शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कृषी तंत्रज्ञान बांधापर्यंत पोहोचवा

By admin | Updated: September 12, 2015 00:50 IST

तुकाराम मोरे : चारा, पीक वाचविण्यासाठी पंचसूत्री; जीवनमान उंचावण्यासाठी ‘गाव दत्तक योजना’

कोल्हापूर : कृषी विद्यापीठाने तयार केलेले प्रगत कृषी तंत्रज्ञान आणि संशोधन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवावे, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तुकाराम मोरे यांनी केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग यांच्यावतीने शुक्रवारी कोल्हापुरातील कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात रब्बी व उन्हाळी हंगाम २०१५-१६ याकरिता आयोजित केलेल्या विभागीय कृषी संशोधन व विस्तार सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. डॉ. मोरे म्हणाले, शेतकऱ्यांची गरज, बदललेली पीक परिस्थिती, जमीन, हवामान, नैसर्गिक परिस्थिती आदी गोष्टी विचारात घेऊन भविष्यात कृषी संशोधन करण्यास विद्यापीठाचे प्राधान्य असल्याचे स्पष्ट करून मोरे म्हणाले, कमीत कमी पाण्यावर अधिक उत्पादकता देणाऱ्या वाणाची निर्मिती करण्याच्या संशोधनावर विद्यापीठाने भर दिला असून, आगामी रब्बी तसेच खरीप हंगामासाठी लागणारी बियाणे, निर्मितीच्या दृष्टीने विद्यापीठाचे प्रयत्न सुरू आहेत. विद्यापीठाने २ हजार एकरांवर खरीप बियाणे उत्पादन कार्यक्रम हाती घेतला असून, रब्बीच्या हंगामासाठी लागणारे बियाणे उपलब्ध करण्यास प्राधान्य दिले आहे. शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा ठिबक सिंचनासारख्या विविध तंत्रज्ञानाचा वापर करून प्रगत कृषी तंत्रज्ञान आणि संशोधनाचा अवलंब करून पीक उत्पादकता वाढवावी. विद्यापीठाच्यावतीने २५१ विविध जातींचे वाण विकसित करण्यात आले आहेत. कृषी विद्यापीठाचे संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे आणि शेती संपन्न करावी, असे आवाहन त्यांनी केले.प्रमुख उपस्थित म्हणून बोलताना कृषी संचालक डॉ. कृष्णराव देशमुख म्हणाले, जमीन, हवामान, पाणी, स्थानिक परिस्थिती या सर्व गोष्टींचा विचार करून कृषी विद्यापीठामार्फत होणारे कृषी संशोधन शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात कृषी अधिकाऱ्यांनी सक्रिय व्हावे. कोल्हापूरचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. नागनाथ पाटील यांनी स्वागत केले. डॉ. किरण कोकाटे यांनी प्रास्ताविक, तर कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. गजानन खोत यांनी आभार मानले. या बैठकीस महात्मा फुले कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य तुषार पवार, राजेश पाटील, एल. आर. पाटील, विभागीय कृषी सहसंचालक नारायण शिसोदे, विजय इंगळे ,डॉ. कैलास मोते, कोल्हापूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन आटोळे, सांगलीचे उमेश पाटील, अहमदनगरचे अंकुश माने, साताऱ्याचे जे. पी. शिंदे, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक बसवराज मास्तोळी यांच्यासह सर्व अधिकारी आणि संशोधक उपस्थित होते.दहा जिल्ह्यांतील गावे दत्तकमहात्मा फुले कृषी विद्यापीठाने १० जिल्ह्यांतील ५१ गावे दत्तक घेतली असून, या गावांमध्ये पीक पद्धती, शेतीवरील उद्योग, विद्यापीठाचे तंत्रज्ञान आणि संशोधन या सर्वांची स्थानिक परिस्थितीशी सांगड घालून शेतकऱ्यांना अधिक मार्गदर्शनाद्वारे त्यांचे जीवनमान उंचावण्याची नवी संकल्पना राबविली जात आहे.पश्चिम महाराष्ट्रातील ऊस, भाजीपाला, रब्बी ज्वारी, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय यांचा समावेश करून विद्यापीठाने अशी गावे दत्तक घेण्याच्या मागणीचे प्रस्ताव आल्यास त्याचा सकारात्मक विचार करून या परिसरातील गावे दत्तक घेत तेथील जनतेचे जीवनमान उंचाविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे डॉ. मोरे यांनी स्पष्ट केले.पिके वाचविण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रमअपुऱ्या अनियमित पावसामुळे राज्यात टंचाईची परिस्थिती गंभीर असून, या परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्वांनीच सक्रिय होणे गरजेचे आहे. उपलब्ध पाण्यावर अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांचा अवलंब करणे करजेचे आहे. खरीप पिके वाचविण्याबरोबरच चाऱ्याचा प्रश्नही प्रश्न सोडविण्यासाठी चारा निर्मितीवर भर देणे गरजेचे आहे. विद्यापीठाने कमी पाण्यावर येणारी हरभरा, ज्वारी, करडई, गहू अशा पिकांसाठी पंचसूत्री कार्यक्रम निश्चित करून हा कार्यक्रम गतिमान केला जाणार आहे.