यापनाबद्दल आजही संशय आहे, तर काहींचा आपण करीत असलेल्या अध्यापनावरच भरोसा नसल्याने पाल्याचे नुकसान तर होणार नाही ना..? अशी शंकेची पाल मनात चुकचुकत आहे. त्यामुळे पाल्याकडून मोठी स्वप्ने पाहणारा सर्वसामान्य पालक अशा या शिक्षकांमुळे आपल्या पाल्याला सरकारी शाळेत घातल्याबद्दल संभ्रमात पडला आहे. तर काही कष्टाळू व प्रामाणिक शिक्षक अशा शिक्षकांवर उघडपणे नाराजी दर्शवित आहेत. त्यामुळे आज पालकांना ‘गुरुजी तुमचा तुमच्यावरच भरोसा नाही का...’ अशी शिक्षकांना विचारण्याची वेळ येऊन ठेपली आहे. शाळा टिकविण्याचे आव्हान : घाटगेशिक्षकांनी आपली मुले सरकारी शाळेत घालावी. हा विषय सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला आहे. शिक्षकांच्या बाजूने निकाल लागला असला तरी सध्याच्या परस्थितीत शाळा टिकविण्याचे मोठे आव्हान असताना शिक्षकांची व सरकारी कर्मचाऱ्यांची मुले सरकारी शाळेत शिकण्याची नितांत गरज आहे. तशा सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच वेळोवेळी सभेमध्ये हा विषय मांडला आहे. त्यामुळे शिक्षकांनी सरकारी शाळेत मुले घालून पालकांचा विश्वास संपादन करण्याची गरज असल्याचे जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती अमरीश घाटगे यांनी सांगितले.