शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
2
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
3
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
4
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
5
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
6
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
7
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
8
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
9
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
10
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
11
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
12
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
13
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
14
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
15
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
16
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
17
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
18
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
19
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
20
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल

पाणीटंचाई निधीकडे शासनाची ‘वक्रदृष्टी’

By admin | Updated: December 7, 2015 00:53 IST

निधीला कात्री : पावसाळा सुरू झाल्यानंतर कामे होतात सुरू

भीमगोंडा देसाई-- कोल्हापूर पाणीटंचाईच्या निधीकडे शासनाची ‘वक्रदृष्टी’ आहे. प्रत्येक वर्षी निधीला कात्री लावल्यामुळे हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे जिल्हा पातळीवरून कोटींचा आराखडा तयार केला जातो. पैसे मिळताना मागणी केल्यापेक्षा निम्मेच मिळत असतात. तेही जून महिन्याचा पहिला आठवडा सुरू झाल्यानंतर दिले जातात. परिणामी आराखडा कागदावरच राहतो. संबंधित गावांची तहान वरुणराजा भागवतो. शासकीय यंत्रणा निर्धास्त होते. गेल्या अनेक वर्षांपासूनचे हे चित्र कायम आहे. प्रत्येक वर्षी आॅक्टोबर ते जानेवारी आणि जानेवारी ते जून अशा दोन टप्प्यांत टंचाई आराखडा तयार केला जातो. प्रत्येक तालुक्यातील आराखडा संबंधित आमदारांच्या सहीने पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेकडे येतोे. जिल्हा परिषद अहवाल एकत्र करून जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी घेऊन शासनाकडे सादर केला जातो. अन्य जिल्ह्णांच्या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्णात पाऊस चांगला होत असतो. त्यामुळे प्रशासन जानेवारी अखेरपर्यंत आराखडा तयार करत नाही. यंदा जिल्ह्णात सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यापासूनच पाण्याची टंचाई भासत आहे. अनेक गावांत टंचाईच्या झळा पोहोचत आहेत. त्यामुळे नुकताच यंदाचा आराखडा पूर्ण झाला आहे. जिल्ह्णाच्या त्या आराखड्यात २१८ गावे आणि ३८९ वाड्या- वस्त्यांत उपाययोजना करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी ५ कोटी ४४ लाख ५१ हजार रुपयांची मागणी केली आहे.आराखड्याची पुन्हा छाननी होणार आहे. स्थानिक पुढाऱ्यांच्या दबावामुळे काही अनावश्यक कामे घुसडलेली असतात. ही सर्व कामे कमी करून वस्तुस्थिती पाहून गरज असलेल्या कामांचा सुधारित आराखडा निधीसाठी शासनाकडे पाठविणात येणार आहे. निधी मिळण्यास जून महिना उजाडतो. निधी विलंबाने मिळत असल्याने मंजूर कामेही होत नाहीत. जूनअखेरचा जिल्ह्णाचा टंचाई आराखडा तयार झाला आहे. मंजुरीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून निधीसाठी शासनाकडे पाठविला जातो. उपाययोजनेची कामे करण्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे निधी आल्यानंतर त्वरित कामे सुरू केली जातील.- एस. एस. शिंदे, कार्यकारी अभियंता, ग्रामपंचायत पाणीपुरवठा, जिल्हा परिषद