शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

कृषी तंत्रज्ञान बांधापर्यंत पोहोचवा

By admin | Updated: September 12, 2015 00:50 IST

तुकाराम मोरे : चारा, पीक वाचविण्यासाठी पंचसूत्री; जीवनमान उंचावण्यासाठी ‘गाव दत्तक योजना’

कोल्हापूर : कृषी विद्यापीठाने तयार केलेले प्रगत कृषी तंत्रज्ञान आणि संशोधन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवावे, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तुकाराम मोरे यांनी केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग यांच्यावतीने शुक्रवारी कोल्हापुरातील कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात रब्बी व उन्हाळी हंगाम २०१५-१६ याकरिता आयोजित केलेल्या विभागीय कृषी संशोधन व विस्तार सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. डॉ. मोरे म्हणाले, शेतकऱ्यांची गरज, बदललेली पीक परिस्थिती, जमीन, हवामान, नैसर्गिक परिस्थिती आदी गोष्टी विचारात घेऊन भविष्यात कृषी संशोधन करण्यास विद्यापीठाचे प्राधान्य असल्याचे स्पष्ट करून मोरे म्हणाले, कमीत कमी पाण्यावर अधिक उत्पादकता देणाऱ्या वाणाची निर्मिती करण्याच्या संशोधनावर विद्यापीठाने भर दिला असून, आगामी रब्बी तसेच खरीप हंगामासाठी लागणारी बियाणे, निर्मितीच्या दृष्टीने विद्यापीठाचे प्रयत्न सुरू आहेत. विद्यापीठाने २ हजार एकरांवर खरीप बियाणे उत्पादन कार्यक्रम हाती घेतला असून, रब्बीच्या हंगामासाठी लागणारे बियाणे उपलब्ध करण्यास प्राधान्य दिले आहे. शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा ठिबक सिंचनासारख्या विविध तंत्रज्ञानाचा वापर करून प्रगत कृषी तंत्रज्ञान आणि संशोधनाचा अवलंब करून पीक उत्पादकता वाढवावी. विद्यापीठाच्यावतीने २५१ विविध जातींचे वाण विकसित करण्यात आले आहेत. कृषी विद्यापीठाचे संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे आणि शेती संपन्न करावी, असे आवाहन त्यांनी केले.प्रमुख उपस्थित म्हणून बोलताना कृषी संचालक डॉ. कृष्णराव देशमुख म्हणाले, जमीन, हवामान, पाणी, स्थानिक परिस्थिती या सर्व गोष्टींचा विचार करून कृषी विद्यापीठामार्फत होणारे कृषी संशोधन शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात कृषी अधिकाऱ्यांनी सक्रिय व्हावे. कोल्हापूरचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. नागनाथ पाटील यांनी स्वागत केले. डॉ. किरण कोकाटे यांनी प्रास्ताविक, तर कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. गजानन खोत यांनी आभार मानले. या बैठकीस महात्मा फुले कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य तुषार पवार, राजेश पाटील, एल. आर. पाटील, विभागीय कृषी सहसंचालक नारायण शिसोदे, विजय इंगळे ,डॉ. कैलास मोते, कोल्हापूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन आटोळे, सांगलीचे उमेश पाटील, अहमदनगरचे अंकुश माने, साताऱ्याचे जे. पी. शिंदे, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक बसवराज मास्तोळी यांच्यासह सर्व अधिकारी आणि संशोधक उपस्थित होते.दहा जिल्ह्यांतील गावे दत्तकमहात्मा फुले कृषी विद्यापीठाने १० जिल्ह्यांतील ५१ गावे दत्तक घेतली असून, या गावांमध्ये पीक पद्धती, शेतीवरील उद्योग, विद्यापीठाचे तंत्रज्ञान आणि संशोधन या सर्वांची स्थानिक परिस्थितीशी सांगड घालून शेतकऱ्यांना अधिक मार्गदर्शनाद्वारे त्यांचे जीवनमान उंचावण्याची नवी संकल्पना राबविली जात आहे.पश्चिम महाराष्ट्रातील ऊस, भाजीपाला, रब्बी ज्वारी, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय यांचा समावेश करून विद्यापीठाने अशी गावे दत्तक घेण्याच्या मागणीचे प्रस्ताव आल्यास त्याचा सकारात्मक विचार करून या परिसरातील गावे दत्तक घेत तेथील जनतेचे जीवनमान उंचाविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे डॉ. मोरे यांनी स्पष्ट केले.पिके वाचविण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रमअपुऱ्या अनियमित पावसामुळे राज्यात टंचाईची परिस्थिती गंभीर असून, या परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्वांनीच सक्रिय होणे गरजेचे आहे. उपलब्ध पाण्यावर अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांचा अवलंब करणे करजेचे आहे. खरीप पिके वाचविण्याबरोबरच चाऱ्याचा प्रश्नही प्रश्न सोडविण्यासाठी चारा निर्मितीवर भर देणे गरजेचे आहे. विद्यापीठाने कमी पाण्यावर येणारी हरभरा, ज्वारी, करडई, गहू अशा पिकांसाठी पंचसूत्री कार्यक्रम निश्चित करून हा कार्यक्रम गतिमान केला जाणार आहे.