शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

राज्यातील चार, कर्नाटकातील तीन गावे बाधित!

By admin | Updated: November 28, 2014 00:14 IST

दूषित पाण्याचा पुरवठा : सुमारे दहा हजार लोकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न

राम मगदूम - गडहिंग्लज -हिरण्यकेशी नदीच्या पाण्यात मळीमिश्रीत सांडपाणी मिसळल्यामुळे नांगनूरसह अरळगुंडी, कडलगे व इदरगुच्ची ही महाराष्ट्रातील चार, तर गोटुर, हेब्बाळ व चिकालगुड्ड ही कर्नाटकातील तीन खेडी बाधित होत असल्यामुळे सीमाभागातील सुमारे दहा हजार लोकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे.सात वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करूनही न्याय न मिळाल्यामुळे नांगनूर ग्रामस्थांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर देवणे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कोल्हापूर कार्यालयात जाऊन समक्ष तक्रार दिली.त्यानुसार उपप्रादेशिक अधिकारी मनीष होळकर, क्षेत्र अधिकारी वर्षा कदम, राजेश औटी व जयदीप कुंभार यांनी जिल्हाप्रमुख देवणे यांच्यासह गडहिंग्लज तालुकाप्रमुख दिलीप माने, उपसरपंच अशोक जाधव, तंटामुक्त समिती अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, गडहिंग्लज साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब मोकाशी आणि शिवसेनेचे पदाधिकारी व ग्रामस्थांसह मळीमिश्रीत सांडपाणी येणाऱ्या ओढ्याची व हिरण्यकेशी नदीत मिसळणाऱ्या सांडपाण्याची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केला. प्रदूषित पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. या प्रदूषित पाण्यामुळे मोठ्याप्रमाणात नदीतील मासे मृत होण्याच्या घटना वाढल्या आहेत. तसेच ग्रामस्थांमध्ये आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत.‘नांगनूर’च्या पाण्याचा प्रश्नसंकेश्वर येथील हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्याकडून येणाऱ्या आणि नांगनूरनजीक हिरण्यकेशी नदीत मिसळणाऱ्या पाटीलकोडी नावाच्या ओढ्यातील मळीमिश्रीत सांडपाण्याचे नमुने तपासणीसाठी घेताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी. शेजारी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, गडहिंग्लज तालुकाप्रमुख दिलीप माने, उपसरपंच अशोक जाधव, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.